शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

पुरोगामी विचारधारेने एकत्र येण्याची गरज

By admin | Updated: May 30, 2016 03:59 IST

शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारसरणी व वारसा जपणाऱ्या घटकांनी एकत्र येणे काळाची गरज

बोटा (अहमदनगर) : जातीअंताकडून राष्ट्रवादाकडे वाटचाल करताना पुरोगामी, प्रगतशील तसेच राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारसरणी व वारसा जपणाऱ्या घटकांनी एकत्र येणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.संगमनेर तालुक्यातील घारगावजवळील कुरकुंडी येथे लोकपंचायतच्या सभागृहात अहमदनगर जिल्हा जातीय अत्याचार विरोधी संघर्ष समितीने आयोजित केलेल्या दोनदिवशीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते म्हणाले, संतांच्या सामूहिकतेच्या विचारसरणीमुळे आज भारतात लोकशाही व्यवस्था टिकून आहे. मात्र, वैदिक विचारसरणी ही चातुर्वर्णीय व्यवस्थेची पुरस्कर्ती आहे. ती संपवण्यासाठी आता पुढाकार घेणे गरजेचे आहे. सत्ताधाऱ्यांची विचारसरणी जातीव्यवस्थेला खतपाणी घालणारी आहे. त्यासाठी जातीअंताचा लढा उभारणे काळाची गरज बनली आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारने योग्य भूमिका घेतली नसल्याची टीका करीत जातीअंताची सुरुवात अहमदनगर जिल्ह्यातून करण्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली. कम्युनिस्ट पक्षाच्या स्मिता पानसरे, जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष बाबा अरगडे, लोक अधिकार आंदोलनचे अध्यक्ष डॉ. अरुण जाधव यांची भाषणे झाली.