शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

शिक्षण क्षेत्रात बदलाची गरज

By admin | Updated: June 26, 2015 02:35 IST

देशाच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त संशोधनाची गरज असून औद्योगिक कंपन्यांनी शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करून संशोधनाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.

पुणे : देशाच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त संशोधनाची गरज असून औद्योगिक कंपन्यांनी शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करून संशोधनाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. जागतिकीकरणातील वास्तव स्वीकारून आपल्या शिक्षण क्षेत्रात बदल करावे लागणार आहेत, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी व्यक्त केले. भारती विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी बोलत होते. राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विद्यापीठाचे संस्थापक व कुलपती डॉ. पतंगराव कदम, कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम आदी यावेळी उपस्थित होते. देशातील विद्यापीठांमधून तसेच आयआयटी, एनआयटी सारख्या संशोधन संस्थांमधून गेल्या कित्येक वर्षांपासून एकही नोबेल पारितोषिक मिळविणारा संशोधक निर्माण होत नाही, याबाबत खंत व्यक्त करून राष्ट्रपती म्हणाले, देशातील विद्यार्थी परदेशी विद्यापीठात जाऊन नोबेल लॉरीएट होतात. विद्यार्थ्यांमध्ये क्षमता आहे. योग्य मार्गदर्शक शिक्षकही आहेत. आता अधिकाधिक नोबेल लॉरिएट कसे निर्माण होतील या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. जर्मनी, अमेरिका, ब्राझील यांसह अनेक विकसनशील देशांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्यांच्या तुलनेत भारतातील विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी आहे. त्यात वाढ करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे ते म्हणाले.जागतिक क्रमवारीत पहिल्या २०० विद्यापीठांत देशातील एकाही शैक्षणिक संस्था नाही. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर भर देण्याची अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली. भारती विद्यापीठ परिवाराच्या वतीने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते डॉ. पतंगराव कदम यांना मानपत्र प्रदान करण्यात आले.