शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
4
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
5
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
6
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
7
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
8
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
9
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
10
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
11
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
12
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
13
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
14
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
15
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
16
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
17
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
18
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
19
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
20
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?

सैनिकांचा ‘खालसा’ ही तर भाजपाचीच गरज !

By admin | Updated: December 4, 2014 02:30 IST

अगदी थोड्या दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाशकातील कुंभमेळ्याची सध्या देशात आणि विशेषत: महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे

हेमंत कुलकर्णी, नाशिकअगदी थोड्या दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाशकातील कुंभमेळ्याची सध्या देशात आणि विशेषत: महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. हा कुंभमेळा प्राय: खालशांचा आणि काही खालसे मिळून तयार होणाऱ्या आखाड्यांचा असतो आणि त्याचे सदस्य मुख्यत्वेकरून ‘लठैत’ या संज्ञेत मोडणारे. प्राचीन काळी हिंदू धर्मातील ऋषी-मुनी आणि साधू-संत धर्माचे काम करीत असताना, त्यांच्या कामात अडथळे आणणाऱ्यांचा बंदोबस्त करणे हीच काय ती एकमात्र जबाबदारी या खालशांवर असे. आता सांगा, आजच्या काळात आणि राजकारणाच्या क्षेत्रात शिवसेनेतील सैनिकांखेरीज करून अन्य कोणातही आहे अशी हिंमत, जिगर आणि दे दणादण वृत्ती? म्हणूनच म्हणायचे, शिवसेनेने सत्तेत सहभागी होणे ही खुद्द सेनेपेक्षा भाजपाचीच अधिक गरज होती. आता एकदा का, धर्माधिकारी आणि त्यांचे रक्षक हा सिद्धान्त स्वीकारला की पुढचे सारे आकळायला सोपे होऊन जाते. पूर्वीचे साधूसंतादि धर्माधिकारीही बहुश: ‘हवं तर सारं, पण तोंडानं उच्चारायचं मात्र नाही’ याच वृत्तीचे असत. भाजपाने नेमके हेच केले. सेना हा आमचा नैसर्गिक जोडीदार आहे, तो सत्तेत सोबत आला तर आम्हाला आनंदच आहे, हीच एक तबकडी मुंबईपासून दिल्लीपर्यंत वाजवली, पण जोडीदाराची जोडी टिकवायची कशी आणि आनंद प्राप्त करायचा कसा, यावर मात्र चिडीचूप. त्यामागेही बहुधा एक रणनीती असावी. खालसे फुटतात तसे आखाडेही फुटतात. तेव्हां हा खालसा फुटला, त्याची दोन शकले झाली की, त्यातील एखादे शकल आपल्याकडे पांढरे निशाण फडकवीत आले की मग सुंठीवाचून खोकलाच गेला! (ही सूंठ शरद पवारांच्या सुंठीहून अंमळ निराळी) तशी प्रसादचिन्हे दिसूही लागली होती. साहजिकच खालशाचे श्री महंत सावध झाले. ‘आरपार’च्या लढाईत आता आरही जाईल आणि पारही जाईल हे श्री महंतांनी ओळखले आणि तशा सांगाव्यांचे प्रक्षेपण सुरु झाले. ‘काय घेणार’ हा प्रश्न विचारल्यावर जे नेमके हवे ते काही सांगायचे नसते, हा तर व्यवहारातला साधा नियम. त्याला जोड सरकारी कारभारातील एका नीतीतत्त्वाची. ‘आस्क फॉर अ कॅनन, देन यू विल गेट अ गन’ म्हणजे तोफ मागा, तेव्हां कुठे बंदूक मिळेल! तेव्हां उप मुख्यमंत्रिपद द्या, गृह द्या, बांधकाम द्या, थोडक्यात दुधावरची सारी साय द्या. आता मागणारा ढीग मागेल पण शेवटी दात्याची भूमिका महत्वाची आणि म्हणून दाता जे देईल ते पदरी पडले पवित्र झाले या नात्याने याचकाने स्वीकारणे ओघानेच येते. आज झाले आहे तसेच. पण ‘मियाँ-बिबी राजी’ म्हटल्यावर इतरांनी त्यात काझीगिरी करण्याचे कारण नाही. ज्याचा शेवट गोड, ते सारेच गोड! दाता नेहमी फायद्यात आणि याचक मात्र अगदीच घाट्यात नाही, पण कमी फायद्यात हेदेखील भाजपा-सेनेच्या या व्यवहारात अधोरेखित झाले. मुळात भाजपाचे फडणवीस सरकार अल्पमतातले. शिवसेना अधिकाधिक आक्रमक बनू पाहणारी. (या आक्रमकतेतील सुप्त आणि उघड हेतुची चर्चा आता नकोच ना गडे!) पण काँग्रेसच्या लोकानी बाह्या सरसावलेल्या. सेना सरकारात गेल्याचे पाहून राष्ट्रवादीच्या भूमिकेतही बदल होण्याची शक्यता. (अर्थात राष्ट्रवादीच्या भूमिकेतील बदल ही बातमी होऊ शकत नाही आणि त्या पक्षाला काही भूमिका आहे व असते हा आरोप त्या पक्षाला कितपत मानवेल याचीही शंकाच) त्याखेरीज करुन स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या राजूअण्णा शेट्टी यांच्याशी द्रोह केलेला एक गट आणि नव्याने मुसंडी मारु पाहणारी शरद जोशी यांची शेतकरी संघटना असे घरात म्हणजे विधिमंडळात आणि घराबाहेर म्हणजे रस्त्यावर दबा धरुन बसलेले अनेक शत्रू. अर्थात सत्तेतील लोकाना जेरीस आणायचे तर संख्याबळालाही फार महत्व असते असे नाही, याचा वस्तुपाठ सेनेत असतानाच्या छगन भुजबळांनी घालूनच ठेवलेला. तेव्हां इतक्या शत्रूंना घरात आणि घराबाहेर तोंड देण्याची कुवत, ताकद आणि हिंमत भाजपातील एकाच्याही अंगी नाही. त्यांचा सारा जोर, बोलघेवडेपणात. रस्त्यावरील लढाई लढण्याआधीच हे पोलिसांना फोन करुन आपल्या प्रतिबंधात्मक अटकेची सोय करुन घेणार. मग ही लढाई लढायची कोणी आणि आपल्या ‘धर्मकार्यात’ (?) अडथळे आणू पाहणाऱ्यांचा बंदोबस्त करायचा कोणी? त्यासाठी शिवसेनेच्या सैनिकांइतका सक्षम पर्याय दुसरा कोणता असायला आणि हा पर्याय तर हाताशी सहजी उपलब्ध. म्हणूनच म्हणायचे, भाजपालाच अधिक गरज होती ती संरक्षण करु शकणाऱ्या खालशाची आणि सेनेच्या खालशाची गरज होती, ती केवळ खालसा पोसण्यासाठीचे दाणापाणी अव्याहत मिळत राहण्याची. तितकी सोय होते आहे ना, इतकाच विचार सेनेने केला असावा आणि नाही तरी,सर्वनाशे समुत्पन्ने,अर्ध्यं त्यजति पंडित:अर्धेन कुरुते कार्यंसर्वनाश: सदु:सह:’ असे तर सुभाषितच आहे!