शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

सैनिकांचा ‘खालसा’ ही तर भाजपाचीच गरज !

By admin | Updated: December 4, 2014 02:30 IST

अगदी थोड्या दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाशकातील कुंभमेळ्याची सध्या देशात आणि विशेषत: महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे

हेमंत कुलकर्णी, नाशिकअगदी थोड्या दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाशकातील कुंभमेळ्याची सध्या देशात आणि विशेषत: महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. हा कुंभमेळा प्राय: खालशांचा आणि काही खालसे मिळून तयार होणाऱ्या आखाड्यांचा असतो आणि त्याचे सदस्य मुख्यत्वेकरून ‘लठैत’ या संज्ञेत मोडणारे. प्राचीन काळी हिंदू धर्मातील ऋषी-मुनी आणि साधू-संत धर्माचे काम करीत असताना, त्यांच्या कामात अडथळे आणणाऱ्यांचा बंदोबस्त करणे हीच काय ती एकमात्र जबाबदारी या खालशांवर असे. आता सांगा, आजच्या काळात आणि राजकारणाच्या क्षेत्रात शिवसेनेतील सैनिकांखेरीज करून अन्य कोणातही आहे अशी हिंमत, जिगर आणि दे दणादण वृत्ती? म्हणूनच म्हणायचे, शिवसेनेने सत्तेत सहभागी होणे ही खुद्द सेनेपेक्षा भाजपाचीच अधिक गरज होती. आता एकदा का, धर्माधिकारी आणि त्यांचे रक्षक हा सिद्धान्त स्वीकारला की पुढचे सारे आकळायला सोपे होऊन जाते. पूर्वीचे साधूसंतादि धर्माधिकारीही बहुश: ‘हवं तर सारं, पण तोंडानं उच्चारायचं मात्र नाही’ याच वृत्तीचे असत. भाजपाने नेमके हेच केले. सेना हा आमचा नैसर्गिक जोडीदार आहे, तो सत्तेत सोबत आला तर आम्हाला आनंदच आहे, हीच एक तबकडी मुंबईपासून दिल्लीपर्यंत वाजवली, पण जोडीदाराची जोडी टिकवायची कशी आणि आनंद प्राप्त करायचा कसा, यावर मात्र चिडीचूप. त्यामागेही बहुधा एक रणनीती असावी. खालसे फुटतात तसे आखाडेही फुटतात. तेव्हां हा खालसा फुटला, त्याची दोन शकले झाली की, त्यातील एखादे शकल आपल्याकडे पांढरे निशाण फडकवीत आले की मग सुंठीवाचून खोकलाच गेला! (ही सूंठ शरद पवारांच्या सुंठीहून अंमळ निराळी) तशी प्रसादचिन्हे दिसूही लागली होती. साहजिकच खालशाचे श्री महंत सावध झाले. ‘आरपार’च्या लढाईत आता आरही जाईल आणि पारही जाईल हे श्री महंतांनी ओळखले आणि तशा सांगाव्यांचे प्रक्षेपण सुरु झाले. ‘काय घेणार’ हा प्रश्न विचारल्यावर जे नेमके हवे ते काही सांगायचे नसते, हा तर व्यवहारातला साधा नियम. त्याला जोड सरकारी कारभारातील एका नीतीतत्त्वाची. ‘आस्क फॉर अ कॅनन, देन यू विल गेट अ गन’ म्हणजे तोफ मागा, तेव्हां कुठे बंदूक मिळेल! तेव्हां उप मुख्यमंत्रिपद द्या, गृह द्या, बांधकाम द्या, थोडक्यात दुधावरची सारी साय द्या. आता मागणारा ढीग मागेल पण शेवटी दात्याची भूमिका महत्वाची आणि म्हणून दाता जे देईल ते पदरी पडले पवित्र झाले या नात्याने याचकाने स्वीकारणे ओघानेच येते. आज झाले आहे तसेच. पण ‘मियाँ-बिबी राजी’ म्हटल्यावर इतरांनी त्यात काझीगिरी करण्याचे कारण नाही. ज्याचा शेवट गोड, ते सारेच गोड! दाता नेहमी फायद्यात आणि याचक मात्र अगदीच घाट्यात नाही, पण कमी फायद्यात हेदेखील भाजपा-सेनेच्या या व्यवहारात अधोरेखित झाले. मुळात भाजपाचे फडणवीस सरकार अल्पमतातले. शिवसेना अधिकाधिक आक्रमक बनू पाहणारी. (या आक्रमकतेतील सुप्त आणि उघड हेतुची चर्चा आता नकोच ना गडे!) पण काँग्रेसच्या लोकानी बाह्या सरसावलेल्या. सेना सरकारात गेल्याचे पाहून राष्ट्रवादीच्या भूमिकेतही बदल होण्याची शक्यता. (अर्थात राष्ट्रवादीच्या भूमिकेतील बदल ही बातमी होऊ शकत नाही आणि त्या पक्षाला काही भूमिका आहे व असते हा आरोप त्या पक्षाला कितपत मानवेल याचीही शंकाच) त्याखेरीज करुन स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या राजूअण्णा शेट्टी यांच्याशी द्रोह केलेला एक गट आणि नव्याने मुसंडी मारु पाहणारी शरद जोशी यांची शेतकरी संघटना असे घरात म्हणजे विधिमंडळात आणि घराबाहेर म्हणजे रस्त्यावर दबा धरुन बसलेले अनेक शत्रू. अर्थात सत्तेतील लोकाना जेरीस आणायचे तर संख्याबळालाही फार महत्व असते असे नाही, याचा वस्तुपाठ सेनेत असतानाच्या छगन भुजबळांनी घालूनच ठेवलेला. तेव्हां इतक्या शत्रूंना घरात आणि घराबाहेर तोंड देण्याची कुवत, ताकद आणि हिंमत भाजपातील एकाच्याही अंगी नाही. त्यांचा सारा जोर, बोलघेवडेपणात. रस्त्यावरील लढाई लढण्याआधीच हे पोलिसांना फोन करुन आपल्या प्रतिबंधात्मक अटकेची सोय करुन घेणार. मग ही लढाई लढायची कोणी आणि आपल्या ‘धर्मकार्यात’ (?) अडथळे आणू पाहणाऱ्यांचा बंदोबस्त करायचा कोणी? त्यासाठी शिवसेनेच्या सैनिकांइतका सक्षम पर्याय दुसरा कोणता असायला आणि हा पर्याय तर हाताशी सहजी उपलब्ध. म्हणूनच म्हणायचे, भाजपालाच अधिक गरज होती ती संरक्षण करु शकणाऱ्या खालशाची आणि सेनेच्या खालशाची गरज होती, ती केवळ खालसा पोसण्यासाठीचे दाणापाणी अव्याहत मिळत राहण्याची. तितकी सोय होते आहे ना, इतकाच विचार सेनेने केला असावा आणि नाही तरी,सर्वनाशे समुत्पन्ने,अर्ध्यं त्यजति पंडित:अर्धेन कुरुते कार्यंसर्वनाश: सदु:सह:’ असे तर सुभाषितच आहे!