शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

स्वाइनविषयी जनजागृती आवश्यक-आरोग्यमंत्री

By admin | Updated: June 28, 2017 03:45 IST

पावसाळा सुरू झाल्यावर साथीच्या आजारांचे प्रमाण वाढते. यंदा पावसाळ्याआधीपासूनच मुंबईत स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पावसाळा सुरू झाल्यावर साथीच्या आजारांचे प्रमाण वाढते. यंदा पावसाळ्याआधीपासूनच मुंबईत स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. स्वाइन फ्लू हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हायला हवी, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले. मुंबईत स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुंबईतील कस्तुरबा संसर्गजन्य आजार रुग्णालयाला भेट दिली. शहरातील स्वाइन फ्लूच्या परिस्थितीचा आढावा घेऊन रुग्णांची विचारपूस केली. या आढावा बैठकीस दिल्ली येथून आलेल्या शीघ्र प्रतिसाद पथकाचे डॉ. संकेत कुलकर्णी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.स्वाइन फ्लूवर तत्काळ उपाय केल्यास या रोगाचा प्रसार होण्यापासून अटकाव होऊ शकतो. परंतु बऱ्याच वेळा रुग्णाकडून उपचार उशिरा सुरू केले जातात. हे टाळण्यासाठी आणि स्वाइन फ्लूमुळे जाणाऱ्या लोकांचे प्राण वाचविण्यासाठी या आजाराबाबत लोकप्रबोधन होणे आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्यशिक्षण अधिक प्रभावीपणे करण्यात यावे, खासगी डॉक्टरांच्या कार्यशाळा घेण्यात याव्यात, तसेच सर्वेक्षण अधिक प्रभावीरीत्या करण्यात यावे, असेदेखील आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.मुंबईतील स्वाइन फ्लूच्या परिस्थितीविषयी माहिती देताना आरोग्यमंत्र्यांनी सांगितले, १ जानेवारीपासून आतापर्यंत मुंबईत स्वाइन फ्लू आजाराचे २८५ रुग्ण आढळले असून त्यापैकी १० जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील मृत्यूपैकी दोन तृतीयांश व्यक्तींना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार होते. तसेच मृतांपैकी तीन महिला गर्भवती होत्या.