शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

स्वाइनविषयी जनजागृती आवश्यक-आरोग्यमंत्री

By admin | Updated: June 28, 2017 03:45 IST

पावसाळा सुरू झाल्यावर साथीच्या आजारांचे प्रमाण वाढते. यंदा पावसाळ्याआधीपासूनच मुंबईत स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पावसाळा सुरू झाल्यावर साथीच्या आजारांचे प्रमाण वाढते. यंदा पावसाळ्याआधीपासूनच मुंबईत स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. स्वाइन फ्लू हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हायला हवी, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले. मुंबईत स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुंबईतील कस्तुरबा संसर्गजन्य आजार रुग्णालयाला भेट दिली. शहरातील स्वाइन फ्लूच्या परिस्थितीचा आढावा घेऊन रुग्णांची विचारपूस केली. या आढावा बैठकीस दिल्ली येथून आलेल्या शीघ्र प्रतिसाद पथकाचे डॉ. संकेत कुलकर्णी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.स्वाइन फ्लूवर तत्काळ उपाय केल्यास या रोगाचा प्रसार होण्यापासून अटकाव होऊ शकतो. परंतु बऱ्याच वेळा रुग्णाकडून उपचार उशिरा सुरू केले जातात. हे टाळण्यासाठी आणि स्वाइन फ्लूमुळे जाणाऱ्या लोकांचे प्राण वाचविण्यासाठी या आजाराबाबत लोकप्रबोधन होणे आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्यशिक्षण अधिक प्रभावीपणे करण्यात यावे, खासगी डॉक्टरांच्या कार्यशाळा घेण्यात याव्यात, तसेच सर्वेक्षण अधिक प्रभावीरीत्या करण्यात यावे, असेदेखील आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.मुंबईतील स्वाइन फ्लूच्या परिस्थितीविषयी माहिती देताना आरोग्यमंत्र्यांनी सांगितले, १ जानेवारीपासून आतापर्यंत मुंबईत स्वाइन फ्लू आजाराचे २८५ रुग्ण आढळले असून त्यापैकी १० जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील मृत्यूपैकी दोन तृतीयांश व्यक्तींना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार होते. तसेच मृतांपैकी तीन महिला गर्भवती होत्या.