शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

बँकांचे घोटाळे लपवण्यासाठी कर्जमाफी हवी, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

By admin | Updated: March 16, 2017 12:26 IST

निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर कर्जमाफीचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - शेतकरी कर्जमाफीवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवेदन देत असताना विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला. मात्र गोंधळातही मुख्यमंत्र्यांनी आपलं भाषण सुरु ठेवत विरोधकांना उत्तर दिलं आहे. निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर कर्जमाफीचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. 
 
कर्जमाफीसाठी 30 हजार 500 कोटींची आवश्यकता आहे. सरकार कर्जमाफीच्या विरोधात नाही, मात्र कर्जमाफ केल्यास विकासासाठी पैसा उरणार नाही असं देवेंद्र फडणवीस बोलले आहे. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना धारेवर धरत विरोधकांना शेतक-यांशी काही घेणं देणं नाही, त्यांना केवळ कर्जमाफीचं राजकारण करायचं आहे. कर्जमाफी केल्यानंतर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची जबाबदारी विरोधक घेणार का ? असा सवाल विचारला. 
 
बँकांचे घोटाळे लपवण्यासाठी विरोधकांना कर्जमाफी हवी आहे असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लगावला. दुष्काळानंतर भाजपाने थेट आठ हजार कोटी दिले. बँका कर्जमुक्ती होतील, पण शेतकरी कर्जातच राहील, त्यामुळे शिष्टमंडळ केंद्राशी बोलणी करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ज्या राज्यात कृषी क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक, त्या राज्यातला शेतकरी सर्वात सुखी असतो. कर्जमाफी नंतर पाच वर्षात 16 हजार आत्महत्या झाल्या, कर्जमाफी आवश्यक असून ती कधी दिली पाहिजे हे ठरवणं आवश्यक असल्याचंही ते बोलले आहेत. 
 
भांडवली खर्च शेतकऱ्यांकरिता झाला पाहिजे. 31 हजार कोटीपैकी कृषीसाठी 19 हजार 434 कोटी खर्च करतो, हा रेकॉर्ड आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.