शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

बँकांचे घोटाळे लपवण्यासाठी कर्जमाफी हवी, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

By admin | Updated: March 16, 2017 12:26 IST

निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर कर्जमाफीचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - शेतकरी कर्जमाफीवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवेदन देत असताना विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला. मात्र गोंधळातही मुख्यमंत्र्यांनी आपलं भाषण सुरु ठेवत विरोधकांना उत्तर दिलं आहे. निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर कर्जमाफीचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. 
 
कर्जमाफीसाठी 30 हजार 500 कोटींची आवश्यकता आहे. सरकार कर्जमाफीच्या विरोधात नाही, मात्र कर्जमाफ केल्यास विकासासाठी पैसा उरणार नाही असं देवेंद्र फडणवीस बोलले आहे. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना धारेवर धरत विरोधकांना शेतक-यांशी काही घेणं देणं नाही, त्यांना केवळ कर्जमाफीचं राजकारण करायचं आहे. कर्जमाफी केल्यानंतर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची जबाबदारी विरोधक घेणार का ? असा सवाल विचारला. 
 
बँकांचे घोटाळे लपवण्यासाठी विरोधकांना कर्जमाफी हवी आहे असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लगावला. दुष्काळानंतर भाजपाने थेट आठ हजार कोटी दिले. बँका कर्जमुक्ती होतील, पण शेतकरी कर्जातच राहील, त्यामुळे शिष्टमंडळ केंद्राशी बोलणी करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ज्या राज्यात कृषी क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक, त्या राज्यातला शेतकरी सर्वात सुखी असतो. कर्जमाफी नंतर पाच वर्षात 16 हजार आत्महत्या झाल्या, कर्जमाफी आवश्यक असून ती कधी दिली पाहिजे हे ठरवणं आवश्यक असल्याचंही ते बोलले आहेत. 
 
भांडवली खर्च शेतकऱ्यांकरिता झाला पाहिजे. 31 हजार कोटीपैकी कृषीसाठी 19 हजार 434 कोटी खर्च करतो, हा रेकॉर्ड आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.