शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी स्थितीत आंतरखोरे जोडणे गरजेचे - फडणवीस

By admin | Updated: February 1, 2016 02:57 IST

राज्यातील दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी आंतरखोरे जोडण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र पाणी परिषदेने दिलेल्या प्रस्तावावर राज्य शासन सकारात्मक विचार करेल

पुणे : राज्यातील दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी आंतरखोरे जोडण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र पाणी परिषदेने दिलेल्या प्रस्तावावर राज्य शासन सकारात्मक विचार करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.महाराष्ट्र पाणी परिषदेच्या वतीने राज्यातील आंतरखोरे पाणी वहन प्रस्तावाचे रविवारी फडणवीस यांना सादरीकरण करण्यात आले. परिषदेचे अध्यक्ष आ. डॉ. गणपतराव देशमुख, माजी केंद्रीय मंत्री डॉ. बाळासाहेब विखे-पाटील, जलसंपदा विभागाचे सचिव शिवाजी उपासे, पाणी परिषदेचे डॉ. वऱ्हाडे उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, राज्यात पाणीटंचाई आहे. जलसंधारणाची कामे करणेही अशक्य आहे. तेथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी इतर भागातील जास्तीचे पाणी तेथे आणावे लागेल. त्यासाठी पाण्याचे आंतरखोरे वहन करावे लागेल. प्रस्तावाबाबत शासन सकारात्मक आहे, मात्र दुष्काळी भागाला पाणी देताना नव्याने पाणीप्रश्न निर्माण होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल. प्रस्तावातील काही बाबी राष्ट्रीय नदी जोड प्रकल्पात समाविष्ट करता येतील का, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. त्याचबरोबर अशा प्रकारचे प्रकल्प आराखडे तयार करताना उपसा सिंचन योजनेचा समावेश नसावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. (प्रतिनिधी)महाराष्ट्राला नदीजोड प्रकल्पाची गरज नाही - राजेंद्र सिंह चंद्रपूर : महाराष्ट्रातील नद्या समृद्ध आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला नदीजोड प्रकल्पाची गरज नाही, असे प्रतिपादन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले.जिल्हा प्रशासन, कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारपासून दोन दिवसीय पाणी परिषद आणि कृषी प्रदर्शनाला प्रारंभ झाला. त्यास राजेंद्र सिंह मुख्य वक्ते असून एका पत्रकार परिषदेत बोलत होेते. ते म्हणाले, रसायनांचा अतिवापर आणि जल साठवणुकीचे अशास्त्रीय नियोजन यामुळे आजारांना मोठ्या प्रमाणावर निमंत्रण मिळत आहे. पंजाबमध्ये वाढलेल्या रसायनच्या अतिवापरामुळे कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक वाढले आहे.सरकार एकीकडे रासायनिक खताच्या उत्पादनावर भर देत असताना आपण करीत असलेले आवाहन कितपत टिकणार, याकडे लक्ष वेधले असता डॉ. सिंह म्हणाले, या संदर्भात केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याशी चर्चा झाली आहे. सरकारचे धोरण काहीही असले तरी ‘सजीव शेती’साठी (रसायनमुक्त शेती) आपण अखेरपर्यंत आग्रही राहणार आहोत.जगात सध्या सुरू असलेले सामूहिक स्थलांतरण हे जागतिक जल युद्धाचे संकेत असल्याकडे लक्ष वेधून डॉ. सिंह म्हणाले, हा धोक्याचा इशारा आहे. पुढील सात वर्षांत त्याचे परिणाम दिसतील. हे टाळून जलशांतीच्या मार्गावरून चालण्यासाठी सर्वांनी सामूहिकपणे पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.