शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

‘आधार कार्ड’ आवश्यक का ?

By admin | Updated: August 9, 2016 18:37 IST

देशभरात सुरू असलेल्या ‘आधार कार्ड’ योजनेला नागपूर जिल्ह्यात भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील सुमारे ९९ टक्के लोकांनी ‘आधार कार्ड’ योजनेचा

ऑनलाइन लोकमत
 
नागपूर, दि. 09 -  देशभरात सुरू असलेल्या ‘आधार कार्ड’ योजनेला नागपूर जिल्ह्यात भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील सुमारे ९९ टक्के लोकांनी ‘आधार कार्ड’ योजनेचा लाभ घेतलेला आहे. ही योजना सुरू होऊन पाच वर्षे झाले असूनदेखील ‘आधार कार्ड’ कुठे आवश्यक व सक्तीचे आहे याची कुठलीच माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला उपलब्ध नाही. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी ‘आधार कार्ड’संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारणा केली होती. ‘आधार कार्ड’ योजनेला किती प्रतिसाद मिळाला, याच्या जाहिरातीवर किती खर्च झाला इत्यादी प्रश्न त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला विचारले होते. प्राप्त माहितीनुसार १५ जून २०११ पासून नागपूर जिल्ह्यात ‘आधार’ योजनेला सुरुवात झाली. २०११ च्या जनगणनेनुसार नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या ही ४६ लाख ५३ हजार ५७० इतकी होती. यापैकी ४६ लाख ९ हजार ८५१ लोकांनी ‘आधार कार्ड’ योजनेचा लाभ घेतला आहे. याची टक्केवारी ही ९९.०६ टक्के इतकी होते. असे असूनदेखील ‘आधार कार्ड’ कुठे व कोणत्या ठिकाणी आवश्यक तसेच सक्तीचे आहे याची कुठलीच माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध नाही.
 
प्रचार-प्रसारासाठी केवळ नऊ हजारांचा खर्च
 
‘आधार कार्ड’ योजनेचा तळागाळांत प्रचार-प्रसार व्हावा यासाठी ‘आय.टी.’च्या उपसचिवांनी १० जून २०११ रोजी पाठविलेल्या ‘ई-मेल’नुसार ‘आईसी फंड’ (इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन फंड) जमा करण्यात आला. सप्टेंबर २०११ मध्ये ‘आईसी फंडात तीन लाख रुपये तर ‘बीपीएल फंडात’ ३५ लाख रुपये जमा करण्यात आले. तीन लाखांची रक्कम ‘आधार’ नोंदणीच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी प्राप्त झाली होती. यापैकी केवळ ९ हजार २१६ रुपये इतका निधी या कामात खर्च करण्यात आला.