शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

‘आधार कार्ड’ आवश्यक का ?

By admin | Updated: August 9, 2016 18:37 IST

देशभरात सुरू असलेल्या ‘आधार कार्ड’ योजनेला नागपूर जिल्ह्यात भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील सुमारे ९९ टक्के लोकांनी ‘आधार कार्ड’ योजनेचा

ऑनलाइन लोकमत
 
नागपूर, दि. 09 -  देशभरात सुरू असलेल्या ‘आधार कार्ड’ योजनेला नागपूर जिल्ह्यात भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील सुमारे ९९ टक्के लोकांनी ‘आधार कार्ड’ योजनेचा लाभ घेतलेला आहे. ही योजना सुरू होऊन पाच वर्षे झाले असूनदेखील ‘आधार कार्ड’ कुठे आवश्यक व सक्तीचे आहे याची कुठलीच माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला उपलब्ध नाही. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी ‘आधार कार्ड’संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारणा केली होती. ‘आधार कार्ड’ योजनेला किती प्रतिसाद मिळाला, याच्या जाहिरातीवर किती खर्च झाला इत्यादी प्रश्न त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला विचारले होते. प्राप्त माहितीनुसार १५ जून २०११ पासून नागपूर जिल्ह्यात ‘आधार’ योजनेला सुरुवात झाली. २०११ च्या जनगणनेनुसार नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या ही ४६ लाख ५३ हजार ५७० इतकी होती. यापैकी ४६ लाख ९ हजार ८५१ लोकांनी ‘आधार कार्ड’ योजनेचा लाभ घेतला आहे. याची टक्केवारी ही ९९.०६ टक्के इतकी होते. असे असूनदेखील ‘आधार कार्ड’ कुठे व कोणत्या ठिकाणी आवश्यक तसेच सक्तीचे आहे याची कुठलीच माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध नाही.
 
प्रचार-प्रसारासाठी केवळ नऊ हजारांचा खर्च
 
‘आधार कार्ड’ योजनेचा तळागाळांत प्रचार-प्रसार व्हावा यासाठी ‘आय.टी.’च्या उपसचिवांनी १० जून २०११ रोजी पाठविलेल्या ‘ई-मेल’नुसार ‘आईसी फंड’ (इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन फंड) जमा करण्यात आला. सप्टेंबर २०११ मध्ये ‘आईसी फंडात तीन लाख रुपये तर ‘बीपीएल फंडात’ ३५ लाख रुपये जमा करण्यात आले. तीन लाखांची रक्कम ‘आधार’ नोंदणीच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी प्राप्त झाली होती. यापैकी केवळ ९ हजार २१६ रुपये इतका निधी या कामात खर्च करण्यात आला.