शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
4
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
5
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
6
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
7
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
8
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
9
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
10
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
11
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
12
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
13
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
14
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
15
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
16
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
17
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
18
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
19
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
20
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले

‘आधार कार्ड’ आवश्यक का ?

By admin | Updated: August 9, 2016 18:37 IST

देशभरात सुरू असलेल्या ‘आधार कार्ड’ योजनेला नागपूर जिल्ह्यात भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील सुमारे ९९ टक्के लोकांनी ‘आधार कार्ड’ योजनेचा

ऑनलाइन लोकमत
 
नागपूर, दि. 09 -  देशभरात सुरू असलेल्या ‘आधार कार्ड’ योजनेला नागपूर जिल्ह्यात भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील सुमारे ९९ टक्के लोकांनी ‘आधार कार्ड’ योजनेचा लाभ घेतलेला आहे. ही योजना सुरू होऊन पाच वर्षे झाले असूनदेखील ‘आधार कार्ड’ कुठे आवश्यक व सक्तीचे आहे याची कुठलीच माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला उपलब्ध नाही. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी ‘आधार कार्ड’संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारणा केली होती. ‘आधार कार्ड’ योजनेला किती प्रतिसाद मिळाला, याच्या जाहिरातीवर किती खर्च झाला इत्यादी प्रश्न त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला विचारले होते. प्राप्त माहितीनुसार १५ जून २०११ पासून नागपूर जिल्ह्यात ‘आधार’ योजनेला सुरुवात झाली. २०११ च्या जनगणनेनुसार नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या ही ४६ लाख ५३ हजार ५७० इतकी होती. यापैकी ४६ लाख ९ हजार ८५१ लोकांनी ‘आधार कार्ड’ योजनेचा लाभ घेतला आहे. याची टक्केवारी ही ९९.०६ टक्के इतकी होते. असे असूनदेखील ‘आधार कार्ड’ कुठे व कोणत्या ठिकाणी आवश्यक तसेच सक्तीचे आहे याची कुठलीच माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध नाही.
 
प्रचार-प्रसारासाठी केवळ नऊ हजारांचा खर्च
 
‘आधार कार्ड’ योजनेचा तळागाळांत प्रचार-प्रसार व्हावा यासाठी ‘आय.टी.’च्या उपसचिवांनी १० जून २०११ रोजी पाठविलेल्या ‘ई-मेल’नुसार ‘आईसी फंड’ (इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन फंड) जमा करण्यात आला. सप्टेंबर २०११ मध्ये ‘आईसी फंडात तीन लाख रुपये तर ‘बीपीएल फंडात’ ३५ लाख रुपये जमा करण्यात आले. तीन लाखांची रक्कम ‘आधार’ नोंदणीच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी प्राप्त झाली होती. यापैकी केवळ ९ हजार २१६ रुपये इतका निधी या कामात खर्च करण्यात आला.