शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

ठाण्याला मिळाले एनडीआरएफचे कवच

By admin | Updated: June 9, 2017 03:17 IST

कठीणातल्या कठीण घटनांवर नियंत्रण ठेवणारे राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे (एनडीआरएफ) ठाणे शहराला आता कायमचे संरक्षण मिळाले

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आपत्कालीन परिस्थितीत मोठ्या आव्हानांना तोंड देणारी, कठिणातल्या कठीण घटनांवर नियंत्रण ठेवणारे राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे (एनडीआरएफ) ठाणे शहराला आता कायमचे संरक्षण मिळाले आहे. ठाणे महापालिकेने या पथकाची कायमची निवासव्यवस्था केली असून आठवडाभरातच या पथकाचे अधिकारी-कर्मचारी ठाण्यात दाखल होतील, अशी माहिती महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी लोकमतशी बोलताना दिली. एनडीआरएफ ही आपत्कालीन क्षेत्रातील नामवंत यंत्रणा आहे. महापूर, मोठे वादळ, इमारत दुर्घटना, दरडी कोसळणे यासारख्या मोठ्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एनडीआरएफला पाचारण करावे लागते. अलीकडेच मुंब्य्रातील रशीद कम्पाउंडमधील आणि ठाण्यातील बी केबिन परिसरात इमारत दुर्घटना घडली होती. या वेळी शहराबाहेरून एनडीआरएफला बोलवण्यात आले होते. भविष्यात ठाणे शहरात अशा घटना घडल्यास हे पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचेल, यासाठी आता महापालिकेने एनडीआरएफला कायमचे ठाण्यात आणले आहे. त्यांना पोखरण रोड नं. २ येथे कायमस्वरूपी निवासाची जागा करून देण्यात आली आहे. शहरातच कायमस्वरूपी ही यंत्रणा आल्याने कोणत्याही क्षणी आणि तातडीने ही यंत्रणा शहरातील मोठ्या घटनेप्रसंगी पोहोचण्यास मदत होणार आहे. एखाद्या मोठ्या, आव्हानात्मक घटनेत पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन एका मर्यादेपर्यंत काम करते. परंतु, या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एनडीआरएफला पाचारण करावे लागते. ही यंत्रणा घटनास्थळी पोहोचेपर्यंत वेळ लागतो. परंतु, आता ठाणे शहरात आल्याने मोठी दुर्घटना घडल्यास तत्काळ मदत मिळेल. >सुरक्षा बळकटएमएमआरडीए हद्दीत यापूर्वी असलेली ही यंत्रणा आता केवळ ठाणे शहरासाठी नव्हे, तर ठाणे जिल्ह्यासाठी काम करणार आहे. या पथकाला निवासासाठी देण्यात येणाऱ्या इमारतीची दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच, आवश्यक बाबीही महापालिकेने दिल्या आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था बळकट झाली आहे.