शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

By admin | Updated: July 19, 2016 03:06 IST

कल्याणसह ठाण्याचे खासदार आणि निगरगट्ट रेल्वे प्रशासनाविरोधात ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली

ठाणे : कल्याणसह ठाण्याचे खासदार आणि निगरगट्ट रेल्वे प्रशासनाविरोधात ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून सोमवारी ठाणे रेल्वे स्टेशन येथे त्रस्त ठाणेकरांच्या सह्यांची मोहीम पक्षाने आखली होती. या मोहिमेत सुमारे साडेसात हजार प्रवाशांनी आपला सक्रि य सहभाग नोंदवला. या प्रवाशांनी आपल्या समस्याही लिखित स्वरूपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे दिल्या. आमदार जितेंद्र आव्हाड आणि प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष आनंद परांजपे, आमदार निरंजन डावखरे, ठामपाचे विरोधी पक्षनेते संजय भोईर, महिला अध्यक्षा करिना दयालानी, युवक अध्यक्ष मंदार केणी आणि विद्यार्थी अध्यक्ष अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. मुंबई-ठाणे रेल्वेला १०० वर्षे होऊन गेली. रोज लाखो प्रवासी या स्टेशनचा वापर करतात. त्यातून कोट्यवधी रु पये रेल्वेला मिळतात. मात्र, प्रवाशांना अनेक असुविधांचा सामना करावा लागतो आहे. त्यातच ठाणेकरांनी या समस्या रेल्वे प्रशासनाकडे मांडून त्या सोडवण्यासाठी ज्या खासदारांची निवड केली आहे, ते अकार्यक्षम ठरले आहेत. म्हणूनच, राष्ट्रवादीने सोमवारी ठाणे रेल्वे स्टेशन पश्चिम येथे सकाळी ८ वाजता सह्यांची मोहीम घेतली होती. सुमारे ७ हजार ७४९ त्रस्त ठाणेकरांनी सह्या करून आपल्या कैफियती मांडल्या. या सह्यांचे निवेदन आनंद परांजपे यांनी रेल्वेमंत्र्यांना पाठवले. या वेळी अकार्यक्षम खासदार आणि निगरगट्ट रेल्वे प्रशासनाचा धिक्कारही केला. या वेळी अनेक प्रवाशांनी आपल्या समस्याही या स्वाक्षरी वहीवर नोंदवल्या. ठाणे स्थानकात लिफ्टही वेळेत सुरू करण्यात येत नाहीत. फलाट क्र मांक १० वरील शौचालये बंद आहेत. स्टेशनमधील अनेक एटीव्हीएम यंत्रेही बंदावस्थेत आहेत. तिकीट खिडक्याही अनेकदा गर्दीच्या वेळीच बंद असतात, आदी समस्याही प्रवाशांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. ठाण्याचे दोन्ही खासदार रेल्वेच्या समस्या सोडवण्यास अपयशी ठरले आहेत. या अपयशी खासदारांचा त्रास ठाणेकरांना सोसावा लागत आहे, असे परांजपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.>प्रशासनामुळे कुचंबणासुमारे ७ हजार ७४९ त्रस्त ठाणेकरांनी सह्या करून आपल्या कैफियती मांडल्या. या सह्यांचे निवेदन आनंद परांजपे यांनी रेल्वेमंत्र्यांना पाठवले. या वेळी अकार्यक्षम खासदार आणि निगरगट्ट रेल्वे प्रशासनाचा धिक्कारही करण्यात आला.रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची कुचंबणा होत आहे. त्यांना अनेक असुविधांचा सामना करावा लागतो आहे.