शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

By admin | Updated: July 19, 2016 03:06 IST

कल्याणसह ठाण्याचे खासदार आणि निगरगट्ट रेल्वे प्रशासनाविरोधात ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली

ठाणे : कल्याणसह ठाण्याचे खासदार आणि निगरगट्ट रेल्वे प्रशासनाविरोधात ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून सोमवारी ठाणे रेल्वे स्टेशन येथे त्रस्त ठाणेकरांच्या सह्यांची मोहीम पक्षाने आखली होती. या मोहिमेत सुमारे साडेसात हजार प्रवाशांनी आपला सक्रि य सहभाग नोंदवला. या प्रवाशांनी आपल्या समस्याही लिखित स्वरूपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे दिल्या. आमदार जितेंद्र आव्हाड आणि प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष आनंद परांजपे, आमदार निरंजन डावखरे, ठामपाचे विरोधी पक्षनेते संजय भोईर, महिला अध्यक्षा करिना दयालानी, युवक अध्यक्ष मंदार केणी आणि विद्यार्थी अध्यक्ष अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. मुंबई-ठाणे रेल्वेला १०० वर्षे होऊन गेली. रोज लाखो प्रवासी या स्टेशनचा वापर करतात. त्यातून कोट्यवधी रु पये रेल्वेला मिळतात. मात्र, प्रवाशांना अनेक असुविधांचा सामना करावा लागतो आहे. त्यातच ठाणेकरांनी या समस्या रेल्वे प्रशासनाकडे मांडून त्या सोडवण्यासाठी ज्या खासदारांची निवड केली आहे, ते अकार्यक्षम ठरले आहेत. म्हणूनच, राष्ट्रवादीने सोमवारी ठाणे रेल्वे स्टेशन पश्चिम येथे सकाळी ८ वाजता सह्यांची मोहीम घेतली होती. सुमारे ७ हजार ७४९ त्रस्त ठाणेकरांनी सह्या करून आपल्या कैफियती मांडल्या. या सह्यांचे निवेदन आनंद परांजपे यांनी रेल्वेमंत्र्यांना पाठवले. या वेळी अकार्यक्षम खासदार आणि निगरगट्ट रेल्वे प्रशासनाचा धिक्कारही केला. या वेळी अनेक प्रवाशांनी आपल्या समस्याही या स्वाक्षरी वहीवर नोंदवल्या. ठाणे स्थानकात लिफ्टही वेळेत सुरू करण्यात येत नाहीत. फलाट क्र मांक १० वरील शौचालये बंद आहेत. स्टेशनमधील अनेक एटीव्हीएम यंत्रेही बंदावस्थेत आहेत. तिकीट खिडक्याही अनेकदा गर्दीच्या वेळीच बंद असतात, आदी समस्याही प्रवाशांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. ठाण्याचे दोन्ही खासदार रेल्वेच्या समस्या सोडवण्यास अपयशी ठरले आहेत. या अपयशी खासदारांचा त्रास ठाणेकरांना सोसावा लागत आहे, असे परांजपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.>प्रशासनामुळे कुचंबणासुमारे ७ हजार ७४९ त्रस्त ठाणेकरांनी सह्या करून आपल्या कैफियती मांडल्या. या सह्यांचे निवेदन आनंद परांजपे यांनी रेल्वेमंत्र्यांना पाठवले. या वेळी अकार्यक्षम खासदार आणि निगरगट्ट रेल्वे प्रशासनाचा धिक्कारही करण्यात आला.रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची कुचंबणा होत आहे. त्यांना अनेक असुविधांचा सामना करावा लागतो आहे.