शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

राष्ट्रवादी राज्यभर आंदोलन छेडणार

By admin | Updated: May 20, 2015 00:10 IST

सुनील तटकरे : जनतेचे प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी

सिंधुदुर्गनगरी : ‘अच्छे दिन’ येणार असे म्हणणारे सरकार एक वर्ष झाले तरी अद्याप जनतेचे प्रश्न सोडवू शकलेले नाही. शेतकऱ्यांच्या भाताची अद्याप खरेदी झालेली नाही. आंबा व काजू बागायतदारांना न्याय मिळाला नाही. यासाठी राज्यभरात राष्ट्रवादीतर्फे सरकारविरोधी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी येथे दिला.येथील शरद कृषी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत तटकरे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, अमित सामंत, अबिद नाईक, सुरेश दळवी, प्रवीण भोसले, आदी पदाधिकारी उपस्थित होते. तटकरे म्हणाले, खरीप हंगामाचे भात अद्याप खरेदी झालेले नाही.जनतेच्या डोळ्यात हे सरकार धूळफेक करीत आहेत. कोकण विकासाच्यादृष्टीने या सरकारने कोणतीही पावले उचललेली नाहीत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी व सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी राज्यभरात आंदोलन करेल व त्यांना मदत करण्यास भाग पाडेल. येथील आंबा व काजू बागायतदारांचे प्रश्न सोडविले गेलेले नाहीत. त्यांना ठोस मदत मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध राहील. ‘ते’ प्रकरण गंभीर आहेराज्यमंत्र्यांच्या कार्यालयात पत्रकाराला झालेल्या मारहाणीचा तटकरे यांनी निषेध केला. बाळशास्त्री जांभेकरांचा वारसा असलेल्या सिंधुदुर्गात लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेल्या या हल्ल्याची चौकशी मुख्यमंत्र्यांमार्फत झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)शिवसेना दुटप्पी भूमिकेतशिवसेना व भाजप एकत्रित सत्तेत आहेत. मात्र, जैतापूरच्या बाबतीत शिवसेनेला आपली भूमिका स्पष्ट करावी लागली. केंद्र सरकारने अणुऊर्जा प्रकल्पाबाबत योग्यरीत्या मतही मांडलेले नाही. पंतप्रधानांना भेटायला गेलेल्या शिष्टमंडळाला भूमिकाही मांडता आली नाही. जैतापूरसंदर्भात त्यांच्यासमोर बोलण्याची हिंमतही ते करू शकले नाहीत. सत्तेत असलेली शिवसेना अशाप्रकारे दुटप्पी भूमिका करीत असल्याचा आरोप तटकरे यांनी केला.