शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

राष्ट्रवादी राज्यभर आंदोलन छेडणार

By admin | Updated: May 20, 2015 00:10 IST

सुनील तटकरे : जनतेचे प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी

सिंधुदुर्गनगरी : ‘अच्छे दिन’ येणार असे म्हणणारे सरकार एक वर्ष झाले तरी अद्याप जनतेचे प्रश्न सोडवू शकलेले नाही. शेतकऱ्यांच्या भाताची अद्याप खरेदी झालेली नाही. आंबा व काजू बागायतदारांना न्याय मिळाला नाही. यासाठी राज्यभरात राष्ट्रवादीतर्फे सरकारविरोधी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी येथे दिला.येथील शरद कृषी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत तटकरे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, अमित सामंत, अबिद नाईक, सुरेश दळवी, प्रवीण भोसले, आदी पदाधिकारी उपस्थित होते. तटकरे म्हणाले, खरीप हंगामाचे भात अद्याप खरेदी झालेले नाही.जनतेच्या डोळ्यात हे सरकार धूळफेक करीत आहेत. कोकण विकासाच्यादृष्टीने या सरकारने कोणतीही पावले उचललेली नाहीत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी व सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी राज्यभरात आंदोलन करेल व त्यांना मदत करण्यास भाग पाडेल. येथील आंबा व काजू बागायतदारांचे प्रश्न सोडविले गेलेले नाहीत. त्यांना ठोस मदत मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध राहील. ‘ते’ प्रकरण गंभीर आहेराज्यमंत्र्यांच्या कार्यालयात पत्रकाराला झालेल्या मारहाणीचा तटकरे यांनी निषेध केला. बाळशास्त्री जांभेकरांचा वारसा असलेल्या सिंधुदुर्गात लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेल्या या हल्ल्याची चौकशी मुख्यमंत्र्यांमार्फत झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)शिवसेना दुटप्पी भूमिकेतशिवसेना व भाजप एकत्रित सत्तेत आहेत. मात्र, जैतापूरच्या बाबतीत शिवसेनेला आपली भूमिका स्पष्ट करावी लागली. केंद्र सरकारने अणुऊर्जा प्रकल्पाबाबत योग्यरीत्या मतही मांडलेले नाही. पंतप्रधानांना भेटायला गेलेल्या शिष्टमंडळाला भूमिकाही मांडता आली नाही. जैतापूरसंदर्भात त्यांच्यासमोर बोलण्याची हिंमतही ते करू शकले नाहीत. सत्तेत असलेली शिवसेना अशाप्रकारे दुटप्पी भूमिका करीत असल्याचा आरोप तटकरे यांनी केला.