शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
2
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
3
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
4
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
6
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
7
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
8
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
9
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
10
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
11
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
12
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
13
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
14
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
15
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
16
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
17
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
18
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
19
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
20
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 

...तर राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन व्हावे- दिग्विजय सिंह

By admin | Updated: May 24, 2016 20:58 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसला सल्ले देण्याची काहीही आवश्यकता नाही

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 24-  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसला सल्ले देण्याची काहीही आवश्यकता नाही. जर त्यांना काँग्रेसची इतकीच काळजी वाटत असेल तर त्यांनी पक्षाला काँग्रेसमध्ये विलीन करावे, असे प्रतिपादन काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केले आहे. सोनिया गांधी यांनी कॉंग्रेसचे अध्यक्षपद सोडल्यास चुकीचा संदेश जाईल असे वक्तव्य राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तारिक अन्वर यांनी केले होते. यावर सिंह यांनी नागपूरात पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केले.५ राज्यांच्या विधानसभा निवडणूकांमध्ये कॉंग्रेसची पिछेहाट झाल्यानंतर आता पक्षात सर्जरीची आवश्यकता आहे. या मतावर मी आजही कायम आहे. कॉंग्रेसमध्ये तरुणांना जास्तीत जास्त प्रमाणात जोडण्याची आवश्यकता आहे, याचा पुनरुच्चार दिग्विजय सिंह यांनी केला. मोदी सरकारची २ वर्षे पूर्ण होत आहेत, परंतु विकास मात्र कुठेच दिसला नाही. आता २ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीला होणाऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते अमिताभ बच्चन करणार आहेत. केंद्र सरकारने कामे तर केलेली नाहीत, परंतु बच्चन यांचा उपयोग करून स्वत:चा प्रचार-प्रसार करत आहेत. २६ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी या मतदारसंघात जाऊन मी तेथे खरोखर किती विकास झाला आहे, हे पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले.राम नाईकांकडून अपेक्षाच नाहीउत्तर प्रदेशात बजरंग दलाकडून स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. यात शस्त्रे चालविण्याचेदेखील प्रशिक्षण देण्यात येत आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी याला योग्य म्हटले होते. यावर दिग्विजय सिंह यांनी टीका केली आहे. बजरंग दल, संघ यांचे निर्माणच हिंसेतून झाले आहे. त्यांच्याशी जुळलेल्या राम नाईक यांच्याकडून इतर विचारांची अपेक्षा करुच शकत नाही, असे सिंह म्हणाले.मी माफी मागणार नाहीबाटला एन्काऊन्टर बनावट होते या माझ्या वक्तव्यावर मी कायम आहे व यात माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, असे सिंह यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी. त्यातून सर्व बाबी समोर येतील. मोठा साजिद, छोटा साजिद कोण आहेत, याची मला काहीही माहिती नाही, असेदेखील ते म्हणाले.