शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्याच्या तयारीत?

By admin | Updated: September 6, 2014 02:07 IST

काँग्रेस आणि राष्ट्रवादीत गेल्या 15 दिवसांत काहीही चर्चा न झाल्याने राष्ट्रवादीने आता विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढण्याचा विचार पक्का केला आहे.

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीत गेल्या 15 दिवसांत काहीही चर्चा न झाल्याने राष्ट्रवादीने आता विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढण्याचा विचार पक्का केला आहे. काँग्रेसतर्फे भूमिका स्पष्ट नाही, कोणी चर्चा करण्यासही तयार नाही, आम्ही जरी एकत्र लढलो तरी आमची सत्ता महाराष्ट्रात येऊ शकत नाही हे आम्हालाही माहिती आहे पण वेगळे लढलो तर किमान 5क् जागा तरी आम्ही जिंकू आणि राज्यभर पक्ष बांधणी करता येईल असा विचार आता राष्ट्रवादीत वाढत चालल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
मुंबईत काही ज्येष्ठ संपादकांशी बोलताना त्या नेत्याने काँग्रेसच्या व मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत नाराजीदेखील व्यक्त केली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची 15 दिवसांपूर्वी दिल्लीत बैठक झाली होती. 2क्क्9च्या निवडणुकीत काँग्रेसचे खासदार जास्त होते त्यामुळे त्यांनी विधानसभेच्या जास्त जागा मागून घेतल्या होत्या. आम्हीदेखील त्या दिल्या होत्या. आता त्याच पद्धतीने आमच्या लोकसभेच्या जागा जास्ती आहेत म्हणून विधानसभेसाठी जास्त जागा मिळाव्यात एवढीच आमची अपेक्षा आहे. काँग्रेसचे दिल्लीतील नेते अहमद पटेल आणि ए.के. अॅन्टोनी यांनी या प्रस्तावावर विचार करून पुन्हा भेटू असे सांगितले. मात्र त्यांच्याकडून अजूनही काही उत्तर आलेले नाही. 
जास्ती जागा मिळत असतील तरच आघाडी करावी असे आमच्या पक्षात सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे मात्र काँग्रेस विनाकारण वेळकाढू धोरण घेत आहे. वेळेवर जागा निश्चित करून उमेदवार ठरवले गेले तर प्रचाराला गती देता येईल मात्र काँग्रेसच्या धीम्या गतीने आम्ही धावू शकणार नाही. आम्ही न थांबता आमच्या निवडणूक कामाला सुरुवात केली आहे. आम्ही 288 विधानसभा मतदारसंघांसाठीची तयारी सुरू केल्याचेही त्या नेत्याने स्पष्ट केले. तशा स्थितीत आम्हाला किमान 5क् जागा मिळतील व निवडणुकीनंतर आम्हाला सर्व पर्याय खुले राहतील. भाजपादेखील युतीच्या गोष्टी करीत असली तरी त्यांनाही या वेळी वेगळे लढायचे आहे. त्यामुळे कालच्या शहा-उद्धव भेटीचा अर्थ दोघे एकत्र आले असा होत नाही. सगळेच वेगवेगळे लढले तर राज्यात पंचरंगी लढती होतील व निकालानंतर जे पर्याय समोर येतील त्यात आमचाही मार्ग खुला असेल, असेही तो नेता म्हणाला.
 
पुढच्या काळात काँग्रेसपुढे नेतृत्वाचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे. आमच्याकडे नेतृत्वाची कमतरता नाही. मुख्यमंत्र्यांच्या निर्णय दिरंगाईमुळे अनेक कामे रखडल्याचा आरोपही त्या नेत्याने केल्याने आघाडीत सारेकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे. आम्हालाही आघाडी हवी आहे मात्र जास्त जागा मिळत असतील तरच. उद्या राष्ट्रवादीतर्फे विधानसभा प्रचाराचा नारळ पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत फुटणार आहे.