शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्याच्या तयारीत?

By admin | Updated: September 6, 2014 02:07 IST

काँग्रेस आणि राष्ट्रवादीत गेल्या 15 दिवसांत काहीही चर्चा न झाल्याने राष्ट्रवादीने आता विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढण्याचा विचार पक्का केला आहे.

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीत गेल्या 15 दिवसांत काहीही चर्चा न झाल्याने राष्ट्रवादीने आता विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढण्याचा विचार पक्का केला आहे. काँग्रेसतर्फे भूमिका स्पष्ट नाही, कोणी चर्चा करण्यासही तयार नाही, आम्ही जरी एकत्र लढलो तरी आमची सत्ता महाराष्ट्रात येऊ शकत नाही हे आम्हालाही माहिती आहे पण वेगळे लढलो तर किमान 5क् जागा तरी आम्ही जिंकू आणि राज्यभर पक्ष बांधणी करता येईल असा विचार आता राष्ट्रवादीत वाढत चालल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
मुंबईत काही ज्येष्ठ संपादकांशी बोलताना त्या नेत्याने काँग्रेसच्या व मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत नाराजीदेखील व्यक्त केली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची 15 दिवसांपूर्वी दिल्लीत बैठक झाली होती. 2क्क्9च्या निवडणुकीत काँग्रेसचे खासदार जास्त होते त्यामुळे त्यांनी विधानसभेच्या जास्त जागा मागून घेतल्या होत्या. आम्हीदेखील त्या दिल्या होत्या. आता त्याच पद्धतीने आमच्या लोकसभेच्या जागा जास्ती आहेत म्हणून विधानसभेसाठी जास्त जागा मिळाव्यात एवढीच आमची अपेक्षा आहे. काँग्रेसचे दिल्लीतील नेते अहमद पटेल आणि ए.के. अॅन्टोनी यांनी या प्रस्तावावर विचार करून पुन्हा भेटू असे सांगितले. मात्र त्यांच्याकडून अजूनही काही उत्तर आलेले नाही. 
जास्ती जागा मिळत असतील तरच आघाडी करावी असे आमच्या पक्षात सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे मात्र काँग्रेस विनाकारण वेळकाढू धोरण घेत आहे. वेळेवर जागा निश्चित करून उमेदवार ठरवले गेले तर प्रचाराला गती देता येईल मात्र काँग्रेसच्या धीम्या गतीने आम्ही धावू शकणार नाही. आम्ही न थांबता आमच्या निवडणूक कामाला सुरुवात केली आहे. आम्ही 288 विधानसभा मतदारसंघांसाठीची तयारी सुरू केल्याचेही त्या नेत्याने स्पष्ट केले. तशा स्थितीत आम्हाला किमान 5क् जागा मिळतील व निवडणुकीनंतर आम्हाला सर्व पर्याय खुले राहतील. भाजपादेखील युतीच्या गोष्टी करीत असली तरी त्यांनाही या वेळी वेगळे लढायचे आहे. त्यामुळे कालच्या शहा-उद्धव भेटीचा अर्थ दोघे एकत्र आले असा होत नाही. सगळेच वेगवेगळे लढले तर राज्यात पंचरंगी लढती होतील व निकालानंतर जे पर्याय समोर येतील त्यात आमचाही मार्ग खुला असेल, असेही तो नेता म्हणाला.
 
पुढच्या काळात काँग्रेसपुढे नेतृत्वाचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे. आमच्याकडे नेतृत्वाची कमतरता नाही. मुख्यमंत्र्यांच्या निर्णय दिरंगाईमुळे अनेक कामे रखडल्याचा आरोपही त्या नेत्याने केल्याने आघाडीत सारेकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे. आम्हालाही आघाडी हवी आहे मात्र जास्त जागा मिळत असतील तरच. उद्या राष्ट्रवादीतर्फे विधानसभा प्रचाराचा नारळ पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत फुटणार आहे.