शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्याच्या तयारीत?

By admin | Updated: September 6, 2014 02:07 IST

काँग्रेस आणि राष्ट्रवादीत गेल्या 15 दिवसांत काहीही चर्चा न झाल्याने राष्ट्रवादीने आता विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढण्याचा विचार पक्का केला आहे.

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीत गेल्या 15 दिवसांत काहीही चर्चा न झाल्याने राष्ट्रवादीने आता विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढण्याचा विचार पक्का केला आहे. काँग्रेसतर्फे भूमिका स्पष्ट नाही, कोणी चर्चा करण्यासही तयार नाही, आम्ही जरी एकत्र लढलो तरी आमची सत्ता महाराष्ट्रात येऊ शकत नाही हे आम्हालाही माहिती आहे पण वेगळे लढलो तर किमान 5क् जागा तरी आम्ही जिंकू आणि राज्यभर पक्ष बांधणी करता येईल असा विचार आता राष्ट्रवादीत वाढत चालल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
मुंबईत काही ज्येष्ठ संपादकांशी बोलताना त्या नेत्याने काँग्रेसच्या व मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत नाराजीदेखील व्यक्त केली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची 15 दिवसांपूर्वी दिल्लीत बैठक झाली होती. 2क्क्9च्या निवडणुकीत काँग्रेसचे खासदार जास्त होते त्यामुळे त्यांनी विधानसभेच्या जास्त जागा मागून घेतल्या होत्या. आम्हीदेखील त्या दिल्या होत्या. आता त्याच पद्धतीने आमच्या लोकसभेच्या जागा जास्ती आहेत म्हणून विधानसभेसाठी जास्त जागा मिळाव्यात एवढीच आमची अपेक्षा आहे. काँग्रेसचे दिल्लीतील नेते अहमद पटेल आणि ए.के. अॅन्टोनी यांनी या प्रस्तावावर विचार करून पुन्हा भेटू असे सांगितले. मात्र त्यांच्याकडून अजूनही काही उत्तर आलेले नाही. 
जास्ती जागा मिळत असतील तरच आघाडी करावी असे आमच्या पक्षात सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे मात्र काँग्रेस विनाकारण वेळकाढू धोरण घेत आहे. वेळेवर जागा निश्चित करून उमेदवार ठरवले गेले तर प्रचाराला गती देता येईल मात्र काँग्रेसच्या धीम्या गतीने आम्ही धावू शकणार नाही. आम्ही न थांबता आमच्या निवडणूक कामाला सुरुवात केली आहे. आम्ही 288 विधानसभा मतदारसंघांसाठीची तयारी सुरू केल्याचेही त्या नेत्याने स्पष्ट केले. तशा स्थितीत आम्हाला किमान 5क् जागा मिळतील व निवडणुकीनंतर आम्हाला सर्व पर्याय खुले राहतील. भाजपादेखील युतीच्या गोष्टी करीत असली तरी त्यांनाही या वेळी वेगळे लढायचे आहे. त्यामुळे कालच्या शहा-उद्धव भेटीचा अर्थ दोघे एकत्र आले असा होत नाही. सगळेच वेगवेगळे लढले तर राज्यात पंचरंगी लढती होतील व निकालानंतर जे पर्याय समोर येतील त्यात आमचाही मार्ग खुला असेल, असेही तो नेता म्हणाला.
 
पुढच्या काळात काँग्रेसपुढे नेतृत्वाचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे. आमच्याकडे नेतृत्वाची कमतरता नाही. मुख्यमंत्र्यांच्या निर्णय दिरंगाईमुळे अनेक कामे रखडल्याचा आरोपही त्या नेत्याने केल्याने आघाडीत सारेकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे. आम्हालाही आघाडी हवी आहे मात्र जास्त जागा मिळत असतील तरच. उद्या राष्ट्रवादीतर्फे विधानसभा प्रचाराचा नारळ पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत फुटणार आहे.