शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

राष्ट्रवादीने कोपरी काँग्रेससाठी सोडली!

By admin | Updated: April 27, 2016 03:39 IST

विधानपरिषदेची निवडणूक सुरळीत व्हावी यासाठी राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार वसंत डावखरे यांनी आता आपल्या मतांची जुळवाजुळव करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत.

अजित मांडके,

ठाणे-विधानपरिषदेची निवडणूक सुरळीत व्हावी यासाठी राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार वसंत डावखरे यांनी आता आपल्या मतांची जुळवाजुळव करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. कोपरी प्रभाग समिती ही पूर्वी राष्ट्रवादीकडे होती. विधान परिषदेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ती तुम्हाला विधान परिषदेसाठी मदत हवी असेल तर तुमचा उमेदवार मागे घ्या असे आवाहन काँग्रेसने करताच राष्ट्रवादीने आपला उमेदवार मागे घेतला आहे. परंतु परस्पर उमेदवार मागे घेतल्याने आमदार जीतेंद्र आव्हाड गटाला धक्का बसला आहे. त्यामुळे आता शहरात पुन्हा आव्हाड गट विरुद्ध डावखरे गट असा वाद रंगणार असल्याची चिन्हे आहेत.जून महिन्यात विधान परिषदेसाठी निवडणूक होणार आहे. ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे सांगत डावखरे यांनी आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. दरम्यान बहुजन विकास आघाडीने राष्ट्रवादीला मदत करण्याचे मान्य केले आहे, त्यामुळे या मतांचा लाभ डावखरेंना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु ही निवडणूक पुन्हा बिनविरोध व्हावी यासाठी व्युव्हरचना त्यांनी आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून की काय, कोपरी प्रभाग समितीवर यापूर्वी राष्ट्रवादीचा वरचष्मा होता. परंतु, काँग्रेसने विधानपरिषदेसाठी मदत हवी असल्याची गळ घालताच राष्ट्रवादीने येथून लगेचच माघार घेतली. प्रत्यक्षात येथील पक्षीय बलाबल पाहता ही प्रभाग समिती मनसेकरवी शिवसेनेच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच कदाचीत त्यांच्या हा खेळीचाच भाग म्हणावा लागणार आहे. एकीकडे काँग्रेसला आपल्याकडे करुन त्यांनी शिवसेनेच्या विरोधात आपला उमेदवार उभा न करता अप्रत्यक्षरित्या येथे शिवसेनेचाही पाठिंबा मिळविला आहे.त्यांच्या या खेळीमुळे मात्र आव्हाड गटात संतापाची लाट उसळली असून त्यांनी परस्पर उमेदवारी मागे घेण्यावरुन नाराजी व्यक्त केली. परंतु, यातूनही डावखरे गटाने आव्हाड गटाला शह देऊन आपले ‘डाव’ खरे करण्याचा हा प्रयत्नच केल्याचे दिसून येत आहे.>राष्ट्रवादीकडून वसंत डावखरे हे एकमेव संभाव्य उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरीदेखील शिवसेनेमध्ये अनेक इच्छुकांची भाऊगर्दी सुरु झाली आहे. शिवसेनत ठाण्यातून रवींद्र फाटक, अनंत तरे, एच. एस. पाटील यांच्यासह अन्य दोघांची नावे रेसमध्ये असतांनाच आता गोपाळ लांडगे आणि अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांचेही नाव पुढे आले आहे. परंतु, शिवसेना कोणाच्या पारड्यात उमेदवारी टाकणार हे आगामी काळ ठरविणार आहे. दरम्यान २०१० मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने ठाण्याबाहेरील रमेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली होती. परंतु,ऐनवेळेस त्यांना माघार घेण्यास भाग पाडले होते. तिच खेळी आता पुन्हा डावखरेंसाठी खेळण्याची तयारी शिवसेनेने केल्याची चर्चा सुरु आहे. बाहेरील उमेदवार द्यायचा आणि त्याला पाडायचे अथवा ऐनवेळेस त्याला माघार घ्यायला लावायची, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.