शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीतील संवाद, विश्वास संपला - बबनराव पाचपुते

By admin | Updated: August 14, 2014 11:56 IST

राष्ट्रवादीतील विश्वास आणि संवाद संपला आहे. पक्ष संघटनाच यामुळे अडचणीत आली आहे, अशी खेदयुक्त प्रतिक्रिया माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते यांनी केले आहे

अहमदनगर : राष्ट्रवादीतील विश्वास आणि संवाद संपला आहे. पक्ष संघटनाच यामुळे अडचणीत आली आहे, अशी खेदयुक्त प्रतिक्रिया नोंदवत पक्ष सोडण्याच्या तयारीत असलेले माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले आहे. दरम्यान, १८ रोजी भाजपा प्रवेशाच्या वृत्ताचा इन्कार करतानाच समर्थक कार्यकर्त्यांनी निर्णय दिला तर राष्ट्रवादीत राहून घरी बसू, असेही ते ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले. आज उशिरा सायंकाळी पाचपुते यांचा भाजपा प्रवेश १८ रोजी होईल, अशी वार्ता पसरली. याबाबत संपर्क केला असता आ.पाचपुते यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना या वृत्ताचा इन्कार केला आहे. मात्र पक्षात आपण एकटे पडलो आहोत, ही भावना त्यांना लपवता आली नाही. ते म्हणाले, आपली बाजू मांडण्यासाठी दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटलो. आमचे नेते अजित पवार यांच्याकडे गेलो. पण त्यांनी समजूनच घेतले नाही. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केले, या तक्रारी असतील तर त्याचा खुलासा करण्याची संधी मिळाली पाहिजे होती. मात्र पक्षात ऐकूनच घेतले जात नाही. याप्रकारे संवाद आणि विश्वास संपला तर पक्ष संघटना पुढे कशी वाढणार, असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, आपण बोलतोय हे सर्वांच्याच मनात आहे. पण बोलण्याची हिंमत होत नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. शरद पवार आमचे नेते होते, आजही आहेत, असेही ते म्हणाले. मनातील खंंत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे मांडली होती, असा नवा खुलासाही आ.पाचपुते यांनी आज केला. मात्र त्यानंतरही पक्षाकडून दखल घेण्यात आलेली नाही, याची कबुलीही त्यांनी दिली. यामुळेच समर्थक कार्यकर्त्यांकडून पक्ष सोडण्याचा दबाव वाढला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, भाजपाकडून संपर्क झाल्याचा दुजोरा त्यांनी दिला. मात्र पक्षप्रवेशाचा निर्णय झालेला नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगीतले. १५ आॅगस्ट रोजी श्रीगोंद्यात समर्थकांचा मेळावा होईल. या मेळाव्यात होणारा निर्णय आपल्याला मान्य राहील. पक्षातच राहण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी दिला, तरी त्याचा आदर राखत आपण घरी बसू, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)