शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

गांजा तस्करीमध्ये नक्षलवाद्यांचेही कनेक्शन!

By admin | Updated: August 9, 2016 21:00 IST

गांजा तस्करीमध्ये तेलंगणा तसेच विशाखापट्टणम भागातील नक्षलवाद्यांचे थेट कनेक्शन असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या चौकशीत उघड होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून

- जितेंद्र कालेकरठाणे, दि.09 - गांजा तस्करीमध्ये तेलंगणा तसेच विशाखापट्टणम भागातील नक्षलवाद्यांचे थेट कनेक्शन असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या चौकशीत उघड होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कनिसा खैरुल ही हैद्राबादच्या अण्णा उपेंद्र या मुख्य तस्कराकडून गांजा आणून त्याची ठाणे आणि मुंबई परिसरात विक्री करीत होती.तो स्थानिक नक्षलवाद्यांशी संगनमत करुन गांजाची तस्करी करीत होता. दरम्यान, कनिसा हिला १९ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.सात महिन्यांपूर्वी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे उपनिरीक्षक मनोहर घाडगे यांच्या पथकाने नरसय्या आणि रामोजी या दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडूनही ३० किलो गांजा हस्तगत केला होता. या दोघांनीही हैद्राबादच्या अण्णाकडून गांजाचा माल आणल्याचे उघड झाले होते. तेंव्हापासून अण्णा आणि त्याच्या साथीदारांचा ठाणे पोलीस शोध घेत आहेत. ६ आॅगस्ट २०१६ रोजी उपनिरीक्षक अमोल वालझाडे यांच्या पथकाने कळवा भागातून १५० किलोच्या गांजासह अटक केलेल्या कनिसानेही हैद्राबाद येथून माल आणला होता. तिने हा माल नेमकी कोणाकडून आणला, कोणा कोणाला ती हा माल वितरीत करणार होती, याची माहिती अद्यापही तिने पोलिसांना दिली नाही. प्रत्येक प्रश्नाला ती असंदिग्ध उत्तरे देत आहे. आयुर्वेदीक औषधे विशाखापट्टणम येथून आणायची असल्याचे सांगून तिने एक कार भाड्याने घेतली होती. कारसह तिला पकडल्यानंतर गाडीत गांजा असल्याचे या कारच्या चालकाला समजल्याचे तपासात उघड झाले. आता या कारचालकाला या प्रकरणात साक्षीदार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कनेक्शन नक्षलवाद्यांशी?कल्याणमधील दोघे आणि आता कळव्यात पकडलेल्या कनिसाच्या चौकशीत ज्या अण्णाचे नाव पुढे आले आहे. त्याचे तेलंगणा, हैद्राबाद आणि विशाखापट्टणमच्या नक्षलवाद्यांशी ‘संबंध’ असून त्यांच्याकडून तो गांजाची तस्करी करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. विशाखापट्टणमच्या जंगलातील वनजमिनी आदीवासींना धमकावून नक्षलवादी ताब्यात घेतात. त्याच जमिनीवर गांजाची शेती करुन तिची तस्करी करतात. हाच पैसा नक्षली कारवायांसाठीही वापरला जातो. या अण्णाच्या संपर्कात कनिसासारख्या आणखी कोण महिला किंवा तस्कर आहेत? त्याचाही शोध घेण्यात येत आहे. अण्णाचा विमान प्रवासज्या अण्णाचे नाव या प्रकरणात समोर आले आहे. तो मुंबई ते नागपूर तसेच अन्य ठिकाणी केवळ विमानाने प्रवास करतो. देशभरातून ठराविक जणांची निवड करुन तो छुप्या मार्गाने गांजाची तस्करी करतो. त्यानंतर विमान प्रवास करुन या तस्करीचा हिशेब घेऊन तो परतत असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. एका वेळी ५ किलोचा गांजा तो कनिसासह त्याच्या साथीदारांना देत होता. हैद्राबाद ते मुंबई, ठाण्याची डिलीव्हरी करण्यासाठी तो एका विक्रेत्यासाठी पाच हजार रुपये एका फेरीसाठी देत असे. अशी वाढत जाते गांजाची किंमतसुरुवातीला तेलंगणात दोन हजार रुपये किलोने गांजा विकला जातो. तिथून हैद्राबादमध्ये गांजा तस्करांकडून पाच हजार रुपये किलोने घेतलेला गांजा महाराष्ट्रात आल्यानंतर सोलापूरमध्ये आठ हजार रुपये, पुढे सोलापूर ते कल्याणमध्ये दहा हजारांचा भाव त्याला मिळतो. तर ठाण्यात १२ हजार आणि मुंबईत येईपर्यत तो १५ हजार रुपये किलोच्या होलसेल दराने विकला जातो. पुढे ही किंमत १५ ते २० हजारांच्या घरात जाते, अशी माहिती सूत्रांनी दिली.