शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

गांजा तस्करीमध्ये नक्षलवाद्यांचेही कनेक्शन!

By admin | Updated: August 9, 2016 21:00 IST

गांजा तस्करीमध्ये तेलंगणा तसेच विशाखापट्टणम भागातील नक्षलवाद्यांचे थेट कनेक्शन असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या चौकशीत उघड होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून

- जितेंद्र कालेकरठाणे, दि.09 - गांजा तस्करीमध्ये तेलंगणा तसेच विशाखापट्टणम भागातील नक्षलवाद्यांचे थेट कनेक्शन असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या चौकशीत उघड होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कनिसा खैरुल ही हैद्राबादच्या अण्णा उपेंद्र या मुख्य तस्कराकडून गांजा आणून त्याची ठाणे आणि मुंबई परिसरात विक्री करीत होती.तो स्थानिक नक्षलवाद्यांशी संगनमत करुन गांजाची तस्करी करीत होता. दरम्यान, कनिसा हिला १९ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.सात महिन्यांपूर्वी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे उपनिरीक्षक मनोहर घाडगे यांच्या पथकाने नरसय्या आणि रामोजी या दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडूनही ३० किलो गांजा हस्तगत केला होता. या दोघांनीही हैद्राबादच्या अण्णाकडून गांजाचा माल आणल्याचे उघड झाले होते. तेंव्हापासून अण्णा आणि त्याच्या साथीदारांचा ठाणे पोलीस शोध घेत आहेत. ६ आॅगस्ट २०१६ रोजी उपनिरीक्षक अमोल वालझाडे यांच्या पथकाने कळवा भागातून १५० किलोच्या गांजासह अटक केलेल्या कनिसानेही हैद्राबाद येथून माल आणला होता. तिने हा माल नेमकी कोणाकडून आणला, कोणा कोणाला ती हा माल वितरीत करणार होती, याची माहिती अद्यापही तिने पोलिसांना दिली नाही. प्रत्येक प्रश्नाला ती असंदिग्ध उत्तरे देत आहे. आयुर्वेदीक औषधे विशाखापट्टणम येथून आणायची असल्याचे सांगून तिने एक कार भाड्याने घेतली होती. कारसह तिला पकडल्यानंतर गाडीत गांजा असल्याचे या कारच्या चालकाला समजल्याचे तपासात उघड झाले. आता या कारचालकाला या प्रकरणात साक्षीदार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कनेक्शन नक्षलवाद्यांशी?कल्याणमधील दोघे आणि आता कळव्यात पकडलेल्या कनिसाच्या चौकशीत ज्या अण्णाचे नाव पुढे आले आहे. त्याचे तेलंगणा, हैद्राबाद आणि विशाखापट्टणमच्या नक्षलवाद्यांशी ‘संबंध’ असून त्यांच्याकडून तो गांजाची तस्करी करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. विशाखापट्टणमच्या जंगलातील वनजमिनी आदीवासींना धमकावून नक्षलवादी ताब्यात घेतात. त्याच जमिनीवर गांजाची शेती करुन तिची तस्करी करतात. हाच पैसा नक्षली कारवायांसाठीही वापरला जातो. या अण्णाच्या संपर्कात कनिसासारख्या आणखी कोण महिला किंवा तस्कर आहेत? त्याचाही शोध घेण्यात येत आहे. अण्णाचा विमान प्रवासज्या अण्णाचे नाव या प्रकरणात समोर आले आहे. तो मुंबई ते नागपूर तसेच अन्य ठिकाणी केवळ विमानाने प्रवास करतो. देशभरातून ठराविक जणांची निवड करुन तो छुप्या मार्गाने गांजाची तस्करी करतो. त्यानंतर विमान प्रवास करुन या तस्करीचा हिशेब घेऊन तो परतत असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. एका वेळी ५ किलोचा गांजा तो कनिसासह त्याच्या साथीदारांना देत होता. हैद्राबाद ते मुंबई, ठाण्याची डिलीव्हरी करण्यासाठी तो एका विक्रेत्यासाठी पाच हजार रुपये एका फेरीसाठी देत असे. अशी वाढत जाते गांजाची किंमतसुरुवातीला तेलंगणात दोन हजार रुपये किलोने गांजा विकला जातो. तिथून हैद्राबादमध्ये गांजा तस्करांकडून पाच हजार रुपये किलोने घेतलेला गांजा महाराष्ट्रात आल्यानंतर सोलापूरमध्ये आठ हजार रुपये, पुढे सोलापूर ते कल्याणमध्ये दहा हजारांचा भाव त्याला मिळतो. तर ठाण्यात १२ हजार आणि मुंबईत येईपर्यत तो १५ हजार रुपये किलोच्या होलसेल दराने विकला जातो. पुढे ही किंमत १५ ते २० हजारांच्या घरात जाते, अशी माहिती सूत्रांनी दिली.