शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

नवाज शरीफ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2017 19:00 IST

निवृत्त नौदल कमांडर कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी जावळीकर एकवटले आहेत.

आॅनलाइन लोकमतसातारा, दि. 16 - निवृत्त नौदल कमांडर कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी जावळीकर एकवटले आहेत. सायगाव भागातील युवकांनी रविवारी निषेध मोर्चा काढून पाकिस्तानच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.निवृत्त कमांडर अधिकारी कुलभूषण जाधव यांनी तालुक्यातील आणेवाडीत शेती घेऊन त्यात घर बांधून काही काळ राहत होते. या काळात त्यांनी तरुणांमध्ये देशभक्तीचे संस्कार केले. जाधव यांना पाकिस्तान सरकारने हेरगिरीच्या आरोपाखाली मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. यामुळे जावळीच्या सुपुत्रासाठी जावळीकर एकवटू लागले आहेत. अनेक ठिकाणी मोर्चे काढून पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे.पाकिस्तान सरकारच्या निषेधार्थ सायगाव पंचक्रोशीतील युवकांनी एकत्र येऊन रविवारी निषेध मोर्चा काढला. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान हाय-हाय, भारत सरकार आगे बढ़ो या घोषणा दिल्या. यावेळी मर्ढे, आनेवाडी, सायगाव, खर्शी, दरे खुर्द या गावातील असंख्य युवक सहभागी झाले होते. भाजपचे जिल्हा परिषद गट नेते दीपक पवार म्हणाले, जावळीचे सुपुत्र आणि अभिमान असलेले कुलभूषण जाधव हे निर्दोष असून, त्यांना खोट्या आरोपाखाली अटक करून फाशीची शिक्षा सुनावली. या निर्णयाचा आम्ही जावळीकर जनता निषेध करीत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना कुलभूषण यांच्या सुटकेसाठी निवेदन पाठवणार आहोत. जावळी शिवसेना प्रमुख प्रशांत तरडे म्हणाले, भारत सरकारने कुलभूषण जाधव यांच्यासाठी प्रयत्न करून त्यांना भारतात परत आणावे. मोर्चात सतीश भोसले, लक्ष्मण भोसले, सचिन भोसले, सुहास भोसले, प्रमोद दीक्षित, दीपक देशमाने, रोहन भोसले, जितेंद्र शिंगटे, जितेंद्र गायकवाड यांच्यासह असंख्य युवक सहभागी झाले होते.शूरवीरासाठी कडक पावले उचलाशहीद तुकाराम ओंबळे यांच्या तालुक्यातील या अधिकाऱ्याने देशासाठी कित्येक वर्षे आपली सेवा देऊन निवृत्तीनंतरही सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिले होते. या शूरवीरासाठी सरकारने कडक पावले उचलून त्यांना पाकिस्तानच्या ताब्यातून लवकरात लवकर सोडवून आणावे, अशी मागणी यावेळी उपस्थित युवकांनी केली.