शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

मुंबईच्या ट्रॅफिकजामवर जलवाहतुकीचा तोडगा

By admin | Updated: August 10, 2016 04:41 IST

भारतीय देशांतर्गत जलमार्ग प्राधिकरण (आयडब्ल्यूएआय) लवकरच हवाई वाहतूक नियंत्रित करणाऱ्या एअर ट्रॅफिक कंट्रोलप्रमाणे (एटीसी) काम करताना दिसेल.

नितीन अग्रवाल, नवी दिल्लीभारतीय देशांतर्गत जलमार्ग प्राधिकरण (आयडब्ल्यूएआय) लवकरच हवाई वाहतूक नियंत्रित करणाऱ्या एअर ट्रॅफिक कंट्रोलप्रमाणे (एटीसी) काम करताना दिसेल. मुंबईची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी जलमार्गे प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या कामाला गती देण्यात आली असल्याचे केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी राज्यसभेत सांगितले. मुंबईच्या सी फ्रंटवर सहा मजली टर्मिनल उभारण्यात येत आहे. मांडवाजवळ समुद्रात दोन धक्के बांधण्याचे आदेश देण्यात आले असून, डिमेलो रोडवर उंच पूल उभारणीचे काम सुरू आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या सहकार्याने हे काम सुरू आहे, असेही गडकरी म्हणाले. मुंबई-ठाणे जलमार्ग विकसित करण्यासाठी अनेक मागण्या मंजूर करण्यासह ठाण्याला ३०० कोटी रुपयेही देण्यात आले आहेत, असे गडकरी म्हणाले. मजीद मेमन यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, भारतीय देशांतर्गत जलमार्ग प्राधिकरण आणि मेसर्स मारुती सुझुकी इंडिया लि. यांच्यात कारचे ताफे राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक एकवर वाराणसीहून कोलकाता येथे पाठविण्याबाबत करार झाला आहे. १२ आॅगस्ट रोजी याला प्रारंभ होईल आणि नंतर ही वाहतूक पूर्वोत्तरपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. रेल्वेचे प्रतिटन भाडे १.४१ रुपये, रस्ता मार्गावरील मालवाहतुकीचे भाडे २.५८ रुपये प्रतिटन आहे. तथापि, जलमार्गे वाहतुकीचा प्रतिटन केवळ १.०६ रुपये खर्च येतो. याशिवाय एक लिटर इंधनाद्वारे एक टन माल रस्तामार्गे २४ कि.मी.पर्यंत, रेल्वेद्वारे ९५ कि.मी., तर जलमार्गे २१५ कि.मी.पर्यंत पोहोचवता येतो, असे ते म्हणाले. देशात असे १११ जलमार्ग विकसित करण्यात आले असून, यात १६२० कि. मी.च्या गंगा जलमार्गाचा समावेश आहे, असे गडकरी यांनी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात सांगितले. जल वाहतुकीसाठी पाच मल्टीमॉडल हब आणि २० वॉटर पोर्टस् बनविण्यात येत असून, ४००० कोटी रुपयांचा हा प्रकल्प २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.