शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

मुंबईच्या ट्रॅफिकजामवर जलवाहतुकीचा तोडगा

By admin | Updated: August 10, 2016 04:41 IST

भारतीय देशांतर्गत जलमार्ग प्राधिकरण (आयडब्ल्यूएआय) लवकरच हवाई वाहतूक नियंत्रित करणाऱ्या एअर ट्रॅफिक कंट्रोलप्रमाणे (एटीसी) काम करताना दिसेल.

नितीन अग्रवाल, नवी दिल्लीभारतीय देशांतर्गत जलमार्ग प्राधिकरण (आयडब्ल्यूएआय) लवकरच हवाई वाहतूक नियंत्रित करणाऱ्या एअर ट्रॅफिक कंट्रोलप्रमाणे (एटीसी) काम करताना दिसेल. मुंबईची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी जलमार्गे प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या कामाला गती देण्यात आली असल्याचे केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी राज्यसभेत सांगितले. मुंबईच्या सी फ्रंटवर सहा मजली टर्मिनल उभारण्यात येत आहे. मांडवाजवळ समुद्रात दोन धक्के बांधण्याचे आदेश देण्यात आले असून, डिमेलो रोडवर उंच पूल उभारणीचे काम सुरू आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या सहकार्याने हे काम सुरू आहे, असेही गडकरी म्हणाले. मुंबई-ठाणे जलमार्ग विकसित करण्यासाठी अनेक मागण्या मंजूर करण्यासह ठाण्याला ३०० कोटी रुपयेही देण्यात आले आहेत, असे गडकरी म्हणाले. मजीद मेमन यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, भारतीय देशांतर्गत जलमार्ग प्राधिकरण आणि मेसर्स मारुती सुझुकी इंडिया लि. यांच्यात कारचे ताफे राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक एकवर वाराणसीहून कोलकाता येथे पाठविण्याबाबत करार झाला आहे. १२ आॅगस्ट रोजी याला प्रारंभ होईल आणि नंतर ही वाहतूक पूर्वोत्तरपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. रेल्वेचे प्रतिटन भाडे १.४१ रुपये, रस्ता मार्गावरील मालवाहतुकीचे भाडे २.५८ रुपये प्रतिटन आहे. तथापि, जलमार्गे वाहतुकीचा प्रतिटन केवळ १.०६ रुपये खर्च येतो. याशिवाय एक लिटर इंधनाद्वारे एक टन माल रस्तामार्गे २४ कि.मी.पर्यंत, रेल्वेद्वारे ९५ कि.मी., तर जलमार्गे २१५ कि.मी.पर्यंत पोहोचवता येतो, असे ते म्हणाले. देशात असे १११ जलमार्ग विकसित करण्यात आले असून, यात १६२० कि. मी.च्या गंगा जलमार्गाचा समावेश आहे, असे गडकरी यांनी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात सांगितले. जल वाहतुकीसाठी पाच मल्टीमॉडल हब आणि २० वॉटर पोर्टस् बनविण्यात येत असून, ४००० कोटी रुपयांचा हा प्रकल्प २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.