शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

ठाण्यातून होणार जलवाहतूक

By admin | Updated: May 30, 2016 02:32 IST

मागील कित्येक वर्षे कागदावरच असलेल्या जलवाहतूक प्रकल्पाच्या कामाचा नारळ अखेर बुधवारी फुटला

ठाणे : ठाणे महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी ठरलेल्या आणि मागील कित्येक वर्षे कागदावरच असलेल्या जलवाहतूक प्रकल्पाच्या कामाचा नारळ अखेर बुधवारी फुटला. अवघ्या वर्षभरात हे काम मार्गी लागणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. सध्या मुंबई आणि नवी मुंबईला या जलवाहतुकीतून वगळले असले तरी ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरांना ती जोडली जाणार आहे. मालवाहू, प्रवासी आणि पर्यटन अशा तिन्ही स्तरांवर ती सुरू होणार असल्याने रेल्वे आणि रस्त्यांवरील सार्वजनिक वाहतुकीवरील प्रवाशांचा ताण होणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले. जलवाहतुकीसंदर्भात महापालिकेने अर्थसंकल्पातही तरतूद केली होती. तसेच मागील महिन्यांत ती कशी असेल, याविषयीची माहिती आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली होती. शिवाय, केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनीदेखील या प्रकल्पाला चालना देण्याचे संकेत दिले होते. वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाचाच एक भाग असलेल्या या जलवाहतुकीच्या कामाला आता वेग आला असून गायमुख येथे यासाठी जेट्टी बांधण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. सुरु वातीला मुंबई आणि नवी मुंबईपर्यंत ती सुरू करण्याचा पालिकेचा विचार होता. मात्र, या ठिकाणी वाहतूक सुरू करण्यासाठी त्या ठिकाणीदेखील जेट्टी बांधण्याची आवश्यकता असल्याने तूर्तास या दोन शहरांना वगळले आहे. त्यामुळे ठाण्यापासून कल्याण, वसई, मीरा-भार्इंदर, भिवंडी या शहरांपर्यंत जलवाहतूक सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे उपनगर अभियंता अनिल पाटील यांनी दिली. जलवाहतुकीसाठी केंद्र सरकारकडे सहा महिन्यांपूर्वीच प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावामध्ये केंद्र सरकारने अशा प्रकारच्या जलवाहतुकीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार, गायमुख येथे जेट्टी उभारण्यासाठी ठाणे महापालिकेने ११ कोटी मेरीटाइम बोर्डाकडे वर्ग केले असून मेरीटाइम बोर्डाच्या वतीनेच गायमुख जेट्टीचा विकास केला जाणार आहे. (प्रतिनिधी)मालवाहू, प्रवासी आणि पर्यटनमालवाहू जलवाहतूक, प्रवासी आणि पर्यटन अशा तीन स्तरांवर जलवाहतूक सुरू होणार असल्याने पालिकेलादेखील यापासून चांगला महसूल मिळणार आहे. प्रवासी जलवाहतुकीमुळे रस्ते आणि रेल्वेवरील भार कमी होणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेदेखील ठाण्यात जलवाहतुकीचा विकास करण्यात येणार असल्याने पर्यटकांनादेखील ठाण्यात सागरीमार्गे येण्यास वाव मिळणार आहे.रस्त्यांवरील ट्रॅफिक होणार शिफ्टया वाहतुकीमुळे शहरात रस्त्यांवर होणारी ट्रॅफिक यामुळे कमी होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. सध्या ठाण्यातील मुख्य चौक हे वाहनांमुळे गजबजले आहेत. त्यामुळे या वाहनांना किंबहुना खाजगी वाहनचालकांना जलवाहतुकीचा पर्याय दिल्यास अंतर्गत भागांत रस्त्यांवर होणारी वाहतूक कमी होऊन ठाणेकरांना जलवाहतुकीचा एक उत्तम पर्याय उपलब्ध होणार आहे. रेल्वे प्रवाशांचादेखील मोठा भार यामुळे कमी होणार आहे.पालिकेच्या उत्पन्नातमोठी भर पडणार...रस्ते वाहतुकीच्या तुलनेत जलवाहतूक ५० टक्के स्वस्त असल्याने ठाण्यातून एकदा जलवाहतुकीला सुरुवात झाल्यानंतर माल वाहण्यासाठीही तिचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नातदेखील मोठी भर पडणार आहे.१३ ठिकाणी उभारली जाणार जेट्टीजलवाहतुकीचे जाळे पसरवण्यासाठी ठाण्यात १३ ठिकाणी जेट्टी उभारण्यात येणार आहेत. यामध्ये वाघबीळ, मुंब्रा, कळवा, कासारवडवली, ओवळा आणि ज्या ठिकाणी खाडीकिनारे आहेत, अशा ठिकाणी उभारण्यात येणार आहे.