शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबईची छाप

By admin | Updated: May 5, 2017 04:17 IST

स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबई महापालिकेला महाराष्ट्रात प्रथम व देशात ८व्या क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे

नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबई महापालिकेला महाराष्ट्रात प्रथम व देशात ८व्या क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. २००२पासून नवी मुंबई महापालिकेने स्वच्छतेविषयी मिळविलेला सलग चौथा पुरस्कार असून पाणी, घनकचरासह विविध क्षेत्रांतील एकूण १४ महत्त्वाचे पुरस्कार मिळविले आहेत. दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये महापौर सुधाकर सोनावणे व आयुक्त रामास्वामी एन. यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महापालिकेची स्थापना झाल्यापासून नेहमीच स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले आहे. २००२, २००३ व २००५ असे तीन वेळा राज्य शासनाचे पुरस्कार मिळविल्यानंतर शासन निर्देशानुसार केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग घेतला होता. शहरात केलेल्या सर्वेक्षणाप्रमाणे ३३९८ कुटुंबे उघड्यावर शौचास बसत असल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे १९३५ घरगुती शौचालये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. ज्या ठिकाणी वैयक्तिक शौचालय बांधणे शक्य नाही अशा ठिकाणी ६९ सामुदायिक शौचालये उभारून ७१९ सीट्स उपलब्ध करून देण्यात आल्या. शहरात विविध ठिकाणी ३६९ सामुदायिक शौचालये व १३७ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यामध्ये ५५६७ सीट्स उपलब्ध आहेत. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत आॅक्टोबर २०१४ ते जानेवारी २०१७ या कालावधीमध्ये ९३ सामुदायिक शौचालये, २० ई टॉयलेट्स व महिलांसाठी ६ स्मार्ट एसएचई टॉयलेट उपलब्ध करून देण्यात आली. बेलापूरमधील रमाबाई आंबेडकरनगरमध्ये ५३, ऐरोलीतील समता नगर, ऐरोली नाका, साईनाथवाडी व गणपती कॉलनी येथे ३१२ अशी एकूण ३६५ वैयक्तिक घरगुती शौचालये बांधण्यात आली. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत २०१५-१६मध्ये ६५ स्वच्छता मोहिमा राबविण्यात आल्या व ३ लाख २५ हजार ५५ मनुष्यतास श्रमदान करण्यात आले. २०१६ - १७ या वर्षामध्ये १७० विशेष मोहिमांचे आयोजन करून लोकसहभागाच्या माध्यमातून १ लाख ६५ हजार ७८१ मनुष्यतास श्रमदान करण्यात आले. स्वच्छतेबरोबर प्लॅस्टिकमुक्त नवी मुंबई संकल्पना राबविण्यात आली. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर प्रतिबंध आणण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्लॅस्टिकवर प्रक्रिया करून प्लॅस्टिक अ‍ॅग्लो तयार करण्यात आला. त्याचा वापर करून एमआयडीसीतील १० रस्ते तयार झाले. कचराकुंडीमुक्त शहरासाठी ७००पैकी २०० ठिकाणच्या कम्युनिटी बिन्स काढण्यात आल्या. तसेच शहरातील कचरा प्रत्यक्षात उचलण्यात आला की नाही याविषयी सर्व वाहनांना जीपीएस व जीपीआरएस प्रणाली बसविण्यात आली असून, त्याद्वारे नियंत्रण करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)देशातील आदर्श प्रकल्प स्वच्छतेविषयी राज्यातील प्रथम क्रमांक मिळालेल्या नवी मुंबईमध्ये देशातील सर्वांत आदर्श डम्पिंग ग्राउंड आहे. शास्त्रोक्त पद्धतीने घनकचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. शहरातील १०० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात असून, देशातील सर्वांत अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रे पालिकेने उभारलेली आहेत. कचरा उचलण्यापासून ते त्यांची विल्हेवाट लावण्यापर्यंत अत्यंत चांगली यंत्रणा असल्याने पालिकेची या पुरस्कारासाठी निवड झाली.नवी मुंबईला मिळालेला हा बहुमान लोकप्रतिनिधी, प्रशासन व सर्व नागरिकांचा आहे. भविष्यात पालिकेचे मानांकन सतत उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातील. - रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई महापालिका हा पुरस्कार नवी मुुंबईकरांना समर्पित करत आहे. सफाई कामगार, प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी घेतलेल्या परिश्रमामुळे यश आले असून, भविष्यात अजून चांगले काम करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. - सुधाकर सोनावणे, महापौर, नवी मुंबई