शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबईची छाप

By admin | Updated: May 5, 2017 04:17 IST

स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबई महापालिकेला महाराष्ट्रात प्रथम व देशात ८व्या क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे

नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबई महापालिकेला महाराष्ट्रात प्रथम व देशात ८व्या क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. २००२पासून नवी मुंबई महापालिकेने स्वच्छतेविषयी मिळविलेला सलग चौथा पुरस्कार असून पाणी, घनकचरासह विविध क्षेत्रांतील एकूण १४ महत्त्वाचे पुरस्कार मिळविले आहेत. दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये महापौर सुधाकर सोनावणे व आयुक्त रामास्वामी एन. यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महापालिकेची स्थापना झाल्यापासून नेहमीच स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले आहे. २००२, २००३ व २००५ असे तीन वेळा राज्य शासनाचे पुरस्कार मिळविल्यानंतर शासन निर्देशानुसार केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग घेतला होता. शहरात केलेल्या सर्वेक्षणाप्रमाणे ३३९८ कुटुंबे उघड्यावर शौचास बसत असल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे १९३५ घरगुती शौचालये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. ज्या ठिकाणी वैयक्तिक शौचालय बांधणे शक्य नाही अशा ठिकाणी ६९ सामुदायिक शौचालये उभारून ७१९ सीट्स उपलब्ध करून देण्यात आल्या. शहरात विविध ठिकाणी ३६९ सामुदायिक शौचालये व १३७ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यामध्ये ५५६७ सीट्स उपलब्ध आहेत. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत आॅक्टोबर २०१४ ते जानेवारी २०१७ या कालावधीमध्ये ९३ सामुदायिक शौचालये, २० ई टॉयलेट्स व महिलांसाठी ६ स्मार्ट एसएचई टॉयलेट उपलब्ध करून देण्यात आली. बेलापूरमधील रमाबाई आंबेडकरनगरमध्ये ५३, ऐरोलीतील समता नगर, ऐरोली नाका, साईनाथवाडी व गणपती कॉलनी येथे ३१२ अशी एकूण ३६५ वैयक्तिक घरगुती शौचालये बांधण्यात आली. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत २०१५-१६मध्ये ६५ स्वच्छता मोहिमा राबविण्यात आल्या व ३ लाख २५ हजार ५५ मनुष्यतास श्रमदान करण्यात आले. २०१६ - १७ या वर्षामध्ये १७० विशेष मोहिमांचे आयोजन करून लोकसहभागाच्या माध्यमातून १ लाख ६५ हजार ७८१ मनुष्यतास श्रमदान करण्यात आले. स्वच्छतेबरोबर प्लॅस्टिकमुक्त नवी मुंबई संकल्पना राबविण्यात आली. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर प्रतिबंध आणण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्लॅस्टिकवर प्रक्रिया करून प्लॅस्टिक अ‍ॅग्लो तयार करण्यात आला. त्याचा वापर करून एमआयडीसीतील १० रस्ते तयार झाले. कचराकुंडीमुक्त शहरासाठी ७००पैकी २०० ठिकाणच्या कम्युनिटी बिन्स काढण्यात आल्या. तसेच शहरातील कचरा प्रत्यक्षात उचलण्यात आला की नाही याविषयी सर्व वाहनांना जीपीएस व जीपीआरएस प्रणाली बसविण्यात आली असून, त्याद्वारे नियंत्रण करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)देशातील आदर्श प्रकल्प स्वच्छतेविषयी राज्यातील प्रथम क्रमांक मिळालेल्या नवी मुंबईमध्ये देशातील सर्वांत आदर्श डम्पिंग ग्राउंड आहे. शास्त्रोक्त पद्धतीने घनकचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. शहरातील १०० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात असून, देशातील सर्वांत अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रे पालिकेने उभारलेली आहेत. कचरा उचलण्यापासून ते त्यांची विल्हेवाट लावण्यापर्यंत अत्यंत चांगली यंत्रणा असल्याने पालिकेची या पुरस्कारासाठी निवड झाली.नवी मुंबईला मिळालेला हा बहुमान लोकप्रतिनिधी, प्रशासन व सर्व नागरिकांचा आहे. भविष्यात पालिकेचे मानांकन सतत उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातील. - रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई महापालिका हा पुरस्कार नवी मुुंबईकरांना समर्पित करत आहे. सफाई कामगार, प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी घेतलेल्या परिश्रमामुळे यश आले असून, भविष्यात अजून चांगले काम करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. - सुधाकर सोनावणे, महापौर, नवी मुंबई