शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबईची छाप

By admin | Updated: May 5, 2017 04:17 IST

स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबई महापालिकेला महाराष्ट्रात प्रथम व देशात ८व्या क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे

नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबई महापालिकेला महाराष्ट्रात प्रथम व देशात ८व्या क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. २००२पासून नवी मुंबई महापालिकेने स्वच्छतेविषयी मिळविलेला सलग चौथा पुरस्कार असून पाणी, घनकचरासह विविध क्षेत्रांतील एकूण १४ महत्त्वाचे पुरस्कार मिळविले आहेत. दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये महापौर सुधाकर सोनावणे व आयुक्त रामास्वामी एन. यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महापालिकेची स्थापना झाल्यापासून नेहमीच स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले आहे. २००२, २००३ व २००५ असे तीन वेळा राज्य शासनाचे पुरस्कार मिळविल्यानंतर शासन निर्देशानुसार केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग घेतला होता. शहरात केलेल्या सर्वेक्षणाप्रमाणे ३३९८ कुटुंबे उघड्यावर शौचास बसत असल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे १९३५ घरगुती शौचालये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. ज्या ठिकाणी वैयक्तिक शौचालय बांधणे शक्य नाही अशा ठिकाणी ६९ सामुदायिक शौचालये उभारून ७१९ सीट्स उपलब्ध करून देण्यात आल्या. शहरात विविध ठिकाणी ३६९ सामुदायिक शौचालये व १३७ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यामध्ये ५५६७ सीट्स उपलब्ध आहेत. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत आॅक्टोबर २०१४ ते जानेवारी २०१७ या कालावधीमध्ये ९३ सामुदायिक शौचालये, २० ई टॉयलेट्स व महिलांसाठी ६ स्मार्ट एसएचई टॉयलेट उपलब्ध करून देण्यात आली. बेलापूरमधील रमाबाई आंबेडकरनगरमध्ये ५३, ऐरोलीतील समता नगर, ऐरोली नाका, साईनाथवाडी व गणपती कॉलनी येथे ३१२ अशी एकूण ३६५ वैयक्तिक घरगुती शौचालये बांधण्यात आली. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत २०१५-१६मध्ये ६५ स्वच्छता मोहिमा राबविण्यात आल्या व ३ लाख २५ हजार ५५ मनुष्यतास श्रमदान करण्यात आले. २०१६ - १७ या वर्षामध्ये १७० विशेष मोहिमांचे आयोजन करून लोकसहभागाच्या माध्यमातून १ लाख ६५ हजार ७८१ मनुष्यतास श्रमदान करण्यात आले. स्वच्छतेबरोबर प्लॅस्टिकमुक्त नवी मुंबई संकल्पना राबविण्यात आली. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर प्रतिबंध आणण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्लॅस्टिकवर प्रक्रिया करून प्लॅस्टिक अ‍ॅग्लो तयार करण्यात आला. त्याचा वापर करून एमआयडीसीतील १० रस्ते तयार झाले. कचराकुंडीमुक्त शहरासाठी ७००पैकी २०० ठिकाणच्या कम्युनिटी बिन्स काढण्यात आल्या. तसेच शहरातील कचरा प्रत्यक्षात उचलण्यात आला की नाही याविषयी सर्व वाहनांना जीपीएस व जीपीआरएस प्रणाली बसविण्यात आली असून, त्याद्वारे नियंत्रण करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)देशातील आदर्श प्रकल्प स्वच्छतेविषयी राज्यातील प्रथम क्रमांक मिळालेल्या नवी मुंबईमध्ये देशातील सर्वांत आदर्श डम्पिंग ग्राउंड आहे. शास्त्रोक्त पद्धतीने घनकचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. शहरातील १०० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात असून, देशातील सर्वांत अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रे पालिकेने उभारलेली आहेत. कचरा उचलण्यापासून ते त्यांची विल्हेवाट लावण्यापर्यंत अत्यंत चांगली यंत्रणा असल्याने पालिकेची या पुरस्कारासाठी निवड झाली.नवी मुंबईला मिळालेला हा बहुमान लोकप्रतिनिधी, प्रशासन व सर्व नागरिकांचा आहे. भविष्यात पालिकेचे मानांकन सतत उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातील. - रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई महापालिका हा पुरस्कार नवी मुुंबईकरांना समर्पित करत आहे. सफाई कामगार, प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी घेतलेल्या परिश्रमामुळे यश आले असून, भविष्यात अजून चांगले काम करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. - सुधाकर सोनावणे, महापौर, नवी मुंबई