शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
4
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
5
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
6
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
7
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
8
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
9
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
10
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
11
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
12
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
13
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
14
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
15
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
16
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
17
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
18
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
19
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
20
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...

स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबईची छाप

By admin | Updated: May 5, 2017 04:17 IST

स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबई महापालिकेला महाराष्ट्रात प्रथम व देशात ८व्या क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे

नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबई महापालिकेला महाराष्ट्रात प्रथम व देशात ८व्या क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. २००२पासून नवी मुंबई महापालिकेने स्वच्छतेविषयी मिळविलेला सलग चौथा पुरस्कार असून पाणी, घनकचरासह विविध क्षेत्रांतील एकूण १४ महत्त्वाचे पुरस्कार मिळविले आहेत. दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये महापौर सुधाकर सोनावणे व आयुक्त रामास्वामी एन. यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महापालिकेची स्थापना झाल्यापासून नेहमीच स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले आहे. २००२, २००३ व २००५ असे तीन वेळा राज्य शासनाचे पुरस्कार मिळविल्यानंतर शासन निर्देशानुसार केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग घेतला होता. शहरात केलेल्या सर्वेक्षणाप्रमाणे ३३९८ कुटुंबे उघड्यावर शौचास बसत असल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे १९३५ घरगुती शौचालये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. ज्या ठिकाणी वैयक्तिक शौचालय बांधणे शक्य नाही अशा ठिकाणी ६९ सामुदायिक शौचालये उभारून ७१९ सीट्स उपलब्ध करून देण्यात आल्या. शहरात विविध ठिकाणी ३६९ सामुदायिक शौचालये व १३७ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यामध्ये ५५६७ सीट्स उपलब्ध आहेत. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत आॅक्टोबर २०१४ ते जानेवारी २०१७ या कालावधीमध्ये ९३ सामुदायिक शौचालये, २० ई टॉयलेट्स व महिलांसाठी ६ स्मार्ट एसएचई टॉयलेट उपलब्ध करून देण्यात आली. बेलापूरमधील रमाबाई आंबेडकरनगरमध्ये ५३, ऐरोलीतील समता नगर, ऐरोली नाका, साईनाथवाडी व गणपती कॉलनी येथे ३१२ अशी एकूण ३६५ वैयक्तिक घरगुती शौचालये बांधण्यात आली. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत २०१५-१६मध्ये ६५ स्वच्छता मोहिमा राबविण्यात आल्या व ३ लाख २५ हजार ५५ मनुष्यतास श्रमदान करण्यात आले. २०१६ - १७ या वर्षामध्ये १७० विशेष मोहिमांचे आयोजन करून लोकसहभागाच्या माध्यमातून १ लाख ६५ हजार ७८१ मनुष्यतास श्रमदान करण्यात आले. स्वच्छतेबरोबर प्लॅस्टिकमुक्त नवी मुंबई संकल्पना राबविण्यात आली. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर प्रतिबंध आणण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्लॅस्टिकवर प्रक्रिया करून प्लॅस्टिक अ‍ॅग्लो तयार करण्यात आला. त्याचा वापर करून एमआयडीसीतील १० रस्ते तयार झाले. कचराकुंडीमुक्त शहरासाठी ७००पैकी २०० ठिकाणच्या कम्युनिटी बिन्स काढण्यात आल्या. तसेच शहरातील कचरा प्रत्यक्षात उचलण्यात आला की नाही याविषयी सर्व वाहनांना जीपीएस व जीपीआरएस प्रणाली बसविण्यात आली असून, त्याद्वारे नियंत्रण करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)देशातील आदर्श प्रकल्प स्वच्छतेविषयी राज्यातील प्रथम क्रमांक मिळालेल्या नवी मुंबईमध्ये देशातील सर्वांत आदर्श डम्पिंग ग्राउंड आहे. शास्त्रोक्त पद्धतीने घनकचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. शहरातील १०० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात असून, देशातील सर्वांत अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रे पालिकेने उभारलेली आहेत. कचरा उचलण्यापासून ते त्यांची विल्हेवाट लावण्यापर्यंत अत्यंत चांगली यंत्रणा असल्याने पालिकेची या पुरस्कारासाठी निवड झाली.नवी मुंबईला मिळालेला हा बहुमान लोकप्रतिनिधी, प्रशासन व सर्व नागरिकांचा आहे. भविष्यात पालिकेचे मानांकन सतत उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातील. - रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई महापालिका हा पुरस्कार नवी मुुंबईकरांना समर्पित करत आहे. सफाई कामगार, प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी घेतलेल्या परिश्रमामुळे यश आले असून, भविष्यात अजून चांगले काम करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. - सुधाकर सोनावणे, महापौर, नवी मुंबई