शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावले नवी मुंबईकर

By admin | Updated: April 18, 2016 01:37 IST

दुष्काळामुळे तहानेने व्याकूळ झालेल्या मराठवाड्यातील रहिवाशांची व मुक्या प्राण्यांची तहान भागविण्याचा एक छोटेखानी प्रयत्न नवी मुंबईत वास्तव्याला असलेल्या मराठवाड्यातील

- कमलाकर कांबळे,  नवी मुबंईदुष्काळामुळे तहानेने व्याकूळ झालेल्या मराठवाड्यातील रहिवाशांची व मुक्या प्राण्यांची तहान भागविण्याचा एक छोटेखानी प्रयत्न नवी मुंबईत वास्तव्याला असलेल्या मराठवाड्यातील रहिवाशांनी केला आहे. मराठवाडा मित्र परिवार या संस्थेने लातूर जिल्ह्यातील एक गाव आणि बीड जिल्ह्यातील मयूर अभयारण्यातील प्राण्यांना स्वखर्चातून पाणीपुरवठा सुरू केला आहे.नोकरी-व्यवसायानिमित्त नवी मुंबईत स्थायिक झालेल्या मराठवाडावासीयांनी चार वर्षांपूर्वी या संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून विविध विधायक उपक्रम राबविले जातात. भीषण दुष्काळामुळे निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीत मराठवाड्यातील आपल्या बांधवांना जमेल तेवढी मदत करण्याचे संस्थेने ठरविले. संस्थेचे डॉ. व्यंकट आलाट, प्रा. ज्ञानोबा घार, प्रवीण मुक्कावार, अभिजित मळगे, सुरेश गुडपे, गोविंद बिरादार व विनोद चेडे आदींनी या कामासाठी आग्रही भूमिका घेतली. या विधायक कामासाठी लोकांकडून निधी संकलित करण्याऐवजी संस्थेकडे जमा असलेल्या निधीचा विनियोग करण्याचे ठरले. त्यानुसार जमा असलेल्या रकमेतून नाम संस्थेला ५१ हजारांचा दुष्काळ निधी देण्यात आला. त्यानंतर उर्वरित रकमेतून लातूर जिल्ह्यातील चांडेश्वेवर या गावाला १ एप्रिलपासून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. लवकरच आणखी दोन गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मनोज सोमवंशी यांनी सांगितले. दुष्काळाची सर्वाधिक झळ लातूर जिल्ह्याला बसली आहे. येथील लोकांना घोटभर पाण्याच्या शोधात मैलाची पायपीट करावी लागत आहे. मुक्या प्राण्यांचे हाल सुरू आहेत. चारा व पाण्याअभावी अनेक प्राण्यांनी माना टाकल्या आहेत. या भीषण परिस्थितीचा सामना करणाऱ्या लातूरकरांच्या मदतीला अनेक सामाजिक संस्था धावून आल्या. मयूर अभयारण्यातील प्राण्यांनाही दिलासाबीड जिल्ह्यातील नायगाव येथे ३००० हेक्टरवर मयूर अभयारण्यात मोर, कोल्हे, लांडगा, रानमांजर, हरीण, काळवीट आदी वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. परंतु दुष्काळामुळे पाण्याअभावी या प्राण्यांचेही हाल सुरू आहेत. मराठवाडा मित्र परिवार या संस्थेने नायगावचे प्राणी मित्र सिध्दार्थ सोनवणे यांच्या सहकार्याने कोरड पडलेल्या मयूर अभयारण्यातील पाणवठ्यांना संस्थेने पाणी उपलब्ध करून दिले आहे.