शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावले नवी मुंबईकर

By admin | Updated: April 18, 2016 01:37 IST

दुष्काळामुळे तहानेने व्याकूळ झालेल्या मराठवाड्यातील रहिवाशांची व मुक्या प्राण्यांची तहान भागविण्याचा एक छोटेखानी प्रयत्न नवी मुंबईत वास्तव्याला असलेल्या मराठवाड्यातील

- कमलाकर कांबळे,  नवी मुबंईदुष्काळामुळे तहानेने व्याकूळ झालेल्या मराठवाड्यातील रहिवाशांची व मुक्या प्राण्यांची तहान भागविण्याचा एक छोटेखानी प्रयत्न नवी मुंबईत वास्तव्याला असलेल्या मराठवाड्यातील रहिवाशांनी केला आहे. मराठवाडा मित्र परिवार या संस्थेने लातूर जिल्ह्यातील एक गाव आणि बीड जिल्ह्यातील मयूर अभयारण्यातील प्राण्यांना स्वखर्चातून पाणीपुरवठा सुरू केला आहे.नोकरी-व्यवसायानिमित्त नवी मुंबईत स्थायिक झालेल्या मराठवाडावासीयांनी चार वर्षांपूर्वी या संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून विविध विधायक उपक्रम राबविले जातात. भीषण दुष्काळामुळे निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीत मराठवाड्यातील आपल्या बांधवांना जमेल तेवढी मदत करण्याचे संस्थेने ठरविले. संस्थेचे डॉ. व्यंकट आलाट, प्रा. ज्ञानोबा घार, प्रवीण मुक्कावार, अभिजित मळगे, सुरेश गुडपे, गोविंद बिरादार व विनोद चेडे आदींनी या कामासाठी आग्रही भूमिका घेतली. या विधायक कामासाठी लोकांकडून निधी संकलित करण्याऐवजी संस्थेकडे जमा असलेल्या निधीचा विनियोग करण्याचे ठरले. त्यानुसार जमा असलेल्या रकमेतून नाम संस्थेला ५१ हजारांचा दुष्काळ निधी देण्यात आला. त्यानंतर उर्वरित रकमेतून लातूर जिल्ह्यातील चांडेश्वेवर या गावाला १ एप्रिलपासून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. लवकरच आणखी दोन गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मनोज सोमवंशी यांनी सांगितले. दुष्काळाची सर्वाधिक झळ लातूर जिल्ह्याला बसली आहे. येथील लोकांना घोटभर पाण्याच्या शोधात मैलाची पायपीट करावी लागत आहे. मुक्या प्राण्यांचे हाल सुरू आहेत. चारा व पाण्याअभावी अनेक प्राण्यांनी माना टाकल्या आहेत. या भीषण परिस्थितीचा सामना करणाऱ्या लातूरकरांच्या मदतीला अनेक सामाजिक संस्था धावून आल्या. मयूर अभयारण्यातील प्राण्यांनाही दिलासाबीड जिल्ह्यातील नायगाव येथे ३००० हेक्टरवर मयूर अभयारण्यात मोर, कोल्हे, लांडगा, रानमांजर, हरीण, काळवीट आदी वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. परंतु दुष्काळामुळे पाण्याअभावी या प्राण्यांचेही हाल सुरू आहेत. मराठवाडा मित्र परिवार या संस्थेने नायगावचे प्राणी मित्र सिध्दार्थ सोनवणे यांच्या सहकार्याने कोरड पडलेल्या मयूर अभयारण्यातील पाणवठ्यांना संस्थेने पाणी उपलब्ध करून दिले आहे.