शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईकरांनी केला स्वच्छ शहराचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2016 02:55 IST

गांधी यांच्या १४७ व्या जयंतीनिमित्त आयोजित स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शहरात स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली.

नवी मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १४७ व्या जयंतीनिमित्त आयोजित स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शहरात स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली. महानगरपालिका, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांच्या वतीने रविवारी स्वच्छता मोहीम, जनजागृती रॅली तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी स्वच्छ आणि हागणदारीमुक्त शहराचा निर्धार करण्यात आला. नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी श्रमदान करून स्वच्छ, सुंदर व हागणदारीमुक्त शहराबाबत जनजागृती केली. महापौर सुधाकर सोनावणे यांनी आंबेडकरनगर, राबाडे येथील स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन नागरिकांनी कमीत कमी कचरा निर्माण करून उघड्यावर कचरा टाकणार नाही अशी सवय लावून घेण्याचे आवाहन केले. उपमहापौर अविनाश लाड यांनीही वाशी येथील मिनी सी शोअर परिसरातील मोहिमेप्रसंगी ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याचे व शहर स्वच्छतेत संपूर्ण योगदान देण्याचे आवाहन नागरिकांना केले. बेलापूर विभागात किल्ले गावठाण, गोवर्धनी माता मंदिर परिसर, नेरु ळ विभागात सेक्टर ३, बस डेपो, वाशी विभागात मिनी सी शोअर परिसर, तुर्भे विभागात ए.पी.एम.सी. मार्केट सेक्टर १९ परिसर, घणसोली विभागात मुंब्रादेवी निब्बाण टेकडी परिसर, त्याचप्रमाणे कोपरखैरणे विभागात कोपरखैरणे रेल्वे स्टेशन परिसर, ऐरोली विभागात सेक्टर ३ बसडेपो, ऐरोली रेल्वे स्टेशन आणि भाजी मार्केट याठिकाणी व दिघा विभागात हिंदमाता शाळेजवळ, विष्णुनगर बौध्द शाखेजवळ, मुकुंद कंपनी गेटजवळ विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शहरातील सर्वच विभागात स्वच्छतेची सामूहिक शपथ ग्रहण करण्यात आली, तसेच शहर स्वच्छ राखण्याचा निर्धार करण्यात आला.या मोहिमेला अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व रमेश चव्हाण, परिमंडळ १ चे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार व परिमंडळ २ चे उपआयुक्त अंबरीश पटनिगीरे, घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त तुषार पवार, स्वच्छ महाराष्ट्र अभियान उपआयुक्त रिता मैत्रेवार यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)>सीबीडीतील सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ सेक्टर ८ए व बी यांच्या वतीने तसेच स्वीकृत नगरसेवक साबू डॅनियल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बॉम्बे कॅथलिक सभेच्या वतीने वाशी येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. वाशीतील फादर एग्नेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या रॅलीत सहभागी होवून शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा संकल्प केला. >नेरूळ येथील दिल्ली पब्लिक स्कूलच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी गांधीजींची आवडती भजने सादर केली. गांधीजींची शिकवण, त्यांचे विचार याबाबत शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली.