शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

नवी मुंबईकरांनी केला स्वच्छ शहराचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2016 02:55 IST

गांधी यांच्या १४७ व्या जयंतीनिमित्त आयोजित स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शहरात स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली.

नवी मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १४७ व्या जयंतीनिमित्त आयोजित स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शहरात स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली. महानगरपालिका, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांच्या वतीने रविवारी स्वच्छता मोहीम, जनजागृती रॅली तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी स्वच्छ आणि हागणदारीमुक्त शहराचा निर्धार करण्यात आला. नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी श्रमदान करून स्वच्छ, सुंदर व हागणदारीमुक्त शहराबाबत जनजागृती केली. महापौर सुधाकर सोनावणे यांनी आंबेडकरनगर, राबाडे येथील स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन नागरिकांनी कमीत कमी कचरा निर्माण करून उघड्यावर कचरा टाकणार नाही अशी सवय लावून घेण्याचे आवाहन केले. उपमहापौर अविनाश लाड यांनीही वाशी येथील मिनी सी शोअर परिसरातील मोहिमेप्रसंगी ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याचे व शहर स्वच्छतेत संपूर्ण योगदान देण्याचे आवाहन नागरिकांना केले. बेलापूर विभागात किल्ले गावठाण, गोवर्धनी माता मंदिर परिसर, नेरु ळ विभागात सेक्टर ३, बस डेपो, वाशी विभागात मिनी सी शोअर परिसर, तुर्भे विभागात ए.पी.एम.सी. मार्केट सेक्टर १९ परिसर, घणसोली विभागात मुंब्रादेवी निब्बाण टेकडी परिसर, त्याचप्रमाणे कोपरखैरणे विभागात कोपरखैरणे रेल्वे स्टेशन परिसर, ऐरोली विभागात सेक्टर ३ बसडेपो, ऐरोली रेल्वे स्टेशन आणि भाजी मार्केट याठिकाणी व दिघा विभागात हिंदमाता शाळेजवळ, विष्णुनगर बौध्द शाखेजवळ, मुकुंद कंपनी गेटजवळ विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शहरातील सर्वच विभागात स्वच्छतेची सामूहिक शपथ ग्रहण करण्यात आली, तसेच शहर स्वच्छ राखण्याचा निर्धार करण्यात आला.या मोहिमेला अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व रमेश चव्हाण, परिमंडळ १ चे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार व परिमंडळ २ चे उपआयुक्त अंबरीश पटनिगीरे, घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त तुषार पवार, स्वच्छ महाराष्ट्र अभियान उपआयुक्त रिता मैत्रेवार यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)>सीबीडीतील सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ सेक्टर ८ए व बी यांच्या वतीने तसेच स्वीकृत नगरसेवक साबू डॅनियल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बॉम्बे कॅथलिक सभेच्या वतीने वाशी येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. वाशीतील फादर एग्नेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या रॅलीत सहभागी होवून शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा संकल्प केला. >नेरूळ येथील दिल्ली पब्लिक स्कूलच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी गांधीजींची आवडती भजने सादर केली. गांधीजींची शिकवण, त्यांचे विचार याबाबत शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली.