शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नवी मुंबई : वृद्धाचा खून करणा-या आरोपीला जन्मठेप, पाच वर्षांपूर्वी पैशासाठी झाली होती हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 03:30 IST

नवी मुंबईतील महापे येथील एका वृद्धाच्या खून प्रकरणातील आरोपीस ठाणे न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मोबाइल फोन आणि सोनसाखळीसाठी पाच आरोपींनी सहा वर्षांपूर्वी हा खून केला होता.

ठाणे : नवी मुंबईतील महापे येथील एका वृद्धाच्या खून प्रकरणातील आरोपीस ठाणे न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मोबाइल फोन आणि सोनसाखळीसाठी पाच आरोपींनी सहा वर्षांपूर्वी हा खून केला होता.महापे येथील हनुमाननगरात राहणारे अ‍ॅड. बलराज वाघमारे हे नवी मुंबई न्यायालयात वकिली करतात. त्यांचे वडील भीमराव वाघमारे (६२) हे महापे येथील एमआयडीसीतील केम बॉण्ड केमिकल्स लिमिटेडमध्ये माळी काम करायचे. सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० ही त्यांची नोकरीची वेळ होती. ११ मे २०१२ रोजी भीमराव वाघमारे नेहमीप्रमाणे सकाळी ८ वाजताच्या सुमारास कंपनीमध्ये कामाला गेले. वाटेत मार्कवन कंपनीजवळ त्यांना आरोपींनी अडवले. त्यांच्याजवळील मोबाइल फोन, दीड तोळ्याची सोन्याची चेन आणि मनगटी घड्याळ घेऊन धारदार शस्त्रांनी आरोपींनी त्यांच्यावर हल्ला चढवला. त्याच दिवशी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास अ‍ॅड. बलराज वाघमारे हे वाशी-सीबीडी न्यायालयात असताना तुर्भे पोलिसांनी मोबाइल फोनवर संपर्क साधून त्यांच्या वडिलांच्या खुनाची माहिती दिली. अ‍ॅड. वाघमारे हे घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांच्या वडिलांचा मृतदेह मार्कवन कंपनीजवळ आढळला. त्यांच्या छातीजवळ आणि कमरेवर तीक्ष्ण शस्त्राने भोसकल्याच्या ७ खुणा होत्या.तुर्भे पोलिसांनी या प्रकरणी भादंविचे कलम ३९७ आणि ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून तपास केला. डोंबिवली येथील अंकुश संजय मेढेकर (२२) आणि सुधीर वसंत शेलार (२२), कल्याण येथील प्रीतेश प्रल्हाद मोरे (२५), तसेच तुर्भे येथील राजू प्रल्हाद पोळ (३०) याच्यासह दिवा येथील एका बाल गुन्हेगारास पोलिसांनी या प्रकरणी काही दिवसांतच अटक केली. तेव्हापासून खटल्याचा निकाल लागेपर्यंत ते तुरुंगातच होते. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस. भैसारे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. जिल्हा सरकारी वकील संगीता फड यांनी १२ साक्षीदार तपासले. सर्व साक्षीदार शेवटपर्यंत त्यांच्या साक्षीवर कायम होते.उर्वरित आरोपी दोषमुक्त -भीमराव वाघमारे यांच्या गळ्यातील सोनसाखळी, त्यांचा मोबाइल फोन आदी साहित्य पोलिसांनी आरोपींजवळून हस्तगत केले. ते आरोपींजवळ कसे आले, हा प्रश्न आरोपींकडून शेवटपर्यंत अनुत्तरित राहिला. साक्षीदारांचे जबाब व पुरावे ग्राह्य धरून न्या. ए.एस. भैसारे यांनी शुक्रवारी अंकुश मेढेकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. उर्वरित आरोपींना न्यायालयाने दोषमुक्त केले.

टॅग्स :MurderखूनNavi Mumbaiनवी मुंबईCourtन्यायालय