शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

निसर्ग संवर्धन मोठे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 05:46 IST

औद्योगिकीकरण थांबवायला हवे. मेट्रो किंवा कोणताही प्रकल्प आता केला जाऊ शकत नाही. दरवर्षी तापमान वाढणार आहे. मानवजातीच्या उच्चाटनाची प्रक्रि या येत्या ४-५ वर्षांत पृथ्वीवर सुरू होणार आहे.

- गिरीश राऊतप्रदूषण हा जगभरात भेडसावणारा प्रश्न आहे. उद्योगधंदे वाढले, डोंगर पोखरले, सर्वत्र सिमेंटची घरे झाली, पावसाचे प्रमाणही कमी झाले, हवेत कार्बन वाढले, याचा परिणाम पर्यावरण ºहासात झाला. परिणामी, पर्यावरण संवर्धन हे मोठे आव्हान आहे. हिमस्खलनाची ही धोक्याची घंटा असून, आपण वेळेतच सावध होत पर्यावरण संवर्धनासाठी तत्परतेने पावले उचलली पाहिजेत, अन्यथा पृथ्वीचा विनाश होईल. २०२०मध्ये मानवजात वाचविण्यासाठी नियंत्रित करावयाच्या २ अंश वाढीची मर्यादा ओलांडली जाणार आहे. प्रत्येक वर्षी १/५ अंशाची वाढ पृथ्वीच्या सरासरी तापमानात होत असल्याने, मानवजात व जीवसृष्टी नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी, पर्यावरणाचे संवर्धन करणे हे आपल्यासमोरील आव्हान आहे.नरिमन पॉइंट ते कांदिवलीपर्यंत २९.२२ किलोमीटर सागरी मार्ग म्हणजेच कोस्टल रोड बांधताना, पर्यावरणाची काळजी घेणे हे आपल्यासमोरचे आव्हान आहे. पर्यावरणाचा विचार करता, मुंबईच्या मातीची वैशिष्ट्ये लक्षात घेता, मुंबईतील मातीत रुजेल, वाढेल आणि अधिक घट्टपणे मूळ धरेल अशी झाडे लावणे गरजेचे आहे. तामण, बहावा, करंज, बकुळ, समुद्रफूल, कडुनिंब यासारखी झाडे लावली पाहिजेत, अशी झाडे लावणे आपल्यासाठी संधी आहे. गुलमोहर, सोनमोहर, पर्जन्य वृक्ष यासारखी झाडे लावणे शक्यतो टाळले पाहिजे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विकास आराखड्यात पर्यावरणाकडे संपूर्णत: दुर्लक्ष केले आहे. परिणामी, येथे पर्यावरणाचे संवर्धन करणे आपल्यासमोरील आव्हान आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने बांधण्यात येणाºया मुंबई ट्रान्स हार्बर लिंकदरम्यान पर्यावरणाची हानी होणार आहे. ही हानी रोखणे हे आव्हान आहे.(लेखक पर्यावरणतज्ज्ञ आहेत.)

टॅग्स :newsबातम्या