शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

निसर्ग संवर्धन मोठे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 05:46 IST

औद्योगिकीकरण थांबवायला हवे. मेट्रो किंवा कोणताही प्रकल्प आता केला जाऊ शकत नाही. दरवर्षी तापमान वाढणार आहे. मानवजातीच्या उच्चाटनाची प्रक्रि या येत्या ४-५ वर्षांत पृथ्वीवर सुरू होणार आहे.

- गिरीश राऊतप्रदूषण हा जगभरात भेडसावणारा प्रश्न आहे. उद्योगधंदे वाढले, डोंगर पोखरले, सर्वत्र सिमेंटची घरे झाली, पावसाचे प्रमाणही कमी झाले, हवेत कार्बन वाढले, याचा परिणाम पर्यावरण ºहासात झाला. परिणामी, पर्यावरण संवर्धन हे मोठे आव्हान आहे. हिमस्खलनाची ही धोक्याची घंटा असून, आपण वेळेतच सावध होत पर्यावरण संवर्धनासाठी तत्परतेने पावले उचलली पाहिजेत, अन्यथा पृथ्वीचा विनाश होईल. २०२०मध्ये मानवजात वाचविण्यासाठी नियंत्रित करावयाच्या २ अंश वाढीची मर्यादा ओलांडली जाणार आहे. प्रत्येक वर्षी १/५ अंशाची वाढ पृथ्वीच्या सरासरी तापमानात होत असल्याने, मानवजात व जीवसृष्टी नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी, पर्यावरणाचे संवर्धन करणे हे आपल्यासमोरील आव्हान आहे.नरिमन पॉइंट ते कांदिवलीपर्यंत २९.२२ किलोमीटर सागरी मार्ग म्हणजेच कोस्टल रोड बांधताना, पर्यावरणाची काळजी घेणे हे आपल्यासमोरचे आव्हान आहे. पर्यावरणाचा विचार करता, मुंबईच्या मातीची वैशिष्ट्ये लक्षात घेता, मुंबईतील मातीत रुजेल, वाढेल आणि अधिक घट्टपणे मूळ धरेल अशी झाडे लावणे गरजेचे आहे. तामण, बहावा, करंज, बकुळ, समुद्रफूल, कडुनिंब यासारखी झाडे लावली पाहिजेत, अशी झाडे लावणे आपल्यासाठी संधी आहे. गुलमोहर, सोनमोहर, पर्जन्य वृक्ष यासारखी झाडे लावणे शक्यतो टाळले पाहिजे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विकास आराखड्यात पर्यावरणाकडे संपूर्णत: दुर्लक्ष केले आहे. परिणामी, येथे पर्यावरणाचे संवर्धन करणे आपल्यासमोरील आव्हान आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने बांधण्यात येणाºया मुंबई ट्रान्स हार्बर लिंकदरम्यान पर्यावरणाची हानी होणार आहे. ही हानी रोखणे हे आव्हान आहे.(लेखक पर्यावरणतज्ज्ञ आहेत.)

टॅग्स :newsबातम्या