शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्ती ही मानवनिर्मित

By admin | Updated: July 2, 2017 04:45 IST

सध्याची नैसर्गिक आपत्ती ही मानवनिर्मित असल्याची खंत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. शहरांचा विकास

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सध्याची नैसर्गिक आपत्ती ही मानवनिर्मित असल्याची खंत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. शहरांचा विकास करताना पर्यावरणाचा विनाश होत आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक जीवन जगण्याचा संकल्प सरकारने केला असून, वन विभागामार्फत तीन  वर्षांत ५० कोटी झाडे लावली  जाणार असल्याचेही त्यांनी  सांगितले. शासनाच्या वन विभागामार्फत राज्यात वृक्ष लागवड महामोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याकरिता १ ते ७ जुलैदरम्यान वृक्षारोपण सप्ताह साजरा होत आहे. या मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऐरोली येथे करण्यात आला. या वेळी नैसर्गिक आपत्ती ही मानवनिर्मित असून, शहरांचा  विकास करताना जल, जंगल व  जमीन यांचा विनाश होत असल्याने नैसर्गिक आपत्ती ओढावत असल्याची खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. तर ईशा फाउंडेशनतर्फे देशभर ‘नदी बचाव’ मोहीम राबवली जात आहे. ईशा फाउंडेशनच्या या कार्याचे कौतुक करत, महाराष्ट्रातही सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यासोबत ‘नदी बचाव’ मोहिमेत सरकार सोबत असेल, अशी ग्वाही दिली. तीन वर्षांत राज्यात ५० कोटी झाडे लावणार तीन वर्षांत राज्यात ५० कोटी झाडे लावण्याचा उपक्रम वन विभागामार्फत  हाती घेण्यात आला असून, यंदा ४ कोटी झाडे लावली जाणार आहेत. या सप्ताहाच्या शुभारंभप्रसंगी ऐरोली येथील जैव विविधता केंद्रालगतच्या मोकळ्या जागेत १८०० झाडांची लागवड करण्यात आली. या वेळी कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्यमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम, पालकमंत्री एकनाथ शिंदे, सद्गुरू जग्गी वासुदेव, महापौर सुधाकर सोनवणे, आमदार मंदा म्हात्रे आदी उपस्थित होते.महावितरण ७० हजार वृक्षांची लागवड करणारमहावितरणच्या वतीने राज्यभरातील विविध कार्यालयांत सुमारे ७० हजारांपेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ शनिवारी मुंबई येथील प्रकाशगड मुख्यालयात, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. १ जुलै ते ७ जुलै दरम्यान ४ कोटी वृक्ष लागवड करण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे. या संकल्पांतर्गत राज्यभरातील सोळा परिमंडल कार्यालयांतर्गत येणाऱ्या विविध कार्यालयांत, ७० हजारांपेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. वृक्षारोपण करण्यात आलेल्या झाडांचे संगोपन महावितरणचे कर्मचारी करणार आहेत.मुंबईकरांना मोकळा श्वास घेता यावा; यासाठी वृक्षारोपणवातावरणात मिथेन व कार्बन डायआॅक्साईडचे प्रमाण वाढत असून, मुंबईकरांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी मुंबई महापालिकेतर्फे वृक्षारोपण मोहीम आयोजित करण्यात आल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले.वन विभागातर्फे राज्यात १ ते ७ जुलैदरम्यान ४ कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यानिमित्त महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याचा शुभारंभ महापौरांच्या हस्ते दादर शिवाजी पार्क येथील महापौर निवासात शनिवारी करण्यात आला.या वेळी महाडेश्वर बोलत होते. महापौर म्हणाले की, मुंबईत अनेक ठिकाणी विविध संस्थांमार्फत वृक्षारोपण करण्यात येत असून, मुंबईकरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आॅक्सिजन देणाऱ्या या वृक्षांचे रोपण करण्यात येत आहे.शनिवारी झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात शाळा, उद्याने, राज्य व केंद्राच्या संस्थांच्या आवारात विविध झाडांचे रोपण झाले. मुंबईत सुमारे ३५ हजार वृक्षांची लागवड २४ विभाग कार्यालयांत उद्यान विभागाकडून करण्यात येणार आहे.