शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

दाभोलकर हत्येप्रकरणी देशव्यापी आंदोलन

By admin | Updated: July 21, 2016 05:01 IST

‘हिंसेला नकार, मानवतेचा स्वीकार’ हे ब्रीद घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे देशभरात आंदोलन करण्यात येणार आहे.

पुणे : ‘हिंसेला नकार, मानवतेचा स्वीकार’ हे ब्रीद घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे देशभरात आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाला बुधवारी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरुवात झाली असून, राज्यभरातील सर्व जिल्ह्यांंमध्ये हे आंदोलन २० आॅगस्टपर्यंत राबविण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर यांनी सांगितले. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला ३५ महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे या हत्येचा निषेध करीत दाभोलकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. महर्षी शिंदे पुलावरील या कार्यक्रमाला दिग्दर्शक नागराज मंजुळे, अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख, मुस्लिम सत्यशोधक समाजाचे शमसुद्दीन तांबोळी व कार्यकर्ते उपस्थित होते. मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, की ३५ महिने होऊनही तपास यंत्रणा अतिशय संथगतीने काम करीत आहेत. हत्या आणि खून असे प्रकार केवळ पाकिस्तान आणि बांगलादेशात घडतात, असे वाटत होते. मात्र आपल्या देशातही या गोष्टी सर्रास होत असल्याचे चित्र आहे. स्त्रीला सन्मानाने वागण्याचीही मुभा राहिली नाही, हे कोपर्डीच्या प्रकरणावरून दिसून येते. आपला विरोध दर्शविण्यासाठी लोकशाहीमध्ये हिंसेचा मार्ग वापरणे हे अतिशय गैर आहे. या सर्व गोष्टींचा निषेध नोंदविण्यासाठी देशभरात सर्व जिल्ह्यांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे शाळा, महाविद्यालये व सरकारी कार्यालयांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी कोपर्डीमधील बलात्कार प्रकरणाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. बलात्काऱ्यांना जात-पात, धर्म काहीही नसते. त्यांची विकृत मानसिकता हेच या गुन्ह्याचे मूळ कारण आहे. ही मानसिकता बदलायला हवी. अशा प्रकारच्या सर्व प्रकरणांमध्ये पोलीस आणि सीबीआयने योग्य पद्धतीने तपास करणे गरजेचे असल्याचे सांगितले.पावसाळी अधिवेशनात कोणत्याही राजकीय पक्षाने डॉ. दाभोलकरांच्या हत्येबाबत काहीही विषय काढला नाही, ही खेदाची बाब आहे. जागतिक पातळीवर हिंसेने थैमान घातले असताना अशा हत्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी एकत्रित लढा उभारावा लागेल, असे शमसुद्दीन तांबोळी यांनी सांगितले. या हत्येचा निषेध म्हणून पुढील एक महिना आपण केवळ एकच वेळ जेवण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मिलिंद देशमुख यांनीही विचार मांडले. (प्रतिनिधी)>सैैराट आता माझा नव्हे; जनतेचा !भारतीय जनता पक्षाच्या आमदार मनीषा चौैधरी यांनी ‘सैराट’मुळे तरुण बिघडत असल्याने या चित्रपटावर बंदी यावी, अशी मागणी नुकतीच केली होती. त्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना विचारले असता ते म्हणाले, की ‘सैराट’ आता माझा राहिला नाही, तो आता जनतेचा झाला आहे. कोणत्याही कलेवर अशाप्रकारे बंदी घालून काहीही साध्य होणार नाही.