शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

दाभोलकर हत्येप्रकरणी देशव्यापी आंदोलन

By admin | Updated: July 21, 2016 05:01 IST

‘हिंसेला नकार, मानवतेचा स्वीकार’ हे ब्रीद घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे देशभरात आंदोलन करण्यात येणार आहे.

पुणे : ‘हिंसेला नकार, मानवतेचा स्वीकार’ हे ब्रीद घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे देशभरात आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाला बुधवारी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरुवात झाली असून, राज्यभरातील सर्व जिल्ह्यांंमध्ये हे आंदोलन २० आॅगस्टपर्यंत राबविण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर यांनी सांगितले. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला ३५ महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे या हत्येचा निषेध करीत दाभोलकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. महर्षी शिंदे पुलावरील या कार्यक्रमाला दिग्दर्शक नागराज मंजुळे, अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख, मुस्लिम सत्यशोधक समाजाचे शमसुद्दीन तांबोळी व कार्यकर्ते उपस्थित होते. मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, की ३५ महिने होऊनही तपास यंत्रणा अतिशय संथगतीने काम करीत आहेत. हत्या आणि खून असे प्रकार केवळ पाकिस्तान आणि बांगलादेशात घडतात, असे वाटत होते. मात्र आपल्या देशातही या गोष्टी सर्रास होत असल्याचे चित्र आहे. स्त्रीला सन्मानाने वागण्याचीही मुभा राहिली नाही, हे कोपर्डीच्या प्रकरणावरून दिसून येते. आपला विरोध दर्शविण्यासाठी लोकशाहीमध्ये हिंसेचा मार्ग वापरणे हे अतिशय गैर आहे. या सर्व गोष्टींचा निषेध नोंदविण्यासाठी देशभरात सर्व जिल्ह्यांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे शाळा, महाविद्यालये व सरकारी कार्यालयांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी कोपर्डीमधील बलात्कार प्रकरणाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. बलात्काऱ्यांना जात-पात, धर्म काहीही नसते. त्यांची विकृत मानसिकता हेच या गुन्ह्याचे मूळ कारण आहे. ही मानसिकता बदलायला हवी. अशा प्रकारच्या सर्व प्रकरणांमध्ये पोलीस आणि सीबीआयने योग्य पद्धतीने तपास करणे गरजेचे असल्याचे सांगितले.पावसाळी अधिवेशनात कोणत्याही राजकीय पक्षाने डॉ. दाभोलकरांच्या हत्येबाबत काहीही विषय काढला नाही, ही खेदाची बाब आहे. जागतिक पातळीवर हिंसेने थैमान घातले असताना अशा हत्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी एकत्रित लढा उभारावा लागेल, असे शमसुद्दीन तांबोळी यांनी सांगितले. या हत्येचा निषेध म्हणून पुढील एक महिना आपण केवळ एकच वेळ जेवण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मिलिंद देशमुख यांनीही विचार मांडले. (प्रतिनिधी)>सैैराट आता माझा नव्हे; जनतेचा !भारतीय जनता पक्षाच्या आमदार मनीषा चौैधरी यांनी ‘सैराट’मुळे तरुण बिघडत असल्याने या चित्रपटावर बंदी यावी, अशी मागणी नुकतीच केली होती. त्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना विचारले असता ते म्हणाले, की ‘सैराट’ आता माझा राहिला नाही, तो आता जनतेचा झाला आहे. कोणत्याही कलेवर अशाप्रकारे बंदी घालून काहीही साध्य होणार नाही.