शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दाभोलकर हत्येप्रकरणी देशव्यापी आंदोलन

By admin | Updated: July 21, 2016 05:01 IST

‘हिंसेला नकार, मानवतेचा स्वीकार’ हे ब्रीद घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे देशभरात आंदोलन करण्यात येणार आहे.

पुणे : ‘हिंसेला नकार, मानवतेचा स्वीकार’ हे ब्रीद घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे देशभरात आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाला बुधवारी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरुवात झाली असून, राज्यभरातील सर्व जिल्ह्यांंमध्ये हे आंदोलन २० आॅगस्टपर्यंत राबविण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर यांनी सांगितले. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला ३५ महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे या हत्येचा निषेध करीत दाभोलकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. महर्षी शिंदे पुलावरील या कार्यक्रमाला दिग्दर्शक नागराज मंजुळे, अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख, मुस्लिम सत्यशोधक समाजाचे शमसुद्दीन तांबोळी व कार्यकर्ते उपस्थित होते. मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, की ३५ महिने होऊनही तपास यंत्रणा अतिशय संथगतीने काम करीत आहेत. हत्या आणि खून असे प्रकार केवळ पाकिस्तान आणि बांगलादेशात घडतात, असे वाटत होते. मात्र आपल्या देशातही या गोष्टी सर्रास होत असल्याचे चित्र आहे. स्त्रीला सन्मानाने वागण्याचीही मुभा राहिली नाही, हे कोपर्डीच्या प्रकरणावरून दिसून येते. आपला विरोध दर्शविण्यासाठी लोकशाहीमध्ये हिंसेचा मार्ग वापरणे हे अतिशय गैर आहे. या सर्व गोष्टींचा निषेध नोंदविण्यासाठी देशभरात सर्व जिल्ह्यांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे शाळा, महाविद्यालये व सरकारी कार्यालयांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी कोपर्डीमधील बलात्कार प्रकरणाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. बलात्काऱ्यांना जात-पात, धर्म काहीही नसते. त्यांची विकृत मानसिकता हेच या गुन्ह्याचे मूळ कारण आहे. ही मानसिकता बदलायला हवी. अशा प्रकारच्या सर्व प्रकरणांमध्ये पोलीस आणि सीबीआयने योग्य पद्धतीने तपास करणे गरजेचे असल्याचे सांगितले.पावसाळी अधिवेशनात कोणत्याही राजकीय पक्षाने डॉ. दाभोलकरांच्या हत्येबाबत काहीही विषय काढला नाही, ही खेदाची बाब आहे. जागतिक पातळीवर हिंसेने थैमान घातले असताना अशा हत्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी एकत्रित लढा उभारावा लागेल, असे शमसुद्दीन तांबोळी यांनी सांगितले. या हत्येचा निषेध म्हणून पुढील एक महिना आपण केवळ एकच वेळ जेवण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मिलिंद देशमुख यांनीही विचार मांडले. (प्रतिनिधी)>सैैराट आता माझा नव्हे; जनतेचा !भारतीय जनता पक्षाच्या आमदार मनीषा चौैधरी यांनी ‘सैराट’मुळे तरुण बिघडत असल्याने या चित्रपटावर बंदी यावी, अशी मागणी नुकतीच केली होती. त्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना विचारले असता ते म्हणाले, की ‘सैराट’ आता माझा राहिला नाही, तो आता जनतेचा झाला आहे. कोणत्याही कलेवर अशाप्रकारे बंदी घालून काहीही साध्य होणार नाही.