शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

सरकार स्थापनेत राष्ट्रवादी निर्णायक राहील

By admin | Updated: October 10, 2014 05:18 IST

हा सर्व खोटा प्रचार आहे. आमची भाजपाशी कोणतीही जवळीकता, छुपा समझोता वगैरे नाही.

१५ वर्षांनंतर पहिल्यांदा काँग्रेस व राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढणार आहे. काय असेल निवडणुकीनंतरचे चित्र?पटेल - यंदा राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा मिळतील यात शंका नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली याचा फटका काही प्रमाणात दोन्ही पक्षांना बसला असता, पण तिकडे शिवसेना-भाजपातही युती नाही. त्यामुळे फारसा फरक पडणार नाही. उलट काही प्रमाणात फायदाच होऊ शकतो. प्रत्येकासाठी आपली ताकद आजमावण्याची ही संधी आहे. कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर पुन्हा आघाडी होईल?पटेल - आम्ही स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा करीत नाही. पण एवढे नक्की सांगतो की, सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका निर्णायक राहणार आहे. आता परिस्थिती पुढे काय वळण घेते हे सांगता येणार नाही. आज तरी त्याबद्दल जास्त बोलणे योग्य होणार नाही.युती तुटताच आघाडी तुटल्याची घोषणा झाली, यात काही राजकीय समीकरण आहे?पटेल - हा सर्व खोटा प्रचार आहे. आमची भाजपाशी कोणतीही जवळीकता, छुपा समझोता वगैरे नाही. भाजपा-सेनेची युती तुटताच काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटण्याची घोषणा हा केवळ योगायोग आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार नामांकन भरण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक होते. त्यामुळे २५ सप्टेंबरच्या रात्री तो निर्णय नाईलाजाने घ्यावा लागला. जागांच्या वाटाघाटीत काँग्रेसने ताणून ठेवल्यामुळे शेवटी आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडून आल्यास मुख्यमंत्रीपदावर दावा राहणार, अशावेळी कोणाची साथ घेणार?पटेल - ही वेळ प्रत्येकासाठी आपली ताकद आजमावण्याची आहे. यावर आताच काही बोलणे योग्य नाही. परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. सध्या वातावरण आमच्यासाठी सकारात्मक आहे, एवढेच मी म्हणेल.पुरोगामी महाराष्ट्रात अजूनपर्यंत महिला मुख्यमंत्री झाली नाही. संधी मिळाली तर राष्ट्रवादी हा बहुमान पटकावणार का?पटेल - याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी पक्षाच्या विधिमंडळ समितीचा आहे. पवार साहेबांच्या मार्गदर्शनात आमचा पक्ष योग्य वाटचाल करीत आहे. सध्यातरी त्याबाबत काहीही निर्णय नाही आणि त्यामुळे भावी मुख्यमंत्री आम्ही म्हणून कोणालाही ‘प्रोजेक्ट’ पण करणार नाही.स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्याला राष्ट्रवादीने दूर सारलेले दिसते, याचा फटका बसणार नाही का?पटेल - आम्ही हा मुद्दा दूर सारलेला नाही. जर सर्वसामान्य वैदर्र्भीय जनतेला स्वतंत्र विदर्भ राज्य हवे असेल तर आमचा त्याला पाठींबाच राहील. त्यामुळे आम्ही स्वतंत्र विदर्भाच्या विरोधात आहोत, असे म्हणणे चुकीचे आहे. वास्तविक या मुद्द्यावर आता भाजपाचाच दुटप्पीपणा समोर येत आहेत. तुम्ही १० वर्षे केंद्रात सत्तेत होते. आता सत्ताबदलानंतर मोदी सरकारच्या आतापर्यंतच्या कार्यकाळाकडे तुम्ही कसे पाहता?पटेल - मोदी सरकारने सर्वांचा अपेक्षाभंग केला आहे. केवळ भाषण आणि घोषणाबाजीने काम होत नाही. लोकांचे मनोरंजन केल्याने काही होणार नाही. जे बोलतात ते करून दाखवावे लागते. परवा गोंदियात मोदींची सभा झाली. पण पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याबद्दल, या भागात उद्योगधंद्याची उभारणी, रोजगार निर्मिती याबद्दल ते एक शब्दही बोलले नाही.