शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

कोपरगावात राष्ट्रवादीचा हंडा मोर्चा

By admin | Updated: June 13, 2016 23:15 IST

कोपरगाव : राहाता, संगमनेर, श्रीरामपूर येथे पिण्याला पाणी आहे़ मात्र कोपरगावमध्ये वीस दिवसानंतर पाणी येते़ एप्रिल महिन्यात गोदावरी कालव्यांना आवर्तन आले़ साठ वेळा नळाला पाणी पुरवठा होईल,

कोपरगाव : राहाता, संगमनेर, श्रीरामपूर येथे पिण्याला पाणी आहे़ मात्र कोपरगावमध्ये वीस दिवसानंतर पाणी येते़ एप्रिल महिन्यात गोदावरी कालव्यांना आवर्तन आले़ साठ वेळा नळाला पाणी पुरवठा होईल, एवढे पाणी भरून घेण्यात आले़ परंतु आजवर केवळ सातच वेळा पाणी दिले गेले़ उर्वरित पाणी कुठे गेले़ टँकरवर फोटो चिटकवून जनतेची सहानुभूती मिळविण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या हंडा मोर्चाद्वारे करण्यात आला़कोपरगाव नगरपालिकेवर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हंडा मोर्चा काढण्यात आला़ मोर्चाचे नेतृत्व माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, प्रदेश सचिव संदिप वर्पे व शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी केले़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेल्या मोर्चात महिला व पुरूष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ नगरसेविका मायादेवी खरे यांनी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात राजकारण होत असल्याचा आरोप केला़ ठराविक लोकांनाच पाणी वाटप होते़ हेच टँकरचे पाणी जलकुंभात सोडून ते नळाद्वारे शहराला द्यावे, अशी मागणी केली़ राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस म्हणाले की, कृत्रिम पाणी टंचाई आहे़ माजी आ़ अशोक काळे यांनी पाच नंबरच्या तळ्यासाठी निधी आणला़ परंतु त्यांचे नाव होईल, म्हणून काम रखडविण्यात आले़ आता पाणी पुरवठा झाला नाही, तर सत्ताधारी नगरसेवकांच्या घरासमोर जाऊन मडके फोडू असा इशाराही त्यांनी दिला़ विजय आढाव यांनी टँकरवर फोटो लावून जनतेची सहानुभूती मिळविण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप केला़यावेळी योगेश जगताप, नगरसेवक कृष्णा आढाव, दिनार कुदळे, डॉ़ अतिष काळे, अ‍ॅड़ योगेश खालकर, नवाज कुरेशी आदींची भाषणे झाली़ मोर्चात वैशालीताई आढाव, शमीमबी कुरेशी, संतोष चवंडके, वर्षा गंगुले, सुमन भगत, केशरबाई साबळे, शितल लोंढे, नसिमा कुरेशी, शांताबाई लकारे, मनिषा कहार, मनिषा लकारे, रजनी इंगळे, मनिषा गंगुले, सागर लकारे आदी सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)