शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

कोपरगावात राष्ट्रवादीचा हंडा मोर्चा

By admin | Updated: June 13, 2016 23:15 IST

कोपरगाव : राहाता, संगमनेर, श्रीरामपूर येथे पिण्याला पाणी आहे़ मात्र कोपरगावमध्ये वीस दिवसानंतर पाणी येते़ एप्रिल महिन्यात गोदावरी कालव्यांना आवर्तन आले़ साठ वेळा नळाला पाणी पुरवठा होईल,

कोपरगाव : राहाता, संगमनेर, श्रीरामपूर येथे पिण्याला पाणी आहे़ मात्र कोपरगावमध्ये वीस दिवसानंतर पाणी येते़ एप्रिल महिन्यात गोदावरी कालव्यांना आवर्तन आले़ साठ वेळा नळाला पाणी पुरवठा होईल, एवढे पाणी भरून घेण्यात आले़ परंतु आजवर केवळ सातच वेळा पाणी दिले गेले़ उर्वरित पाणी कुठे गेले़ टँकरवर फोटो चिटकवून जनतेची सहानुभूती मिळविण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या हंडा मोर्चाद्वारे करण्यात आला़कोपरगाव नगरपालिकेवर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हंडा मोर्चा काढण्यात आला़ मोर्चाचे नेतृत्व माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, प्रदेश सचिव संदिप वर्पे व शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी केले़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेल्या मोर्चात महिला व पुरूष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ नगरसेविका मायादेवी खरे यांनी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात राजकारण होत असल्याचा आरोप केला़ ठराविक लोकांनाच पाणी वाटप होते़ हेच टँकरचे पाणी जलकुंभात सोडून ते नळाद्वारे शहराला द्यावे, अशी मागणी केली़ राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस म्हणाले की, कृत्रिम पाणी टंचाई आहे़ माजी आ़ अशोक काळे यांनी पाच नंबरच्या तळ्यासाठी निधी आणला़ परंतु त्यांचे नाव होईल, म्हणून काम रखडविण्यात आले़ आता पाणी पुरवठा झाला नाही, तर सत्ताधारी नगरसेवकांच्या घरासमोर जाऊन मडके फोडू असा इशाराही त्यांनी दिला़ विजय आढाव यांनी टँकरवर फोटो लावून जनतेची सहानुभूती मिळविण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप केला़यावेळी योगेश जगताप, नगरसेवक कृष्णा आढाव, दिनार कुदळे, डॉ़ अतिष काळे, अ‍ॅड़ योगेश खालकर, नवाज कुरेशी आदींची भाषणे झाली़ मोर्चात वैशालीताई आढाव, शमीमबी कुरेशी, संतोष चवंडके, वर्षा गंगुले, सुमन भगत, केशरबाई साबळे, शितल लोंढे, नसिमा कुरेशी, शांताबाई लकारे, मनिषा कहार, मनिषा लकारे, रजनी इंगळे, मनिषा गंगुले, सागर लकारे आदी सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)