शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

कोपरगावात राष्ट्रवादीचा हंडा मोर्चा

By admin | Updated: June 13, 2016 23:15 IST

कोपरगाव : राहाता, संगमनेर, श्रीरामपूर येथे पिण्याला पाणी आहे़ मात्र कोपरगावमध्ये वीस दिवसानंतर पाणी येते़ एप्रिल महिन्यात गोदावरी कालव्यांना आवर्तन आले़ साठ वेळा नळाला पाणी पुरवठा होईल,

कोपरगाव : राहाता, संगमनेर, श्रीरामपूर येथे पिण्याला पाणी आहे़ मात्र कोपरगावमध्ये वीस दिवसानंतर पाणी येते़ एप्रिल महिन्यात गोदावरी कालव्यांना आवर्तन आले़ साठ वेळा नळाला पाणी पुरवठा होईल, एवढे पाणी भरून घेण्यात आले़ परंतु आजवर केवळ सातच वेळा पाणी दिले गेले़ उर्वरित पाणी कुठे गेले़ टँकरवर फोटो चिटकवून जनतेची सहानुभूती मिळविण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या हंडा मोर्चाद्वारे करण्यात आला़कोपरगाव नगरपालिकेवर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हंडा मोर्चा काढण्यात आला़ मोर्चाचे नेतृत्व माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, प्रदेश सचिव संदिप वर्पे व शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी केले़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेल्या मोर्चात महिला व पुरूष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ नगरसेविका मायादेवी खरे यांनी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात राजकारण होत असल्याचा आरोप केला़ ठराविक लोकांनाच पाणी वाटप होते़ हेच टँकरचे पाणी जलकुंभात सोडून ते नळाद्वारे शहराला द्यावे, अशी मागणी केली़ राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस म्हणाले की, कृत्रिम पाणी टंचाई आहे़ माजी आ़ अशोक काळे यांनी पाच नंबरच्या तळ्यासाठी निधी आणला़ परंतु त्यांचे नाव होईल, म्हणून काम रखडविण्यात आले़ आता पाणी पुरवठा झाला नाही, तर सत्ताधारी नगरसेवकांच्या घरासमोर जाऊन मडके फोडू असा इशाराही त्यांनी दिला़ विजय आढाव यांनी टँकरवर फोटो लावून जनतेची सहानुभूती मिळविण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप केला़यावेळी योगेश जगताप, नगरसेवक कृष्णा आढाव, दिनार कुदळे, डॉ़ अतिष काळे, अ‍ॅड़ योगेश खालकर, नवाज कुरेशी आदींची भाषणे झाली़ मोर्चात वैशालीताई आढाव, शमीमबी कुरेशी, संतोष चवंडके, वर्षा गंगुले, सुमन भगत, केशरबाई साबळे, शितल लोंढे, नसिमा कुरेशी, शांताबाई लकारे, मनिषा कहार, मनिषा लकारे, रजनी इंगळे, मनिषा गंगुले, सागर लकारे आदी सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)