शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

तासगावात राष्ट्रवादीच ‘बाहुबली’

By admin | Updated: August 3, 2015 00:49 IST

बाजार समिती निवडणूक : १९ पैकी १८ जागांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व; भाजपचा धुव्वा, एका जागेवर विजय

तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने १९ पैकी १८ जागांवर एकतर्फी विजय मिळविला. भाजपच्या पॅनेलचा धुव्वा उडाला, तर काँग्रेसच्या पॅनेलला भोपळासुद्धा फोडता आला नाही. भाजपला व्यापारी गटात एका जागेवर विजय मिळाला. तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे अस्तित्व, तर भाजपची अस्मिता पणाला लागलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षच ‘बाहुबली’ ठरला. समितीत २४ वर्षांनंतर प्रथमच दोन तुल्यबळ गट आमने-सामने आले होते. त्यामुळे चुरशीने निवडणूक लढविली गेली होती. समितीच्या सभागृहात सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. निवडणूक निर्णय अधिकारी शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. दुपारी एकपर्यंत सर्व निकाल जाहीर झाले. शनिवारी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत झालेल्या मारामारीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्राच्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. हमाल गटातील मतमोजणीने पहिला निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने लागला. नंतर व्यापारी गटात झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादी व भाजपला प्रत्येकी एक जागा मिळाली. ग्रामपंचायत गटातील सर्व निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने लागले. सोसायटी गटातील मतमोजणीने दुपारी एकपर्यंत सर्व निकाल जाहीर झाले. १९ पैकी राष्ट्रवादीची एक जागा यापूर्वीच बिनविरोध झाली होती. उर्वरित १८ पैकी व्यापारी गटातील एका जागेवर भाजपला यश मिळाले, तर अन्य सर्व १७ जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा विजय झाला.विजयानंतर सर्व विजयी उमेदवारांसह कार्यकर्ते सूतगिरणीच्या कार्यस्थळावर जमले. तेथे आमदार सुमनताई पाटील यांच्या उपस्थितीत सभा झाली. त्यानंतर विजयी उमेदवारांनी अंजनी येथे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेतले. (प्रतिनिधी)गुलालाशिवाय विजयाचा जल्लोष बाजार समिती निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर बाजार समितीपासून सूतगिरणीपर्यंत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोटारसायकलवरून विजयाच्या घोषणा देत रॅली काढली. मात्र, कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली नाही. सूतगिरणीवर झालेल्या विजयी सभेसाठीही तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत एकजुटीने काम केले. शनिवारी खासदार आणि त्यांच्या गुंडांनी केलेला हल्ला हा लोकशाहीवर केलेला हल्ला होता. मात्र, हुकूमशाही पद्धतीने जनतेत दहशत निर्माण करून सत्ता बळकावण्याचा प्रयत्न सूज्ञ मतदारांनी हाणून पाडला आहे.- सुमनताई पाटील, आमदार