शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात राष्ट्रवादीच ‘बाहुबली’

By admin | Updated: August 3, 2015 00:49 IST

बाजार समिती निवडणूक : १९ पैकी १८ जागांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व; भाजपचा धुव्वा, एका जागेवर विजय

तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने १९ पैकी १८ जागांवर एकतर्फी विजय मिळविला. भाजपच्या पॅनेलचा धुव्वा उडाला, तर काँग्रेसच्या पॅनेलला भोपळासुद्धा फोडता आला नाही. भाजपला व्यापारी गटात एका जागेवर विजय मिळाला. तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे अस्तित्व, तर भाजपची अस्मिता पणाला लागलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षच ‘बाहुबली’ ठरला. समितीत २४ वर्षांनंतर प्रथमच दोन तुल्यबळ गट आमने-सामने आले होते. त्यामुळे चुरशीने निवडणूक लढविली गेली होती. समितीच्या सभागृहात सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. निवडणूक निर्णय अधिकारी शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. दुपारी एकपर्यंत सर्व निकाल जाहीर झाले. शनिवारी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत झालेल्या मारामारीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्राच्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. हमाल गटातील मतमोजणीने पहिला निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने लागला. नंतर व्यापारी गटात झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादी व भाजपला प्रत्येकी एक जागा मिळाली. ग्रामपंचायत गटातील सर्व निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने लागले. सोसायटी गटातील मतमोजणीने दुपारी एकपर्यंत सर्व निकाल जाहीर झाले. १९ पैकी राष्ट्रवादीची एक जागा यापूर्वीच बिनविरोध झाली होती. उर्वरित १८ पैकी व्यापारी गटातील एका जागेवर भाजपला यश मिळाले, तर अन्य सर्व १७ जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा विजय झाला.विजयानंतर सर्व विजयी उमेदवारांसह कार्यकर्ते सूतगिरणीच्या कार्यस्थळावर जमले. तेथे आमदार सुमनताई पाटील यांच्या उपस्थितीत सभा झाली. त्यानंतर विजयी उमेदवारांनी अंजनी येथे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेतले. (प्रतिनिधी)गुलालाशिवाय विजयाचा जल्लोष बाजार समिती निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर बाजार समितीपासून सूतगिरणीपर्यंत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोटारसायकलवरून विजयाच्या घोषणा देत रॅली काढली. मात्र, कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली नाही. सूतगिरणीवर झालेल्या विजयी सभेसाठीही तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत एकजुटीने काम केले. शनिवारी खासदार आणि त्यांच्या गुंडांनी केलेला हल्ला हा लोकशाहीवर केलेला हल्ला होता. मात्र, हुकूमशाही पद्धतीने जनतेत दहशत निर्माण करून सत्ता बळकावण्याचा प्रयत्न सूज्ञ मतदारांनी हाणून पाडला आहे.- सुमनताई पाटील, आमदार