शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
3
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
4
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
5
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
11
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
12
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
13
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
14
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
15
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
16
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
17
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
18
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी

‘रत्न’कन्येला खो-खोमधील राष्ट्रीय पुरस्कार

By admin | Updated: October 12, 2014 23:30 IST

रत्नागिरीची सुकन्या : ऐश्वर्या सावंत मुंबई, पुण्याबाहेरील पहिली खेळाडू

रत्नागिरी : रत्नागिरीच्या लाल मातीत घडलेल्या ऐश्वर्या यशवंत सावंत हिने भारतातील सर्वोत्कृष्ट खो-खोपटूसाठी असलेला जानकी पुरस्कार पटकावून रत्नागिरीची शान वाढवली आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार पटकावणारी मुंबई, पुण्याबाहेरील ती पहिली खेळाडू ठरली आहे.रत्नकन्या ऐश्वर्या सावंत हिची ही कामगिरी थक्क करणारी आहे. तिने खो-खो मध्ये केलेल्या या कामगिरीने अनेकांनी तिचे कौतुक केले. ऐश्वर्याने शालेय जीवनापासून खो-खोमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. नुकत्याच अजमेर, राजस्थान येथे ३३व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्राच्या मुले व मुली संघाने या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. दोन्ही संघानी गतविजेत्या कर्नाटकचा पराभव करून हे यश संपादन केले. नाशिक येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत रत्नागिरीच्या मुलींच्या संघाने धडाकेबाज कामगिरी करीत तिसरा क्रमांक संपादन केला होता. यावेळी ऐश्वर्या सावंतची राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली होती.अजमेर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्या फेरीच्या सामन्यापासून ऐश्वर्या सावंतने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करताना अष्टपैलू कामगिरी करत संघाला विजेतेपद मिळवून दिले. तिच्या या अष्टपैलू कामगिरीची दखल घेत भारतातील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी असलेल्या जानकी पुरस्काराने तिला गौरविण्यात आले.अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात शिकत असलेल्या ऐश्वर्याने यापूर्वी तीन राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला आहे. पंकज नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिचा सराव सुरु असून, विशेष म्हणजे या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पंकज नार्वेकर हेच महाराष्ट्र मुलींच्या संघाचे प्रशिक्षक होते.तिच्या या यशाबद्दल महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या उपाध्यक्ष नेत्रा राजेशिर्के, जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर, रत्नागिरी जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष नाना मयेकर, सरचिटणीस संदीप तावडे, उपाध्यक्ष विनोद मयेकर, प्रसन्न आंबुलकर, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. विनोद शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.ऐश्वर्या हिने आपल्या कामगिरीत सातत्य ठेवले. विविध स्तरावर खेळताना तिने चमकदार कामगिरी केली. त्यामुळे मुलींच्या संघाने विविध स्तरावर यश मिळवले आहे. त्याची दखल घेऊन भारतीय खो-खो फेडरेशनने ऐश्वर्याला हा पुरस्कार जाहीर केला आहे. (प्रतिनिधी)ऐश्वर्याची वाटचाल थक्क करणारी.शालेय जीवनापासूनच ऐश्वर्याची चमकदार कामगिरी.अजमेर येथील राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत राज्याच्या संघाने पटकावले सुवर्णपदक.ऐश्वर्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे महाराष्ट्र संघ ठरला अजिंक्य.