शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू संस्कृतीतून राष्ट्र शक्तिशाली होईल

By admin | Updated: January 12, 2015 03:55 IST

हिंदू संस्कृतीमध्ये राष्ट्र शक्तिशाली करण्याची ताकद आहे. मात्र ही ताकद हजारो वर्षांच्या भेदपरंपरेला उपटून टाकल्यानंतर निर्माण होईल.

औरंगाबाद (छत्रपती संभाजी महाराज नगरी ) : हिंदू संस्कृतीमध्ये राष्ट्र शक्तिशाली करण्याची ताकद आहे. मात्र ही ताकद हजारो वर्षांच्या भेदपरंपरेला उपटून टाकल्यानंतर निर्माण होईल. ‘स्वान्त सुखाय, बहुजन हिताय’ याप्रमाणे काम करावे लागणार आहे. सर्व भेदांना नष्ट करणाऱ्या राष्ट्राला पुनर्वैभव प्राप्त करून देणाऱ्या समाजनिर्मितीचे काम संघाला करावे लागणार आहे. त्यासाठी स्वयंसेवकांनी तन, मन, धनाने नि:स्वार्थीपणाने राष्ट्रवैभव प्राप्तीसाठी काम करावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी येथे केले.संघाची व्याप्ती वाढविण्यासाठी हिंदुत्व वाढविण्यासोबत बहुजनांनादेखील सोबत घेण्याचा मंत्र डॉ. भागवत यांनी यावेळी दिला. हजारो वर्षांची भेदपरंपरा संपवून सनातन मूल्यांचा विचारही त्यांनी मांडला. हिंदू संस्कृती, अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाचा राष्ट्रीय स्वयंसेवकांचा महासंगम रविवारी येथे बीड बायपास रोडवरील छत्रपती संभाजी महाराज नगरीत पार पडला. देवगिरी प्रांतातील ११ जिल्ह्यांतील ४१ हजार २०० हून अधिक स्वयंसेवकांनी या महासंगमात राष्ट्र शक्तिशाली बनविण्यासाठी लागणारी ज्ञानरूपी ऊर्जा मिळवली. डॉ. भागवत म्हणाले, की या देशाचा पुत्र भारतमातेवर श्रद्धा ठेवणारा, संस्कृतीच्या मूल्यांआधारे जीवन जगणारा, पूर्वजांचा गौरव मनात ठेवणारा हिंदू आहे. येथे पूजेचा प्रश्नच येत नाही. येथे हिंदूंना पूजा बदलण्याच्या निमित्ताने त्याला बाहेर काढून ‘तू चूक, आम्हीच खरे’ या उदात्त विचाराने आपले गेलेले लोक परत आणण्याचा प्रयत्न केला जातो. संस्कृती म्हणजे पुस्तकातील व्याख्या नाही. संस्कृती जगून दाखविण्याचे काम संघाला सर्व समाजाला घेऊन करावे लागेल. स्वत:ला हिंदू म्हणवून घेणाऱ्यांची मंदिरे, पाणवठे, स्मशानभूमी वेगवेगळ्या आहेत. हे सर्व काही बदलावे लागणार आहे. हे राष्ट्र सार्वभौम आहे. त्यासाठी संघाचे काम वाढत आहे. वाढत जाणार आहे. विरोधकांना संघ खटाटोप करतो, शक्तिप्रदर्शन करतो, असे वाटत असले तरी संघ असे करतो हे स्वयंसेवकांसह नागरिकांनी जाणून घेतले पाहिजे. आजच्या जगरहाटीमध्ये संघाचा प्रभाव जीवनात आणण्यापलीकडे मोठे लक्ष्य असल्याचे डॉ़ भागवत म्हणाले़ नियोजनबद्ध आखणीमुळे पाऊण लाख नागरिक असतानाही कुठे गर्दी, गोंधळ झाला नाही. (प्रतिनिधी)पोळ्यांनी जोडली १५ हजार कुटुंबे > राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महासंगम सोहळ्यासाठी ६०० स्वयंसेवकांनी २ लाख पोळ्या संकलन करून शहरातील १५ हजार कुटुंबांना थेट संघाच्या कार्यात सहभागी करून घेतले. ‘पोळी संकलन’ हे प्रभावी माध्यम होऊ शकते, असा संदेश यातून देण्यात आला.> १०० एकर परिसरात आयोजित महासंगमावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी ड्रोनचा वापर केला. या ड्रोनला उच्च दर्जाचा कॅमेरा बसविला होता. याद्वारे प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात होती. रिमोटच्या साह्याने ड्रोनला सर्वत्र फिरविले जात होते. पोलिसांना एका ठिकाणी बसून कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर चोहोबाजूच्या हालचालींवर लक्ष ठेवता आले.