शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

दृष्टीआड नाशिकची ‘रामसृष्टी’

By admin | Updated: August 16, 2016 01:33 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ‘महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोदापार्कबाबत नेहमीच वाद होत असताना एकेकाळी भाजपाचा महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या रामसृष्टीचीही

- संंजय पाठक, नाशिक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ‘महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोदापार्कबाबत नेहमीच वाद होत असताना एकेकाळी भाजपाचा महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या रामसृष्टीचीही अवस्था बिकट असून, नुकत्याच झालेल्या महापुरामुळे तर दृष्टीआड रामसृष्टी अशी अवस्था झाली आहे.एखाद्या प्रकल्पाला विशिष्ट पक्ष अथवा व्यक्तीचे नाव जोडले गेल्यानंतर अर्थातच त्याची जबाबदारी संबंधितांची असते, प्रत्यक्षात तसे होत नाही. गोदापार्कचा नवा प्रकल्प गेल्या आठवड्यात आलेल्या पुरामुळे होत्याचा नव्हता झाला. तथापि, नाशिकमध्ये राजकीय अभिनिवेशातून अशाच प्रकारे भाजपाने रामसृष्टी उभारण्याचा केलेला खटाटोप पुरता वाया गेला आहे. नाशिक महापालिकेच्या १९९७च्या निवडणुकीच्या वेळी भाजपाने सत्ता आल्यास रामसृष्टी साकारण्याची घोषणा केली होती. ‘रामायण’ मालिकेचे निर्माते रामानंद सागर यांची भेट घेऊन संकल्पना राबविण्याचे ठरले. नाशिक प्रभू रामचंद्रांचे पदस्पर्श लाभलेली भूमी असल्याने पाऊलखुणा जपण्यासाठी रामसृष्टी साकारण्याचा मनोदय व्यक्त झाला. रामसृष्टीमध्ये रामाचे जीवनचरित्र रेखाटण्याबरोबरच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘लाइट अ‍ॅन्ड साउंड शो’च्या माध्यमातून हे चरित्र मांडण्याचे ठरविण्यात आले, परंतु त्याला आकार मिळाला नाही. २००५ मध्ये केंद्र शासनाने नेहरू अभियान राबविले तेव्हा गोदाकाठ सुशोभिकरण योजनेंतर्गत रामसृष्टीचा समावेश करण्यात आला. २०११ मध्ये तपोवनात लक्ष्मीनारायण पुलाखाली सुमारे सात एकर जागेत उद्यान साकारण्यात आले आणि त्यात पॅगोडा तसेच हॉल साकारण्यात आला. यात राम जीवनावरील सुमारे १३ म्युरल्स लावण्यात आले आहेत. तीन कोटी रुपये या प्रकल्पावर खर्च करण्यात आले, परंतु जी अवस्था गोदापार्कची तीच रामसृष्टीचीही झाली आहे. गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरच साकारलेल्या रामसृष्टीत पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. गेल्या आठवड्यात गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे गोदापार्कबरोबरच रामसृष्टीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात सत्ता असूनही...राज्यात भाजपाची सत्ता तर आहेच, शिवाय नाशिक शहरात चारपैकी तीन आमदार भाजपाचेच आहेत. कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले, त्या वेळी रामसृष्टीच्या पुनर्निर्माणाची मोठी संधी होती, परंतु भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने या प्रकल्पाची रया गेली आहे.