शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

कीटकनाशक कंपनीचे स्नेहभोजन शेतक-यांच्या जिवावर विषबाधेने एकाचा मृत्यू, तर ६७ अत्यवस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 23:24 IST

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील उमराळे बु।। येथे संकरित भाजीपाला क्षेत्रातील एका सिड्स कंपनीने आयोजित केलेल्या ‘संकरित टोमॅटो - यूएस ११४३’ या विषयावरील चर्चासत्रानंतर दिलेल्या स्नेहभोजनामुळे शेतक-यांना विषबाधा होऊन एका शेतक-याचा मृत्यू, तर ६७ जण अत्यवस्थ झाल्याची घटना बुधवारी (दि़८) घडली़ अतुल पांडुरंग केदार (४१, रा़ उमराळे बु।।) असे मृत्यू झालेल्या ...

ठळक मुद्दे दिंडोरी तालुक्यातील उमराळे बु।। येथील घटनाभाजीपाला क्षेत्रातील सिड्स कंपनीने आयोजित चर्चासत्रानंतर स्नेहभोजनअत्यवस्थांवर विविध रुग्णांलयात उपचार

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील उमराळे बु।। येथे संकरित भाजीपाला क्षेत्रातील एका सिड्स कंपनीने आयोजित केलेल्या ‘संकरित टोमॅटो - यूएस ११४३’ या विषयावरील चर्चासत्रानंतर दिलेल्या स्नेहभोजनामुळे शेतक-यांना विषबाधा होऊन एका शेतक-याचा मृत्यू, तर ६७ जण अत्यवस्थ झाल्याची घटना बुधवारी (दि़८) घडली़ अतुल पांडुरंग केदार (४१, रा़ उमराळे बु।।) असे मृत्यू झालेल्या शेतक-याचे नाव असून, अत्यवस्थांना जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ दरम्यान, केदार यांचा मृत्यू अन्न विषबाधेमुळे झाल्याची नोंद जिल्हा रुग्णालयात करण्यात आली असून, शवविच्छेदनानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे़

दिंडोरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बायर सिड्स या कंपनीने ‘संकरित टोमॅटो - यूएस ११४३’ या वानाचा पीक पाहणी कार्यक्रम व चर्चासत्राचे दिंडोरी तालुक्यातील उमराळे बु।। येथे बुधवारी सकाळी आयोजन केले होते़ या कार्यक्रमासाठी उपस्थित सुमारे २५० ते ३०० शेतक-यांना स्नेहभोजन देण्यात आले होते, त्यामध्ये मठ्ठ्याचाही समावेश असल्याची माहिती शेतक-यांनी दिली़ या जेवणानंतर अतुल केदार यांना उलटी व चक्कर आले. त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने उमराळेतील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर तत्काळ गंगापूर रोडवरील मॅग्नम हार्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले़ मात्र, प्रकृती बिघडल्याने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला़

या चर्चासत्रानंतर शेतक-यांना देण्यात येणारे स्नेहभोजनाचे केटरिंग मालक सुनील पोपट वडजे (४७, रा. मडकीजांब, ता. दिंडोरी) यांच्याकडे होते़ स्रेहभोजनानंतर सुमारे ६७ शेतक-यांना उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी दिंडोरी तसेच नाशिकच्या खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़ अन्नविषबाधा झालेल्यांपैकी दिंडोरी ग्रामीण रुग्णालय (१२), साईसिद्धी हॉस्पिटल (६), क्षीरसागर हॉस्पिटल (६), नाशिकमधील अपोलो हॉस्पिटल (२०), यशवंत हॉस्पिटल (१५) तर जिल्हा रुग्णालयात ८ रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत़ या सर्वांवर उपचार सुरू असून, या घटनेची दिंडोरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़विषबाधेतील चौघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार

दिंडोरी तालुक्यातील उमराळे बु।। येथे कंपनीतर्फे शेतक-यांना अल्पोपहार देण्यात आला होता़ या अन्नामुळे ६७ शेतक-यांना विषबाधा झाली असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ या रुग्णांमध्ये छबाबाई धोंडीराम कडाळी (३४), किसन सुखा कडाळी (६०), बाळू लक्ष्मण जाधव (५५) व मनीषा सुनील कडाळी (३२, सर्व रा़ उमराणे, ता़ दिंडोरी, जि़ नाशिक) यांचा समावेश आहे़ उर्वरित रुग्णांना शहरातील अपोलो हॉस्पिटल, दिंडोरी, पिंपळगाव बसवंत येथील खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे़