शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
3
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
4
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
5
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
6
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 
7
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
8
Sangareddy Pharma Company Blast: फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट, 'सिगाची'चा शेअर जोरदार आपटला; प्लांट बंद, उत्पादनावर मोठं संकट
9
"तो दहशतवाद नाही, त्यांचा संघर्ष", पाकिस्तानचे सैन्य प्रमुख मुनीर यांचे 'नापाक' बोल; भारताबद्दल काय म्हणाले?
10
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
11
या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
12
वॉरेन बफे यांचा ‘२० पंच कार्ड नियम’ तुम्हाला करेल श्रीमंत ! वाचा सविस्तर
13
४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती
14
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
15
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
16
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
17
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
18
Raymond Realty Stock Price: १००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
19
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
20
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...

नाशिक, नगरमधून जायकवाडीला पाणी

By admin | Updated: October 18, 2015 01:19 IST

मराठवाड्यातील जायकवाडी धरणात यंदाच्या हंगामात उर्ध्व भागातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय शनिवारी

औरंगाबाद/नाशिक : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात यंदाच्या हंगामात उर्ध्व भागातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय शनिवारी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. मराठवाड्याची १९.५ टीएमसीची मागणी मात्र मान्य करण्यात आली नाही. धरणांमधून पाणी सोडण्यास अजून आठवडाभराचा कालावधी लागणार असल्याची चिन्हे आहेत.पाण्याचा वहनव्यय (वॉटर लॉस) लक्षात घेता प्रत्यक्षात जायकवाडी धरणात ८ टीएमसी एवढेच पाणी मिळेल, असे सांगण्यात आले. दुष्काळी परिस्थितीशी मुकाबला करत असलेल्या मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याची मागणी होत आहे. महामंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक झाली. उर्ध्व भागातील धरणांमधून पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विकास महामंडळाचे नाशिक येथील मुख्य अभियंता निर्णय घेतील, असे बिराजदार म्हणाले. जायकवाडीच्या उर्ध्व धरणांमध्ये एकूण ६४.९१ टीएमसी पाणी पावसाळ्यात उपलब्ध झाले आहे. त्यापैकी खरीप हंगामासाठी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांनी १५.६ टीएमसी पाणी वापर केला आहे. गंगापूर धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यास विरोध दर्शविण्यासाठी शनिवारी जलचिंतन संस्था व पाणीवाटप संस्थेच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. नाशिक प्रशासन अनुत्सुकनाशिक जिल्हा प्रशासनाने पाणी सोडण्याबाबत अनुत्सुकता दर्शविली आहे. बैठकीत प्रतिनिधित्व करणारे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी सध्याची टंचाई परिस्थिती पाहता नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडणे योग्य होणार नसल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)पाणी पिण्यासाठीच- विजय शिवतारेशिर्डी : अहमदनगर-नाशिकच्या धरणातून मराठवाड्यासाठी सोडण्यात येणारे पाणी हे केवळ पिण्यासाठी व शेतीसाठी आहे़ मद्य निर्मितीसह तेथील अन्य उद्योगांना त्यातील एक थेंबही देण्यात येणार नाही, अशी ग्वाही जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शिर्डीत दिली़ साई दर्शनासाठी आलेल्या शिवतारे यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला़ ते म्हणाले, समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या आधारेच व उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून पाणी जायकवाडीमध्ये सोडण्याचा निर्णय झाला आहे. सरकारचा यात कोणताही हस्तक्षेप नाही.