शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक, नगरमधून जायकवाडीला पाणी

By admin | Updated: October 18, 2015 01:19 IST

मराठवाड्यातील जायकवाडी धरणात यंदाच्या हंगामात उर्ध्व भागातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय शनिवारी

औरंगाबाद/नाशिक : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात यंदाच्या हंगामात उर्ध्व भागातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय शनिवारी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. मराठवाड्याची १९.५ टीएमसीची मागणी मात्र मान्य करण्यात आली नाही. धरणांमधून पाणी सोडण्यास अजून आठवडाभराचा कालावधी लागणार असल्याची चिन्हे आहेत.पाण्याचा वहनव्यय (वॉटर लॉस) लक्षात घेता प्रत्यक्षात जायकवाडी धरणात ८ टीएमसी एवढेच पाणी मिळेल, असे सांगण्यात आले. दुष्काळी परिस्थितीशी मुकाबला करत असलेल्या मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याची मागणी होत आहे. महामंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक झाली. उर्ध्व भागातील धरणांमधून पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विकास महामंडळाचे नाशिक येथील मुख्य अभियंता निर्णय घेतील, असे बिराजदार म्हणाले. जायकवाडीच्या उर्ध्व धरणांमध्ये एकूण ६४.९१ टीएमसी पाणी पावसाळ्यात उपलब्ध झाले आहे. त्यापैकी खरीप हंगामासाठी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांनी १५.६ टीएमसी पाणी वापर केला आहे. गंगापूर धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यास विरोध दर्शविण्यासाठी शनिवारी जलचिंतन संस्था व पाणीवाटप संस्थेच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. नाशिक प्रशासन अनुत्सुकनाशिक जिल्हा प्रशासनाने पाणी सोडण्याबाबत अनुत्सुकता दर्शविली आहे. बैठकीत प्रतिनिधित्व करणारे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी सध्याची टंचाई परिस्थिती पाहता नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडणे योग्य होणार नसल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)पाणी पिण्यासाठीच- विजय शिवतारेशिर्डी : अहमदनगर-नाशिकच्या धरणातून मराठवाड्यासाठी सोडण्यात येणारे पाणी हे केवळ पिण्यासाठी व शेतीसाठी आहे़ मद्य निर्मितीसह तेथील अन्य उद्योगांना त्यातील एक थेंबही देण्यात येणार नाही, अशी ग्वाही जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शिर्डीत दिली़ साई दर्शनासाठी आलेल्या शिवतारे यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला़ ते म्हणाले, समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या आधारेच व उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून पाणी जायकवाडीमध्ये सोडण्याचा निर्णय झाला आहे. सरकारचा यात कोणताही हस्तक्षेप नाही.