शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

नाशिक, नगरमधून जायकवाडीला पाणी

By admin | Updated: October 18, 2015 01:19 IST

मराठवाड्यातील जायकवाडी धरणात यंदाच्या हंगामात उर्ध्व भागातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय शनिवारी

औरंगाबाद/नाशिक : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात यंदाच्या हंगामात उर्ध्व भागातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय शनिवारी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. मराठवाड्याची १९.५ टीएमसीची मागणी मात्र मान्य करण्यात आली नाही. धरणांमधून पाणी सोडण्यास अजून आठवडाभराचा कालावधी लागणार असल्याची चिन्हे आहेत.पाण्याचा वहनव्यय (वॉटर लॉस) लक्षात घेता प्रत्यक्षात जायकवाडी धरणात ८ टीएमसी एवढेच पाणी मिळेल, असे सांगण्यात आले. दुष्काळी परिस्थितीशी मुकाबला करत असलेल्या मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याची मागणी होत आहे. महामंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक झाली. उर्ध्व भागातील धरणांमधून पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विकास महामंडळाचे नाशिक येथील मुख्य अभियंता निर्णय घेतील, असे बिराजदार म्हणाले. जायकवाडीच्या उर्ध्व धरणांमध्ये एकूण ६४.९१ टीएमसी पाणी पावसाळ्यात उपलब्ध झाले आहे. त्यापैकी खरीप हंगामासाठी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांनी १५.६ टीएमसी पाणी वापर केला आहे. गंगापूर धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यास विरोध दर्शविण्यासाठी शनिवारी जलचिंतन संस्था व पाणीवाटप संस्थेच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. नाशिक प्रशासन अनुत्सुकनाशिक जिल्हा प्रशासनाने पाणी सोडण्याबाबत अनुत्सुकता दर्शविली आहे. बैठकीत प्रतिनिधित्व करणारे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी सध्याची टंचाई परिस्थिती पाहता नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडणे योग्य होणार नसल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)पाणी पिण्यासाठीच- विजय शिवतारेशिर्डी : अहमदनगर-नाशिकच्या धरणातून मराठवाड्यासाठी सोडण्यात येणारे पाणी हे केवळ पिण्यासाठी व शेतीसाठी आहे़ मद्य निर्मितीसह तेथील अन्य उद्योगांना त्यातील एक थेंबही देण्यात येणार नाही, अशी ग्वाही जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शिर्डीत दिली़ साई दर्शनासाठी आलेल्या शिवतारे यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला़ ते म्हणाले, समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या आधारेच व उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून पाणी जायकवाडीमध्ये सोडण्याचा निर्णय झाला आहे. सरकारचा यात कोणताही हस्तक्षेप नाही.