शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये ओसरली माणुसकी; भिंत ओस

By admin | Updated: March 14, 2017 04:54 IST

नागपूर येथे सुरू झालेल्या माणुसकीची भिंत या उपक्रमापासून प्रोत्साहित होऊन नाशिकमधील काही मंडळांनी शहरात माणुसकीची भिंंत उभी केली

संदीप भालेराव, नाशिकनागपूर येथे सुरू झालेल्या माणुसकीची भिंत या उपक्रमापासून प्रोत्साहित होऊन नाशिकमधील काही मंडळांनी शहरात माणुसकीची भिंंत उभी केली. मात्र अल्पावधीतच नाशिककरांनी या भिंतीकडे पाठ केली असून, दुसऱ्याला उपयोगात येतील अशा वस्तूंऐवजी या ठिकाणी अडगळीचे साहित्य आणि कपड्यांच्या चिंध्या टाकल्या जात आहेत. काही ठिकाणी तर भिंत केव्हाच गायब झाली आहे. जेथे भिंत टिकून आहे तेथे नाशिककरांची माणुसकी ओसरल्याने की काय सध्या माणुसकीची भिंत ओस पडली आहे. मागील वर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दानशूर नाशिककरांच्या भरवशावर काही सामाजिक संस्थांनी ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम सुरू केला. आपल्या घरातील वापरात नसलेले, परंतु चांगल्या स्थितीतील कपडे, वस्तू या ठिकाणी आणून द्यायच्या आणि ज्या गरजूंना त्या वस्तू उपयुक्त असतील त्यांनी त्या घेऊन जायच्या’ असा या भिंतीमागचा उद्देश. शहरातील केटीएचएम महाविद्यालय उड्डाणपुलाखाली, गोल्फ क्लबची संरक्षक भिंत तसेच नाशिक रोडला काही ठिकाणी ठरावीक भिंत ‘माणुसकीची भिंत’ म्हणून रंगविण्यात आली. या ठिकाणी नको असलेले कपडे अडकविण्यास हॅँगर्स लावले. महिला, पुरुष आणि लहान मुले यांच्यासाठीच्या कपड्यांसाठी स्वतंत्र हॅँगर्स लावले आहेत. त्यावेळी या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र अवघ्या चार-पाच महिन्यांपासून या भिंती ओस पडल्याचे चित्र आहे. गोल्फ क्लबजवळची भिंत तर गायबच झाली आहे. या ठिकाणची पाटीही पुसली गेली आहे. केटीएचएम उड्डाणपुलाखाली भिंत अस्तित्वात आहे. मात्र या ठिकाणी अक्षरश: फाटलेले, मळलेले इतकेच काय तर हात पुसायलाही कुणी वापरणार नाही इतके कळकट्ट कपडे ठेवून देण्यात आले आहेत. म्हणजे असे कपडे की ज्याचा वापर कुणालाही होणार नाही. वस्तू तर अभावानेच येतात. त्यातही तुटलेले फ्लॉवर पॉट, रंग उडालेल्या फ्रेम, तुटलेली प्लास्टिकची फुले अशा वस्तू अधिक असतात. खरे तर या वस्तूंचा कुणालाही उपयोग होणार नाही अशाच आहेत. खरे तर इतरांना उपयुक्त ठरतील अशा वस्तू जमा होतील, अशी आयोजकांनी अपेक्षा होती. परंतु लोक घरातील अडगळ कमी करण्यासाठी टाकाऊ वस्तू या भिंतीजवळ टाकत आहेत. वास्तविक हा उपक्रम चळवळ म्हणून पुढे येणे अपेक्षित असताना नकारात्मक मानसिकतेमुळे हा उपक्रम अर्ध्यावर सोडून देण्याची नामुष्की ओढावली आहे. (प्रतिनिधी)