शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
4
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
5
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
7
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
8
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
9
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
10
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
11
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
12
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
13
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
14
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
15
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
16
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
17
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
18
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
19
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
20
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर

नाशिक - कुंभमेळ्याच्या मंगलपर्वाची उद्या होणार सांगता

By admin | Updated: August 10, 2016 17:51 IST

शैव आणि वैष्णव पंथीय साधूंची मांदियाळी ठरणाऱ्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील सिंंहस्थ कुंभमेळ्याची सांगता सोहळ्याची घटिका समीप आली आहे.

- संजय पाठक

नाशिक, दि. 10 -  शैव आणि वैष्णव पंथीय साधूंची मांदियाळी ठरणाऱ्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील सिंंहस्थ कुंभमेळ्याची सांगता सोहळ्याची घटिका समीप आली आहे. गेले वर्षभर साधू-महंतांची पेशवाई आणि शाहीस्नान तसेच धर्मजागर यामुळे निर्माण झालेल्या मांगल्याच्या वातावरणाची सांगता गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झाली आणि आता सिंह राशीतून गुरू कन्या राशीत पदार्पण करत असताना गुरुवारी सिंहस्थ पर्वाची समाप्ती होणार आहे. दर बारा वर्षांनी होणाऱ्या या कुंभमेळ्याच्या आठवणी मात्र नागरिकांच्या स्मरणात राहणार आहेत. उद्या गुरुवारी (दि. ११) रात्री ९.३१ वाजता सिंह राशीत असलेला गुरू कन्या राशीत प्रवेश करणार असून त्याचवेळी सिंहस्थ कुंभमेळा समाप्तीची घोषणा होईल.समुद्रमंथनातून बाहेर पडलेला अमृतकुंभ प्राप्त करून घेण्यासाठी देव आणि दानव यांच्यात संघर्ष झाला. यावेळी जे चार थेंब अमृतकुंभातून हरिद्वार, प्रयाग, उज्जैन आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सांडल्याने या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो. नाशिकच्या कुंभमेळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे सिंह राशीत गुरू प्रवेश करतो त्यावेळी पर्वकाळास प्रारंभ होत असल्याने त्यास सिंहस्थ कुंभमेळा असे म्हटले जाते. गेल्या वर्षी १४ जुलैला सकाळी ६ वाजून १६ मिनिटांनी सिंहस्थ कुंभपर्वास प्रारंभ झाला. नाशिकला गोदाकाठी रामकुंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर त्र्यंबकेश्वरी श्री कुशावर्त तीर्थावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत धर्मध्वजा फडकविण्यात आली आणि त्याबरोबरच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कुंभपर्वास प्रारंभ झाला. नाशिकमध्ये वैष्णव पंथीय, तर त्र्यंबकेश्वर येथे शैव पंथीय साधूंच्या आगमनाला त्यानंतरच प्रारंभ झाला आणि नाशिकला एकाच दिवशी १९ आॅगस्टला आखाड्यांचे धर्मध्वजारोहण करण्यात आले, तर त्र्यंबकेश्वरी वेगवेगळ्या दिवशी पेशवाई केली आणि साधू-महंतांच्या आगमनाने दोन्ही ठिंकाणी अत्यंत धार्मिक वातावरण निर्माण झाले. नामसंकीर्तन, प्रवचने, चर्चा अशा धार्मिक चर्चांनी अखंड सुरू असलेल्या धर्मजागराचा कळस शाहीस्नानांनी घातला गेला. प्रत्येक आखाड्याच्या असलेल्या आराध्य देवतांची वाजत गाजत मिरवणूक काढून स्नानासाठी जाणे हा साराच शाही सोहळा असतो. नाशिकमध्ये तपोवनातू न रामकुंड तर त्र्यंबकेश्वरी नीलपर्वतीच्या पायथ्यापासून कुशावर्त तीर्थावर निघणाऱ्या या मिरवणुका यंदाही लक्षवेधी ठरल्या, परंतु थरारक खेळ आणि कसरती तसेच महंतांच्या आशीर्वचनाची कृपादृष्टी व्हावी यासाठी जगभरातून आलेल्या लाखो भाविकांनी शाही मिरवणूक आणि स्नानाचे सोहळे डोळ्यात साठवले. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये २९ आॅगस्ट तर १३ सप्टेंबर या दोन दिवस सामाईक तर अखेरच्या पर्वण्या स्वतंत्र होत्या. नाशिकमध्ये वैष्णव पंथीयांचे तीन आखाडे आणि सुमारे साडेसहाशे खालसे तर त्र्यंबकेश्वरमध्ये दहा आखाड्यातील साधू विशेषत: नागा साधूंच्या सहभागाने पार पडलेल्या या सर्वच पर्वण्या पारणे फेडणाऱ्या ठरल्या. साधू-महंतांच्या पेशवाईपासून बिदाई पर्यंतच्या तीन महिन्यांच्या कालावधीत अवघा चैतन्योत्सवच होता. अन्य तीन ठिकाणांपेक्षा नाशिकमध्ये भरणारा कुंभमेळा हा पावसाळ्यात असल्याने प्रशासनाला कुंभमेळ्याच्या सुविधा पुरविण्याचे मोठे आव्हान होते; मात्र शासन आणि प्रशासन यांनी ते लीलया पेलले अर्थातच, नियोजनात पर्वणीच्या तीन दिवस घालण्यात आलेले अतिरेकी निर्बंध टीकेचे धनी ठरले. पहिल्या पर्वणीला भाविकच न आल्याने कर्फ्युमेळा म्हणून जोरदार टीका झाल्यानंतर निर्बंध शिथिल झाले आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्वणीला जनसागर लोटला. सिंहस्थाच्या चैतन्यदायी मंगल आठवणींबरोबरच या कटू आठवणी संग्रही ठेवून या पर्वाला निरोप द्यावा लागणार आहे. गुरुवारी (दि. ११) रात्री ९.३१ वाजता सिंह राशीत असलेला गुरू कन्या राशीत प्रवेश करणार असून त्याचवेळी सिंहस्थ कुंभमेळा समाप्तीची घोषणा होईल. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे गुरुवारी सायंकाळपासूनच धार्मिक विधी होणार असून दोन्ही ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हजेरी लावणार आहेत.