शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

नार्वेकर, जानभोर यांना पत्रकारिता पुरस्कार

By admin | Updated: April 6, 2016 22:06 IST

नागपूरच्या अरविंदबाबू देशमुख प्रतिष्ठानतर्फे अरविंदबाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कारांचे मुंबईतील राजभवनात थाटात वितरण झाले. राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरणमुंबई: नागपूरच्या अरविंदबाबू देशमुख प्रतिष्ठानतर्फे अरविंदबाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कारांचे मुंबईतील राजभवनात थाटात वितरण झाले. राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यभरातील ज्येष्ठ पत्रकारांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. जीवनगौरव पुरस्कार मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांना तर नागपूर विभागीय पुरस्कार नागपूर ‘लोकमत’च्या गजानन जानभोर यांना प्रदान करण्यात आला. राजभवनात बुधवारी संध्याकाळी हा सोहळा थाटात पार पडला. पत्रकारितेच्या क्षेत्रात समाजजागृती आणि सामाजिक जीवनस्तर उंचावण्यासाठी कार्यरत असणाऱ्या पत्रकारांना गेल्या दशकभरापासून विदर्भाच्या स्तरावर हे पुरस्कार दिले जात होते. यंदा प्रथमच राज्यस्तरावर या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. विभागनिहाय पुरस्कार पटकावणे पत्रकार असे: मुंबई विभाग -शर्मिला कलगुटकर (मुंबई), पुणे-सातारा-सोलापूर विभाग- प्रशांत जोशी (सोलापूर), कोल्हापूर-सांगली-कोकण विभाग- जयसिंग कुंभार (सांगली), उत्तर महाराष्ट्र विभाग -दीप्ती राऊत (नाशिक), अमरावती विभाग -सोमनाथ सावळे (बुलढाणा), नागपूर विभाग -गजानन जानभोर (नागपूर), मराठवाडा विभाग -प्रमोद कुलकर्णी (बीड), विशेष पुरस्कार -इंग्रजी- संतोष आंधळे (मुंबई), हिंदी- संजय देशमुख (नागपूर). - पत्रकारांवरील हल्ले थांबावेत - राज्यपालराज्यासह अन्य ठिकाणीही पत्रकारांवर होणारे हल्ले क्लेषदायक असल्याचे राज्यपाल विद्यासागर यांनी सांगितले. त्यामुळे पत्रकारांना संरक्षण मिळण्यासाठी कठोर कायदा आणण्याची सूचना त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या कायद्यासाठी गंभीर असल्याचा उल्लेखही त्यांनी आवर्जून केला. पत्रकारांची सहकार्य लोकशाहीच्या मजबुतीकरणासाठी तसेच प्रशासकीय सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी अत्यावश्यक असल्याचेही राज्यपाल म्हणाले.