शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
3
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
5
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
6
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
7
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
8
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
9
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
10
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
11
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
12
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
13
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
14
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
15
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
16
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
17
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
18
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
19
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
20
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

नरेंद्र नव्हे, मौनेंद्र मोदी!

By admin | Updated: July 30, 2014 02:50 IST

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारच्या धोरणांवर मौन धारण केलेल्या मोदींचा उल्लेख ‘मौनेंद्र मोदी’ अशा उपहासात्मक शब्दांत केला.

मुख्यमंत्र्यांचे टीकास्त्र : केंद्र सरकारच्या धोरणांवर पंतप्रधानांचे मौन 
मुंबई : पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून नरेंद्र मोदी गप्प का, असा सवाल करीत त्यांची हुकूमशहासारखी कार्यशैली असून लोकशाहीसाठी ती अत्यंत घातक असल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना केली. सरकारच्या धोरणांवर मौन धारण केलेल्या मोदींचा उल्लेख त्यांनी ‘मौनेंद्र मोदी’ अशा उपहासात्मक शब्दांत केला.
निवडणुकीपूर्वी मोदी यांनी जी स्वप्ने दाखविली होती, ती आता भंगली आहेत. त्यामुळेच उत्तराखंडमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत लोकांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी भाजपाला नाकारून काँग्रेसच्या पारडय़ात आपले मत टाकले, असे सांगून चव्हाण म्हणाले, की  गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना मोदींची कार्यपद्धती हुकूमशहासारखी होती, हे काँग्रेसला माहिती होते. त्यामुळे पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिल्लीतही हुकूमशाही येण्याचा धोका व्यक्त केला होता. आता हे सर्व लोकांसमोर आले. 
केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्र्यांना कसे वागविले जाते, मंत्र्यांना किती स्वातंत्र्य दिले जाते, कोअर टीममध्ये कोण कोण मंत्री आहेत, या सगळ्य़ावरून हे स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले. केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारविरोधात ब:याच मुद्दय़ांवरून लोकांचा रोष होता, मोदींनी स्वत:चे मार्केटिंग करण्यासाठी त्याचा उपयोग केला. मोदींनी एखादी टुथपेस्ट किंवा साबणाप्रमाणो स्वत:ची विक्री केली. त्यासाठी त्यांनी मार्केटिंगचे तंत्र, जाहिरातबाजीचे कसब आणि इतरही क्लृप्त्यांचा आधार घेतला, हे सांगण्यासही मुख्यमंत्री विसरले नाहीत. (वृत्तसंस्था)
 
मुख्यमंत्री म्हणाले..
लोकांनी मोदी सरकारची तुलना काँग्रेस सरकारबरोबर करण्यास सुरुवात केली 
आहे. जेथे मंत्र्यांना सन्मान दिला जात होता, दैनंदिन संवाद होता. त्यांच्यावर निश्चित अशी जबाबदारी होती. ते सगळे आता 
गायब झाले आहे. 
 
केवळ टि¦टरवर प्रतिक्रिया 
मोदी केवळ टि¦टरवर प्रतिक्रिया देतात. हे टि¦ट नेमके त्यांनी केले आहेत की, एखाद्या कार्यक्षम अधिका:याने किंवा पक्षाच्या कार्यकत्र्याने, हे समजण्यास 
वाव नसतो.
 
मोदी गप्प का?
परराष्ट्र धोरण, आर्थिक धोरण, सामाजिक विषय, समान नागरी कायदा, राममंदिर, कलम 37क् यावर पंतप्रधान म्हणून मोदींनी अद्याप आपले मत स्पष्टपणो मांडलेले नाही. त्यांनी केवळ लोकांना स्वप्नं दाखविण्याचे काम केल्याचे चव्हाण म्हणाले.