शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मोदींच्या गुजरातलाही मंदीचा फटका, 7 हिरा कारागिरांची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 19:51 IST

देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असून विकास दरातही घसरण झाली आहे.

अहमदाबाद - देशातील मंदीचा फटका अनेक उद्योग धंद्यांना बसला आहे. गुजरातमधील हिरा व्यापाऱ्यांच्या उद्योगालाही याचा फटका बसला आहे. पाटीदार समजाचे नेते हार्दीक पटेल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन देशातील मंदीबाबत बोलताना गुजरातमधील भीषण वास्तव सांगितले. गुजरातमधील हिरा कामगारांनी मंदीमुळे आत्महत्या केल्याचं पटेल यांनी म्हटलंय. 

देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असून विकास दरातही घसरण झाली आहे. मोदींच्या गुजरातमध्येही या मंदीचा फटका जाणवत असून हे गंभीर असल्याचं हार्दीक पटेल यांनी म्हटलंय. सुरतमधील हिरा उद्योगात एका कलाकाराने आत्महत्या केली आहे. गेल्या महिनाभरात सुरतमध्येच मंदीमुळे 7 हिरा कारागिरांनी आत्महत्या करुन सरकारला जागं करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, मंदीमधून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सरकार काहीच प्रयत्न करत नाही, असेही हार्दीक पटेल यांनी म्हटले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत अनेकांनी आपली मते नोंदवली असून अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या पतीनेही चिंता व्यक्ती केली होती.   

देशाची अर्थव्यवस्था सध्या इतकी गंभीर आहे की पुढील किमान तीन वर्षे तरी ती रुळावर येईल अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत, अशी भीती माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केली. अर्थतज्ञ आणि अर्थमंत्र्यांसह कुणाचेही न ऐकता एकांगी निर्णय घेणारे पंतप्रधान मोदीच या ढासळणाऱ्या अर्थव्यवस्थेला एकटे जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, "देशातील अर्थव्यवस्थेवर १९९१, १९९८  आणि २00८ अशा तीन वेळा संकट आले. पण, ते देशांतर्गतपेक्षा जागतिक पातळीवरील घडामोडीमुळे आले होते. याउलट २0१९ मध्ये आलेली परिस्थिती मात्र देशातंर्गत असून सरकारच्य वैयक्तीक धोरणामुळे ओढवली आहे. नोटाबंदी, जीएसटी या दोन धोरणांनी अर्थव्यवस्थेच कंबरडेच मोडून टाकले आहे. यातून बाहेर काढण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याऐवजी कार्पोरेट क्षेत्राला करसवलतीचा तकलादू उपाय केला जात आहे. यातून मोजक्याच श्रीमंताना फायदा झाला", असेही यशवंत सिन्हा यांनी पत्रकाराशीं बोलताना सांगितले. 

 

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्थाNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनGujaratगुजरातSuicideआत्महत्या