शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मोदींच्या गुजरातलाही मंदीचा फटका, 7 हिरा कारागिरांची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 19:51 IST

देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असून विकास दरातही घसरण झाली आहे.

अहमदाबाद - देशातील मंदीचा फटका अनेक उद्योग धंद्यांना बसला आहे. गुजरातमधील हिरा व्यापाऱ्यांच्या उद्योगालाही याचा फटका बसला आहे. पाटीदार समजाचे नेते हार्दीक पटेल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन देशातील मंदीबाबत बोलताना गुजरातमधील भीषण वास्तव सांगितले. गुजरातमधील हिरा कामगारांनी मंदीमुळे आत्महत्या केल्याचं पटेल यांनी म्हटलंय. 

देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असून विकास दरातही घसरण झाली आहे. मोदींच्या गुजरातमध्येही या मंदीचा फटका जाणवत असून हे गंभीर असल्याचं हार्दीक पटेल यांनी म्हटलंय. सुरतमधील हिरा उद्योगात एका कलाकाराने आत्महत्या केली आहे. गेल्या महिनाभरात सुरतमध्येच मंदीमुळे 7 हिरा कारागिरांनी आत्महत्या करुन सरकारला जागं करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, मंदीमधून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सरकार काहीच प्रयत्न करत नाही, असेही हार्दीक पटेल यांनी म्हटले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत अनेकांनी आपली मते नोंदवली असून अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या पतीनेही चिंता व्यक्ती केली होती.   

देशाची अर्थव्यवस्था सध्या इतकी गंभीर आहे की पुढील किमान तीन वर्षे तरी ती रुळावर येईल अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत, अशी भीती माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केली. अर्थतज्ञ आणि अर्थमंत्र्यांसह कुणाचेही न ऐकता एकांगी निर्णय घेणारे पंतप्रधान मोदीच या ढासळणाऱ्या अर्थव्यवस्थेला एकटे जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, "देशातील अर्थव्यवस्थेवर १९९१, १९९८  आणि २00८ अशा तीन वेळा संकट आले. पण, ते देशांतर्गतपेक्षा जागतिक पातळीवरील घडामोडीमुळे आले होते. याउलट २0१९ मध्ये आलेली परिस्थिती मात्र देशातंर्गत असून सरकारच्य वैयक्तीक धोरणामुळे ओढवली आहे. नोटाबंदी, जीएसटी या दोन धोरणांनी अर्थव्यवस्थेच कंबरडेच मोडून टाकले आहे. यातून बाहेर काढण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याऐवजी कार्पोरेट क्षेत्राला करसवलतीचा तकलादू उपाय केला जात आहे. यातून मोजक्याच श्रीमंताना फायदा झाला", असेही यशवंत सिन्हा यांनी पत्रकाराशीं बोलताना सांगितले. 

 

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्थाNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनGujaratगुजरातSuicideआत्महत्या