शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
2
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
3
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
4
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
5
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
6
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
7
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
8
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
9
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
10
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
11
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
12
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
13
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
14
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
15
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
16
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
17
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
18
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
19
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
20
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या गुजरातलाही मंदीचा फटका, 7 हिरा कारागिरांची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 19:51 IST

देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असून विकास दरातही घसरण झाली आहे.

अहमदाबाद - देशातील मंदीचा फटका अनेक उद्योग धंद्यांना बसला आहे. गुजरातमधील हिरा व्यापाऱ्यांच्या उद्योगालाही याचा फटका बसला आहे. पाटीदार समजाचे नेते हार्दीक पटेल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन देशातील मंदीबाबत बोलताना गुजरातमधील भीषण वास्तव सांगितले. गुजरातमधील हिरा कामगारांनी मंदीमुळे आत्महत्या केल्याचं पटेल यांनी म्हटलंय. 

देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असून विकास दरातही घसरण झाली आहे. मोदींच्या गुजरातमध्येही या मंदीचा फटका जाणवत असून हे गंभीर असल्याचं हार्दीक पटेल यांनी म्हटलंय. सुरतमधील हिरा उद्योगात एका कलाकाराने आत्महत्या केली आहे. गेल्या महिनाभरात सुरतमध्येच मंदीमुळे 7 हिरा कारागिरांनी आत्महत्या करुन सरकारला जागं करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, मंदीमधून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सरकार काहीच प्रयत्न करत नाही, असेही हार्दीक पटेल यांनी म्हटले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत अनेकांनी आपली मते नोंदवली असून अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या पतीनेही चिंता व्यक्ती केली होती.   

देशाची अर्थव्यवस्था सध्या इतकी गंभीर आहे की पुढील किमान तीन वर्षे तरी ती रुळावर येईल अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत, अशी भीती माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केली. अर्थतज्ञ आणि अर्थमंत्र्यांसह कुणाचेही न ऐकता एकांगी निर्णय घेणारे पंतप्रधान मोदीच या ढासळणाऱ्या अर्थव्यवस्थेला एकटे जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, "देशातील अर्थव्यवस्थेवर १९९१, १९९८  आणि २00८ अशा तीन वेळा संकट आले. पण, ते देशांतर्गतपेक्षा जागतिक पातळीवरील घडामोडीमुळे आले होते. याउलट २0१९ मध्ये आलेली परिस्थिती मात्र देशातंर्गत असून सरकारच्य वैयक्तीक धोरणामुळे ओढवली आहे. नोटाबंदी, जीएसटी या दोन धोरणांनी अर्थव्यवस्थेच कंबरडेच मोडून टाकले आहे. यातून बाहेर काढण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याऐवजी कार्पोरेट क्षेत्राला करसवलतीचा तकलादू उपाय केला जात आहे. यातून मोजक्याच श्रीमंताना फायदा झाला", असेही यशवंत सिन्हा यांनी पत्रकाराशीं बोलताना सांगितले. 

 

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्थाNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनGujaratगुजरातSuicideआत्महत्या