शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

नारायणदास जाजू यांचे निधन

By admin | Updated: December 12, 2015 02:40 IST

स्वातंत्र्यसेनानी व ज्येष्ठ गांधीवादी नारायणदास श्रीकृष्णदास जाजू यांचे शुक्रवारी पहाटे येथील जाजूवाडीतील निवासस्थानी निधन झाले

वर्धा : स्वातंत्र्यसेनानी व ज्येष्ठ गांधीवादी नारायणदास श्रीकृष्णदास जाजू यांचे शुक्रवारी पहाटे येथील जाजूवाडीतील निवासस्थानी निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. सकाळी १० वाजता स्थानिक मोक्षधामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. धार्मिक परंपरेला फाटा देत त्यांच्या स्नुषांनी त्यांच्या पार्थिवाला खांदा देऊन अग्नीदेखील दिला.सहा महिन्यांपासून ते आजारी होते. १४ दिवसांपूर्वीच त्यांनी संलेखनाव्रत सुरू केले होते. अन्न, औषध, पाणी वर्ज्य करीत आयुष्याची निवृत्ती स्वीकारली होती. धार्मिक रुढींना फाटा देत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी यमुनाताई, डॉ. उल्हास, डॉ. सुहास ही मुले, स्नुषा व नातवंडे असा आप्त परिवार आहे. जाजू यांचा जन्म २४ एप्रिल १९२२ रोजी वर्धा येथे झाला. १९४० मध्ये वर्ध्यातील पहिल्या जी. एस. कॉमर्स कॉलेजचे ते पहिले विद्यार्थी होते. १९४२च्या ‘चले जाव’ आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. यामध्ये त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. गेल्या वर्षी शिक्षा मंडळाच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात त्यांचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. रविवारी दुपारी ४ वाजता जाजूवाडी येथे प्रार्थना सभा होणार आहे. (प्रतिनिधी)