शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

महानगरपालिका, जिल्हा परिषदांमध्ये प्रचार दौरा करणार - नारायण राणे

By admin | Updated: January 20, 2017 20:13 IST

राज्यातील १0 महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदांमध्ये आपण प्रचार दौरा करणार असून प्रत्येक ठिकाणी किमान एक तरी प्रचारसभा घेणार आहे.

ऑनलाइन लोकमत
कणकवली. दि. 20 -  राज्यातील १0 महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदांमध्ये आपण प्रचार दौरा करणार असून प्रत्येक ठिकाणी किमान एक तरी प्रचारसभा घेणार आहे. तसेच ठाणे आणि मुंबई महानगरपालिकेसाठी जास्त वेळ देणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते आमदार नारायण राणे यांनी दिली.
कणकवली येथील ओम गणेश या निवासस्थानी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत उपस्थित होते.
नारायण राणे म्हणाले, मुंबई शहरावर गेली २२ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेने मुंबई शहराची वाट लावली. ही पालिका भ्रष्टाचाराचा अड्डा असल्याचे मत भाजपाचे नेतेच व्यक्त करतात आणि आता युती करण्यासाठी म्हणे बोलणी करत आहेत. एक मेकांची उणीधुणी काढणा-या या दोन्ही पक्षांची मिलीभगत असून आम्ही मतदारांना आणि नागरिकांना तेच पटवून देणार आहोत. महापालिकेसाठी त्यामुळे जरी या दोघांची युती झाली तरी  काँग्रेसच्या यशामध्ये तिळमात्र फरक पडणार नाही. 
राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या  काळात गेल्या २0 वर्षात मुंबईतील नागरिकांवर किती कर लावले याची माहिती आधी घ्यावी. त्यानंतरच त्यांनी त्याबाबत भाष्य करावे. तसेच नेमके कोणते कर कमी करणार हे त्यानी सांगावे. मात्र त्यांना दूरदृष्टीच नाही. त्यामुळे ते याबाबत काय सांगणार ? मुंबईतील नाले, गटार ,रस्ते अशा सर्वच कामात भ्रष्टाचार झाला असून शिवसेना, भाजप त्याला जबाबदार असून फक्त लोकांची दिशाभूल करण्यासाठी ते आता एकमेकांवर आरोप करीत आहेत.
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शेकापच्या उमेदवाराला माझा पाठिंबा असणार नाही. शेकाप जरी विरोधी पक्ष असला तरी शिवसेना, भाजपशी  त्यांचा अंतर्गत संबध आहे. असेही राणे यांनी यावेळी सांगितले. 
 
काँग्रेसमध्ये दुफळी नाही
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर काँग्रेस मधील नेत्यांची दुफळी दिसून येत आहे. याबाबत आपले म्हहणणे काय?असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, वैचारिक मतभेद तर सर्वच पक्षात असतात. मात्र, त्याला दुफळी म्हणता येणार नाही. मतभेद असले तरी काँग्रेस मधील सर्व नेते निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येतील आणि विजय मिळवतील.
 
सत्तेत आहोत, सत्तेत रहाणार!
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सत्तेत सध्या आम्ही आहोत आणि कोणी कितीही प्रयत्न केले तरी यापुढेही सत्तेत रहाणार आहोत. येथील जनता आमच्या सोबत असल्याने  विरोधकांनी कितीही आरोप केले तरी  विजय आमचाच आहे असे नारायण राणे यांनी यावेळी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना - भाजप युती करून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक एकत्रितपणे लढले तरी काँग्रेसवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. जिल्हा परिषदेच्या पन्नासही जागांवर काँग्रेसचेच उमेदवार विजय मिळवून पुन्हा सत्ता काबिज करतील.
 
प्रथमेश तेली हल्ला प्रकरणात काडीमात्र संबंध नाही
प्रथमेश तेली याच्यावर दादर येथे झालेल्या हल्ला प्रकरणात नीतेश राणे किवा काँग्रेसचा काडीमात्र संबंध नाही. लोकांची दिशाभूल करण्याचे विरोधकांनी आता सोडावे, असे नारायण राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.