शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

महानगरपालिका, जिल्हा परिषदांमध्ये प्रचार दौरा करणार - नारायण राणे

By admin | Updated: January 20, 2017 20:13 IST

राज्यातील १0 महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदांमध्ये आपण प्रचार दौरा करणार असून प्रत्येक ठिकाणी किमान एक तरी प्रचारसभा घेणार आहे.

ऑनलाइन लोकमत
कणकवली. दि. 20 -  राज्यातील १0 महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदांमध्ये आपण प्रचार दौरा करणार असून प्रत्येक ठिकाणी किमान एक तरी प्रचारसभा घेणार आहे. तसेच ठाणे आणि मुंबई महानगरपालिकेसाठी जास्त वेळ देणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते आमदार नारायण राणे यांनी दिली.
कणकवली येथील ओम गणेश या निवासस्थानी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत उपस्थित होते.
नारायण राणे म्हणाले, मुंबई शहरावर गेली २२ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेने मुंबई शहराची वाट लावली. ही पालिका भ्रष्टाचाराचा अड्डा असल्याचे मत भाजपाचे नेतेच व्यक्त करतात आणि आता युती करण्यासाठी म्हणे बोलणी करत आहेत. एक मेकांची उणीधुणी काढणा-या या दोन्ही पक्षांची मिलीभगत असून आम्ही मतदारांना आणि नागरिकांना तेच पटवून देणार आहोत. महापालिकेसाठी त्यामुळे जरी या दोघांची युती झाली तरी  काँग्रेसच्या यशामध्ये तिळमात्र फरक पडणार नाही. 
राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या  काळात गेल्या २0 वर्षात मुंबईतील नागरिकांवर किती कर लावले याची माहिती आधी घ्यावी. त्यानंतरच त्यांनी त्याबाबत भाष्य करावे. तसेच नेमके कोणते कर कमी करणार हे त्यानी सांगावे. मात्र त्यांना दूरदृष्टीच नाही. त्यामुळे ते याबाबत काय सांगणार ? मुंबईतील नाले, गटार ,रस्ते अशा सर्वच कामात भ्रष्टाचार झाला असून शिवसेना, भाजप त्याला जबाबदार असून फक्त लोकांची दिशाभूल करण्यासाठी ते आता एकमेकांवर आरोप करीत आहेत.
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शेकापच्या उमेदवाराला माझा पाठिंबा असणार नाही. शेकाप जरी विरोधी पक्ष असला तरी शिवसेना, भाजपशी  त्यांचा अंतर्गत संबध आहे. असेही राणे यांनी यावेळी सांगितले. 
 
काँग्रेसमध्ये दुफळी नाही
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर काँग्रेस मधील नेत्यांची दुफळी दिसून येत आहे. याबाबत आपले म्हहणणे काय?असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, वैचारिक मतभेद तर सर्वच पक्षात असतात. मात्र, त्याला दुफळी म्हणता येणार नाही. मतभेद असले तरी काँग्रेस मधील सर्व नेते निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येतील आणि विजय मिळवतील.
 
सत्तेत आहोत, सत्तेत रहाणार!
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सत्तेत सध्या आम्ही आहोत आणि कोणी कितीही प्रयत्न केले तरी यापुढेही सत्तेत रहाणार आहोत. येथील जनता आमच्या सोबत असल्याने  विरोधकांनी कितीही आरोप केले तरी  विजय आमचाच आहे असे नारायण राणे यांनी यावेळी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना - भाजप युती करून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक एकत्रितपणे लढले तरी काँग्रेसवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. जिल्हा परिषदेच्या पन्नासही जागांवर काँग्रेसचेच उमेदवार विजय मिळवून पुन्हा सत्ता काबिज करतील.
 
प्रथमेश तेली हल्ला प्रकरणात काडीमात्र संबंध नाही
प्रथमेश तेली याच्यावर दादर येथे झालेल्या हल्ला प्रकरणात नीतेश राणे किवा काँग्रेसचा काडीमात्र संबंध नाही. लोकांची दिशाभूल करण्याचे विरोधकांनी आता सोडावे, असे नारायण राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.