शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

नारायण राणे आणि उद्धव ठाकरे तब्बल 12 वर्षानंतर एकाच मंचावर

By admin | Updated: June 23, 2017 20:26 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि नारायण राणे तब्बल 12 वर्षांनी एकाच मंचावर आले

ऑनलाइन लोकमत
सिंधुदूर्ग, दि. 23 - राजकारणात काहीही अशक्य नाही असं म्हणतात....याचा प्रत्यय आज सिंधुदूर्गकरांना आला जेव्हा राजकारणातील कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे एकाच मंचावर आले. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर तब्बल 12 वर्षांनी एकत्र आले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील कार्यक्रमाला उपस्थित होते. 
 
नारायण राणेंनी यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली. इतकंच नाही तर नरेंद्र आणि देवेंद्र सरकारचंही तोंडभरुन कौतुक केलं. विशेष म्हणजे नारायण राणे यांनी कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचं स्वागत केलं. नेहमी एकमेकांवर टीका करत चेहराही न पाहणारे विरोधक आज एकमेकांचं स्वागत करत असल्याचं पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 
 
त्यातच राणेंनी गडकरींच्या स्वागतासाठी बॅनरबाजी केली होती. मुख्य म्हणजे बॅनरमधून काँग्रेसचा हातही गायब होता. "राज्यात देवेंद्र आणि केंद्रात नरेंद्र विकासासाठी प्रयत्न करत आहेत. विकासाच्या आड राजकारण येता कामा नये. जिथे विकास आहे, तिथे पक्षीय राजकारण करु नये", असं यावेळी नारायण राणे बोलले आहेत.  यावेळी नारायण राणेंनी नितीन गडकरींचा विकासपुरुष म्हणून उल्लेख केला. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे भाजपाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. या कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
 
उद्धव ठाकरेंसंबंधी बोलताना आपण  टीका करताना कधीही त्यांचा एकेरी उल्लेख केला नाही, असं नारायण राणेंनी सांगितलं. 
 
उद्धव ठाकरे यांनीदेखील भाषणात बोलताना नारायण राणेंचा उल्लेख करत नारायणराव राणे माझे पूर्वीचे सहकारी असल्याचं सांगितलं. ""कोकण मुंबई हृदय एकच आहे. रस्ते अरुंद असले तरी हृदय विशाल आहेत  या चौपदरीकरणामुळे मुंबईतले कोकणी वेगानं गावी येतील", असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. उद्धव ठाकरे भाषण करत असताना जोरदार पावसाला सुरुवात झाली, यावर हा तर आशिर्वाद असल्याचं ते बोलले. ""या सुख सोयी स्थानिकांना हव्यात उप-यांना नको"", असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.