शहरं
Join us  
Trending Stories
1
लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा भाग मानू नका, कर्नाटकात जात सर्वेक्षणापूर्वी मोठी मागणी
2
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
3
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
4
Maratha Reservation: दसरा मेळाव्यात सरकारविरोधात...; हैदराबाद गॅझेटवरून जरांगेंचा सरकारला इशारा
5
GST Updates: रोजच्या वापराच्या वस्तू होणार स्वस्त; कर कपातीचा लाभ थेट ग्राहकांना मिळणार
6
Donald Trump: "हा शेवटचा इशारा, नाही तर...", डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कुणाला दिली धमकी?
7
"मी 'सिंगल मदर' नाही...", एक्स पतीच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री; ईशा देओलची पहिली प्रतिक्रिया
8
दहशतवादी कट प्रकरणात मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये एनआयएची धाड
9
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२३,५०८ चं फिक्स व्याज, गॅरेंटीसह मिळेल रक्कम
10
W W W ... पाकिस्तानच्या मोहम्मद नवाजची हॅटट्रिक, Asia Cupआधी उडवली फलंदाजांची झोप
11
Post Office च्या 'या' स्कीममध्ये वर्षाला ₹५०,००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळतील १३ लाख, व्हाल मालामाल
12
ट्रम्प यांच्या टॅरिफ'वर तोडगा काढण्यासाठी भारत अन् युरोपियन युनियन एकत्र! 'एफटीए'सह अनेक मुद्द्यांवर विशेष प्लान बनवला
13
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
14
"गुजरातवरुन आणलेला महागडा तराफा राजाला आवडला नसेल...", 'लालबागचा राजा' विसर्जनावरुन मराठी अभिनेत्रीची खोचक पोस्ट
15
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
16
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
17
जेद्दाह किनाऱ्याजवळ केबल तुटली, इंटरनेटचा स्पीड झाला कमी
18
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
19
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
20
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था

नारळीकरांना साहित्य अकादमी पुरस्कार

By admin | Updated: December 20, 2014 03:02 IST

साहित्य क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठीत साहित्य अकादमी पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली

मुंबई : साहित्य क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठीत साहित्य अकादमी पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक व शास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि गोव्यातील ज्येष्ठ साहित्यिका माधवी सरदेसाई यांना साहित्य अकादमीच्या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. जयंत नारळीकर यांना ‘चार नगरातले माझे विश्व’ या आत्मकथनात्मक पुस्तकासाठी तर माधवी सरदेसाई यांना कोकणी भाषेतील ‘मंथन’ या लेखसंग्रहासाठी गौरवण्यात येणार आहे.गोवा विद्यापीठातील कोकणी विभागात ज्येष्ठ व्याख्यात्या असलेल्या माधवी सरदेसाई ‘जाग’ या कोकणी नियतकालिकाच्या संपादक आहेत. कोकणी साहित्यातील संशोधनात्मक लेखनात त्यांचे मोलाचे योगदान आहे. साहित्य अकादमी पुरस्काराच्या इतर मानकऱ्यांमध्ये आसामी-अरूपा पतंगिया कलिटा (मरियम अस्टिन अथाबा हिरा बारुआ), बंगाली- उत्पलकुमार बासू (पिया माना भाबे), बोडो-उरखाओ ग्वरा ब्रह्मा (उदग्नीफ्राय गिदिंगफिनाय), डोगरी- शैलेंद्र सिंग (हाशिये पार), गुजराती- कै. अश्विन मेहता (छबी भितरनी), इंग्रजी- अदिल जुस्सावाला (ट्रायिंग टू से गुडबाय), हिंदी- रमेशचंद्र शहा (विनायक), कन्नड- जी. एच. नायक (उत्तरार्ध), काश्मिरी- शद रमझान (कोरे ककुड पुशरिथ गोमे), मैथिली- आशा मिश्रा (उचट), मल्याळाम- शुभाष चंद्रन (मनुष्यानू ओरू आमुखम), नेपाळी - नंद हंखिम (सत्ताग्रहण), उडिया- गोपाळकृष्ण रथ (बिपुला डिगांथा), पंजाबी- जसविंदर (अगरबत्ती), राजस्थानी- रामपाल सिंग राजपुरोहित (सुंदर नैन सुधा), संथाली- जमदर किस्कु (माला मुदाम), सिंधी- गोपी कमल (सिजा अज्ञान बुकु), तमिळ- पुमानी (अंगनगदी), तेलगु- रचपालेम चंद्रशेखर रेड्डी (मना नवलालू- मना कथनीकालू) आणि ऊर्दू- मुन्नवर राणा (शहदाबा). केळेकर यांना पुरस्कार अर्पणपणजी : आपल्याला जे गवसले ते सुलभ भाषेतून इतरांसमोर मांडताना या साहित्याच्या मननातून संशोधनाच्या वाटेवरून जाण्याची प्रेरणा इतरांनाही मिळावी, हाच हेतू आपण बाळगून आहोत, अशी भावना डॉ. माधवी सरदेसाई यांनी व्यक्त केली. हा पुरस्कार कोकणी साहित्याचे भीष्माचार्य रविन्द्र केळेकर यांना अर्पण केला. सरदेसाई यांना या आधी साहित्य अकादमीचा भाषांतराचा पुरस्कारही लाभला आहे. (प्रतिनिधी)