शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

नंदूरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागात अद्यापही विजेची प्रतिक्षा

By admin | Updated: August 30, 2016 19:13 IST

नंदूरबार जिल्ह्यातील ४५ गावांमध्ये व ९६८ पाड्यांमध्ये अद्यापही वीज पोहचलेली नसल्याची स्थिती आहे

- मनोज शेलार / ऑनलाइन लोकमत 
४५ गावे ९६८ पाड्यांमध्ये काळोख
नंदूरबार, दि. 30 -  जिल्ह्यातील ४५ गावांमध्ये व ९६८ पाड्यांमध्ये अद्यापही वीज पोहचलेली नसल्याची स्थिती आहे. या गावांमध्ये सरदार सरोवर प्रकल्पाअंतर्गत बुडीत क्षेत्रातील ३३ गावे व १७६ पाड्यांचाही समावेश आहे. 
 
नंदुरबार जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता विद्युतीकरण करण्यासाठी मोठी कसरत होत आहे. अद्यापही सातपुड्यातील दुर्गम भागातील तब्बल ४५ गावे व ९६८ पाडे विद्युतीकरणापासून वंचीत आहेत. या ठिकाणी प्रशासनाने सौरदिवे बसविले आहेत. परंतू त्यांचीही लाईफ अवघी एक ते दीड वर्ष राहत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे अद्यापही ही गावे काळोखातच आहेत. जिल्ह्यातील ९३० गावांपैकी ८८५ गावांचे विद्युतीकरण झालेले आहे. दोन हजार ९९१ पाड्यांपैकी २०२३ पाड्यांपर्यंत वीज पोहचली आहे. ४५ गावे व ९६८ पाड्यांना वीजेची प्रतिक्षा असून त्यात बुडीत क्षेत्रातील ३३ गावे, १७६ पाडे, बुडीत क्षेत्राव्यतिरिक्त १२ गावे व ७६३ पाड्यांचा समावेश आहे. विविध योजनांच्या माध्यमातून २०१६ अखेर १२ गावे व २०५ पाड्यांचे विद्युतीकरण करण्यात येणार आहे. उर्वरित गाव व पाड्यांच्या विद्युतीकरणासाठी तब्बल २०० कोटी रुपये खर्च येण्याचा अंदाज आहे.
 
विविध योजनांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात १२ गावे व २०५ पाड्यांचे विद्युती करण्यात येत असून त्यात डीपीडीसीच्या माध्यमातून २०१४-१५ मध्ये ४५ पाडे, २०१५-१६ मध्ये ५२ पाडे, त्याचवर्षी आदिवास उपयोजनेतून १२ गावे व ६० पाडे तर वनबंधू योजनेतून ४८ पाड्यांमध्ये तब्बल ४४ कोटी ८६ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
 
मोबाईल रेंज पोहचली, पण वीज नाही
विद्युतीकरण न झालेल्या गाव, पाड्यांपर्यंत मोबाईलची रेंज पोहचलेली आहे. परंतू वीज पोहचलेली नसल्याचे विरोधाभास निर्माण करणारे चित्र देखील सातपुड्यातील दऱ्याखोऱ्यात पहावयास मिळते. भारत संचार निगम अर्थात बीएसएनएलचे अनेक गावात मोबाईल टॉवर आहेत. त्या माध्यमातून दऱ्याखोऱ्यातील बऱ्याच गाव, पाड्यांपर्यंत मोबाईल रेंज पोहचत आहे. त्याचा चांगला परिणाम दळणवळण आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी होत आहे. परंतू अशा ठिकाणी वीज पोहचलेली नसल्यामुळे गावकऱ्यांना जवळच्या बाजारपेठेच्या गावात जावून तेथे किमान पाच रुपये ते २० रुपये देवून मोबाईल चार्जिंग करून घ्यावा लागतो. धडगाव, मोलगी या गावांमध्ये हे प्रकार सर्रास पहावयास मिळतात.