शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

अंतर्गत वादामुळे अडली भाजपा जिल्हाध्यक्षांची नावे

By admin | Updated: March 6, 2016 03:28 IST

शिस्तप्रिय म्हणविणाऱ्या भारतीय जनता पार्टीत किमान सात जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्षपदांवरून प्रचंड धुसफुस सुरू आहे. विशेष म्हणजे पुढील

यदु जोशी, मुंबईशिस्तप्रिय म्हणविणाऱ्या भारतीय जनता पार्टीत किमान सात जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्षपदांवरून प्रचंड धुसफुस सुरू आहे. विशेष म्हणजे पुढील वर्षी महापालिका निवडणुकीला सामोरे जात असलेल्या मुंबईचे अध्यक्षपददेखील अडले आहे.मुंबईचे विद्यमान अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना पुन्हा अध्यक्षपदाचे वेध लागले असले तरी आ. राज पुरोहित, आ. योगेश सागर इच्छुक आहेत. शेलार यांच्या नावाला काही वजनदार नेत्यांचा विरोध आहे. पण पर्यायी सक्षम नाव ते देऊ शकलेले नाहीत. शेलार यांच्या नावावरच पुन्हा शिक्कामोर्तब होईल, असे मानले जाते. तरीही घोषणेबाबत चालढकल केली जात आहे. मुंबईत काँग्रेससोबतच शिवसेनेला चोख प्रत्युत्तर देणारा अध्यक्ष महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला लागणार आहे. त्यादृष्टीनेही शेलार यांच्याकडे बघितले जाते. केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार अशा दिग्गज नेत्यांचा जिल्हा असलेल्या चंद्रपूरमध्ये अध्यक्षपदाचा घोळ कायम आहे. विद्यमान अध्यक्ष माजी आमदार अतुल देशकर यांना कायम ठेवण्याबाबत एकमत नाही. अहीर यांच्याकडून विजय राऊत यांचे तर मुनगंटीवार यांच्याकडून देवराव भोंगळे यांचे नाव समोर केले जात आहे. एकही मंत्रीपद न मिळालेल्या यवतमाळ जिल्ह्यात विद्यमान अध्यक्ष राजेंद्र डांगे यांना पुन्हा संधी देण्यास आमदार मदन येरावार यांचा विरोध असल्याचे बोलले जाते. ‘आम्हाला डांगे नकोत, जिल्हा सरचिटणीस मनोज इंगोले किंवा दुसरे कोणीही चालेल,’ असा पवित्रा त्यांनी घेतल्याची माहिती आहे. अध्यक्षपदाच्या निवडीवरून अंतर्गत वाद उफाळला आहे. मंत्रीपदापासून वंचित असलेल्या बुलडाणा जिल्ह्यामध्ये अध्यक्षपदाचा घोळ वाढला आहे. भाऊसाहेब फुंडकर, चैनसुख संचेती आणि विद्यमान जिल्हाध्यक्ष डॉ. संजय कुटे यांच्यापैकी एखाद्याला मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळेल, अशी आशा कायम असताना जिल्हाध्यक्ष ठरत नाहीत, अशी स्थिती आहे. घाटावरचा अध्यक्ष केला पाहिजे, असा आग्रह धरून काँग्रेस-राष्ट्रवादी अन् नंतर भाजपा असा प्रवास केलेले माजी आमदार धृपतराव सावळे यांचे नाव पुढे केले जात आहे. सावळे मुंबईत ज्या इमारतीत राहतात तिथे राहणाऱ्या भाजपा नेत्यांचे आशीर्वाद त्यांना असल्याने स्थानिक निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. बाहेरचे पार्सल कशाला, असा सवाल केला जात आहे. नंदुरबारमध्ये तब्बल १५ जण जिल्हाध्यक्षपदासाठी बाशिंग बांधून तयार असल्याने पक्ष नेतृत्वाची डोकेदुखी वाढली आहे. विद्यमान अध्यक्ष नागेश पाडवी पुन्हा शर्यतीत आहेत. माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित कोणाला कौल देतात यावर अध्यक्ष ठरेल, असे दिसते.