शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शहिदांच्या कुटुंबीयांसाठी अक्षयच्या नावे पैसे जमा करण्यासाठी फिरणारा "तो" मेसेज बनावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 14:34 IST

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारच्या नावे व्हाट्सअॅपवर एक मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारच्या नावे व्हाट्सअॅपवर एक मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये सांगण्यात आलं आहे की, केंद्र सरकारने लष्कराला मजबूत करण्यासाठी आणि शहिद जवानांच्या मदतीसाठी एक बँक खातं खोललं आहे, ज्यामध्ये तुम्ही एक रुपयापासून ते आपल्याला शक्य तितकी रक्कम जमा करु शकता. सोबतच हा एक मास्टरस्ट्रोक असल्याचंही सांगण्यात आलं आहे. 
 
आणखी वाचा
VIDEO : सुकमाचा बदला ! स्पेशल कमांडोंच्या कारवाईत 20 नक्षलवादी ठार
300 नक्षलवाद्यांनी केला जवानांवर बेछूट गोळीबार, 25 जवान शहीद
गौतम गंभीर उचलणार सुकमा हल्ल्यातील शहिदांच्या मुलांचा खर्च
 
जर तुम्हाला व्हाट्सअॅपवर असा एखादा मेसेज आला असेल, तर तुमच्या माहितीसाठी हा मेसेज पुर्णपणे बनावट आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अक्षय कुमार फक्त भारत सरकारची वेबसाईच bharatkeveer.gov.in शी जोडला गेला आहे. तसंच अक्षय कुमारने अशा प्रकारे कोणत्याही बँक खात्यात पैसे जमा करण्याचं आवाहन केलेलं नाही. 
 
या मेसेजमध्ये सांगण्यात आलं आहे की, "भारताची लोकसंख्या 130 कोटी आहे. यामधील 70 टक्के लोकांनी जरी फक्त एक रुपया निधीत जमा केला तर एका दिवसात 100 कोटी रुपये जमा होतील. 30 दिवसांत 3000 कोटी आणि एका वर्षात 36,000 कोटी जमा होतील. 36 हजार कोटी रुपये तर पाकिस्तानचं सुरक्षा बजेटही नाही. आपण सर्वजण दिवसाला 100 किंवा 1000 रुपये असेच विनाकारण खर्च करुन टाकतो, पण जर आपण सर्वांनी एक रुपया लष्कराला दिला तर भारत खरोखर एर सुपर पावर देश होईल. तुमचा हा एक रुपया थेट संरक्षण मंत्रालयाच्या सैनिक सहाय्यता तसंच युद्ध अपघात निधीत जमा होईल. जो सैन्य सामग्री आणि लष्कराच्या जवानांसाठी कामी येईल". 
अक्षय कुमारने काही दिवसांपुर्वी सुकमा नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांना मदत करण्याचं आवाहन केलं होतं. अक्षयने आपल्या ऑडिओ मेसेजमध्ये सांगितलं होतं की, "सुकमा हल्ल्यात सीआयरपीएफच्या बहादूर जवानांनी देशासाठी आपला प्राण दिला आहे. माझी तुम्हा सर्वांना हा जोडून विनंती आहे की, जर या शहिदांना तुम्हाला खरंच श्रद्धांजली वाहायची असेल तर भारत सरकारच्या bharatkeveer.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचं योगदान द्या. शहिदांच्या कुटुंबीयांना या दुखा:च्या वेळी आपण एकटे नाही आहोत याची जाणीव करुन द्या. त्यांच्यासोबत उभे राहा".