शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

द.मध्य मुंबईत नालेसफाई ठप्प

By admin | Updated: May 3, 2017 06:45 IST

महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर नाल्यांच्या सफाईला मुंबईत सुरुवात झाली खरी, पण सखल भाग असल्याने दर पावसाळ्यात

मुंबई : महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर नाल्यांच्या सफाईला मुंबईत सुरुवात झाली खरी, पण सखल भाग असल्याने दर पावसाळ्यात पाण्याखाली जाणाऱ्या दक्षिण मध्य मुंबईत अद्याप ठेकेदार सापडलेला नाही. त्यामुळे येथील नाले गाळात असून, पावसाळ्यात येथे पाणी तुंबण्याची भीती स्थानिक नगरसेवक व्यक्त करीत आहेत. दोन वर्षांपूर्वी नालेसफाईच्या कामाचे कंत्राट पालिकेने दिले होते. मात्र, यात दीडशे कोटींचा घोटाळा झाल्यानंतर, प्रशासनाने ठेकेदारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. घोटाळेबाज ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची भूमिका आयुक्तांनी घेतल्यामुळे ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे या वर्षी नालेसफाईच्या कामासाठी महापालिकेला कोणी ठेकेदार मिळेनासा झाला. बऱ्याच प्रयत्नानंतर एप्रिल महिन्याच्या अखेरीस निविदेला प्रतिसाद मिळून नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली, परंतु मे महिना उजाडला, तरी अद्याप बऱ्याच ठिकाणी नाल्यांच्या सफाईने वेग घेतलेला नाही. त्यात एफ उत्तर, एफ दक्षिण, जी उत्तर, जी दक्षिण या दक्षिण मध्य मुंबई भागात ठेकेदार मिळालेले नाहीत. अनेक ठिकाणी नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम ठप्प पडले आहे. अँटॉप हिल, दादर, माटुंगा, सायन, वडाळा, प्रभादेवी, करी रोड, परळ या दक्षिण मध्य मुंबईत मोठे नाले गाळात आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिक नाराज असून, नगरसेवकांना त्यांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. या विभागांमध्ये भुयारी नाले असल्याने, सफाईसाठी कोणी पुढे येत नसल्याचे अधिकारी सांगतात. अखेर ठेकेदारांचा नाद सोडून बिगर शासकीय संस्थांमार्फत या विभागांमधील नाल्यांची सफाई होणार आहे. (प्रतिनिधी)एनजीओमार्फत सफाईचा प्रस्ताव सफाईसाठी दक्षिण मध्य मुंबईत आता बिगर शासकीय संस्थेच्या कामगारांना उतरवण्याचा पालिकेचा विचार सुरू आहे. याबाबतचा प्रस्ताव विभागातून प्रमुख अभियंता यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. मात्र, एनजीओच्या कामगारांचा नालेसफाईच्या कामातील तोकडा अनुभव, नाले सफाईसाठी लागणारी यंत्रणा आणि गाळ कुठे टाकणार हा नेहमीचा प्रश्न कसा सुटणार? असा पेच निर्माण झाला आहे. न्नालेसफाई बंद पालिकेच्या एफ उत्तर विभागात नालेसफाई करण्यास कंत्राटदार आलेले नाहीत. त्यामुळे येथील नालेसफाईचे काम ठप्प झाले आहेत. या विभागात १४ मोठे नाले असून, या नाल्यांच्या सफाईसाठी २० एनजीओची यादी निश्चित करण्यात आली आहे. या वॉर्डमधील छोटे नाले साफ झाल्यावर गाळ रस्त्यावर किंवा नाल्यांच्या तोंडावर टाकला जात आहे. पावसाळ्यापूर्वी ६० टक्के, पावसाळ्यात २० टक्के तर पावसाळ्यानंतर २० टक्के नाल्यांची सफाई करण्यात येते. मात्र, नालेसफाई घोटाळ्यात दोषी ठेकेदारांवर कडक कारवाई झाल्यामुळे नवीन ठेकेदार पुढे येण्यास तयार नव्हते, तसेच गाळ टाकण्यासाठी जागा मिळत नसल्याने ठेकेदारांकडून थंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पावसाळ्यापूर्व कामांसाठी पालिका प्रशासनाने सर्व सहायक आयुक्तांना विभाग स्तरावरील कामगार व बिगर शासकीय संस्थांमार्फत छोट्या नाल्याच्या सफाई सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, विभाग पातळीवर मोठ्या पर्जन्य जलवाहिन्यांची कामे १ एप्रिलपासून तर छोट्या नाल्यांची कामे ७ एप्रिलपासून सुरू झाली.नगरसेवकांची तक्रार दक्षिण मध्य मुंबईत नाल्यांच्या सफाईला फटका बसल्याने येथील नगरसेवक नाराज आहेत. या विभागांमध्ये सखल भाग अधिक असल्याने, नाले साफ न झाल्यास या विभागांमध्ये पाणी तुंबण्याची दात शक्यता आहे. त्यामुळे यावर लवकर तोडगा काढा, असे गाऱ्हाणे घेऊन नगरसेवक पालिका मुख्यालयात धडकू लागले आहेत. अँटॉप हिलचे काँग्रेसचे नगरसेवक सुफियान वणू यांनी आपल्या वॉर्डमधील ही समस्या मांडून लवकरात लवकर यात लक्ष घालण्याची विनंती काँग्रेसचे गटनेते व विरोधी पक्षनेते रवी राजा यांना आज केली. या विभागांना फटका नालेसफाई वेळेवर न झाल्यास सायन, वडाळा, माटुंगा, दादर, माहीम, प्रभादेवी, परळ, अँटॉप हिल, करीरोड असे दक्षिण मध्य मुंबईतील भागांमध्ये नाले तुंबून, हा परिसर पावसाळ्यात पाण्याखाली जाण्याची भीती विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी व्यक्त केली. दोन वर्षांपूर्वी नालेसफाईच्या कामाचे कंत्राट पालिकेने दिले होते. मात्र, यात दीडशे कोटींचा घोटाळा झाल्यानंतर, प्रशासनाने ठेकेदारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. विरोधक जाब विचारणार नालेसफाई होत नसल्याने नगरसेवक हैराण आहेत. प्रभागातील जागरूक रहिवाशी रोज येऊन जाब विचारात असल्याने, नगरसेवक मेटाकुटीस आले आहेत. त्यामुळे या दिरंगाईचा जाब प्रशासनाला विचारणार असल्याचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी सांगितले. उद्या स्थायी समितीच्या बैठकीत नालेसफाईच्या मुद्द्यावर वादळी चर्चा होण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.