शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नागपूर ‘टायगर कॅपिटल सिटी’चे स्वप्न हवेत विरले

By admin | Updated: November 30, 2014 00:54 IST

विदर्भात नागपूर ‘टायगर कॅपिटल’चे शहर बनविण्याची दोन वर्षांपूर्वीची राज्य शासनाने केलेली घोषणा हवेत विरली आहे. येथे वनसंपदेचा खजिना असताना राज्यकर्त्यांच्या अनास्थेमुळे ही स्थिती निर्माण झाली

वनसंपदेचा खजिना : विदर्भात वाशिम वगळता १० जिल्ह्यांत वाघांचे अस्तित्वगणेश वासनिक - अमरावतीविदर्भात नागपूर ‘टायगर कॅपिटल’चे शहर बनविण्याची दोन वर्षांपूर्वीची राज्य शासनाने केलेली घोषणा हवेत विरली आहे. येथे वनसंपदेचा खजिना असताना राज्यकर्त्यांच्या अनास्थेमुळे ही स्थिती निर्माण झाली असून विदर्भात पर्यटनाला वाव मिळण्याचे मार्ग बंद करण्यात आल्याचे चित्र आहे.तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन वर्षांपूर्वी नागपूर येथे एका कार्यक्रमात नागपूर ‘टायगर कॅपिटल सिटी’ बनविण्याची घोषणा केली होती. ही मागणी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, खा. राजेंद्र दर्डा यांनी मुख्यमंत्र्यांकडे विशेष करुन केली होती. या मागणीच्या अनुषंगाने पृथ्वाराज चव्हाण यांनी वन विभागाला ‘टायगर कॅपिटल सिटी’चा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशदेखील दिले होते. मात्र मुख्यमंत्री परतताच नागपूर टायगर कॅपिटल सिटीचा प्रस्ताव वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी शासनाकडे उशिरा पाठविला. परिणामी शासनाला याबाबत वेळेवर निर्णय घेता आला नाही. त्यानंतर राज्यातील शासन बदलले. परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विदर्भातील आहेत. या दोघांनाही विदर्भातील प्रश्न आणि समस्यांची खडान्खडा माहिती आहे. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री फडणवीस हे नागपूरचे आमदार असताना त्यांनी टायगर कॅपिटल सिटी निर्मितीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या नागपूर टायगर कॅपिटल सिटीचे स्वप्न साकारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी विदर्भवासीयांची आहे. राज्यात एकूण २१ टक्के जंगल असून त्यापैकी १७ ते १८ टक्के जंगल एकट्या विदर्भात आहेत. नागपूर शहराला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. पेंच, ताडोबा, नागझिरा, बोर व मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या जवळपास ३०० आहे. तसेच विदर्भात ३० ते ३५ अभयारण्य असून येथेही वाघ असल्याची नोंद आहे. नागपूरला टायगर कॅपिटल सिटीचा दर्जा मिळाल्यास येथे पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव मिळेल, त्यानुषंगानेच लोकप्रतिनिधींनी मागणी रेटून धरली आहे. टायगर कॅपिटल सिटी निर्मितीसाठी कृती आराखडा तयार करण्यात आला होता. वाघांचे अस्तित्व दाखविणारे भले मोठे प्रवेशद्वार, पर्यटनाचे केंद्र आदी बाबी यात अंतर्भूत करण्यात आल्या होत्या. मात्र शासनाने नागपूर टायगर कॅपिटल सिटी निर्मितीसाठी जोरकसपणे प्रयत्न केले नसल्यामुळे हा प्रस्ताव मंत्रालयात धूळ खात पडला आहे. विदर्भात नागपूर हे शहर महत्त्वाच्या स्थळी असल्यामुळे येथे आंतराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ, मिहान प्रकल्प, उद्योगधंदे, पर्यटनवाढीस चालना देणाऱ्या सोईसुविधा असल्याने टायगर कॅपिटल सिटी निर्माण झाल्यास वाघांचे संरक्षण, संगोपन करणे सुकर होईल.