शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरची ओळख बनणार ‘तिरंगा’!

By admin | Updated: October 29, 2016 02:17 IST

लोकमत वृत्तपत्र समूह व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरचंद पार्क येथे २०० फूट उंच राष्ट्रध्वज उभारण्यात येत आहे. ही नागपूरसाठी अभिमानास्पद बाब

नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूह व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरचंद पार्क येथे २०० फूट उंच राष्ट्रध्वज उभारण्यात येत आहे. ही नागपूरसाठी अभिमानास्पद बाब आहे. युवकांमध्ये देशप्रेम, देशभक्ती जागविण्यासाठी हा तिरंगा प्रेरणादायी ठरेल. हा राष्ट्रध्वज येत्या काळात नागपूरच्या इतिहासातील अभिमानास्पद ओळख बनेल, असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.या प्रकल्पाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. अध्यक्षस्थानी महापौर प्रवीण दटके होते. विशेष अतिथी म्हणून लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा उपस्थित होते. या वेळी आ. सुधाकरराव देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. अनिल सोले, आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने, विभागीय आयुक्त अनुपकुमार, पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम्, नासुप्र सभापती दीपक म्हैसेकर, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊत, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, जलप्रदाय समितीचे अध्यक्ष संदीप जोशी, परिवहन समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, हेरिटेज कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण पाटणकर, ११८ इन्फॅन्ट्री बटालियनचे सुभेदार वीरेंद्र सिंग, माजी आ. यादवराव देवगडे, माजी उपमहापौर कृष्णराव परतेकी, सभापती सुनील अग्रवाल, गोपाल बोहरे, वर्षा ठाकरे, नगरसेवक प्रकाश तोतवानी, सुजाता कोंबाडे, प्रगती पाटील, गौतम पाटील, सारिका नांदूरकर, जयश्री वाडिभस्मे, सीमा राऊत, स्वाती आखतकर, रिता मुळे, रश्मी फडणवीस, माजी नगरसेवक मनोज साबळे, विठ्ठलराव कोंबाडे, महापालिकेचे कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, पेंच प्रकल्प सेलचे प्रकल्प अभियंता संदीप लोखंडे, उपविभागीय अभियंता धनंजय मेंडुलकर, प्रकल्प व्यवस्थापकीय सल्लागार आर. जगताप, लोकमतचे संचालक (परिचालन) अशोक जैन, लोकमत वृत्तपत्र समूहाचे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंग उपस्थित होते. वास्तुविशारद शांतनु भल्ला, जे.सी. भल्ला, कपिल भल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प साकारला जात असून तो सहा महिन्यांत पूर्णत्वास येईल, असा विश्वास लोकमत व महापालिकेने व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)नव्या पिढीत राष्ट्रप्रेम जागविणार - विजय दर्डा धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर देशाची कर्मभूमी, मर्मभूमी व हृदयस्थळ झीरो माईल असलेल्या नागपूर शहरातील कस्तुरचंद पार्कवर राष्ट्रध्वज उभारण्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. नव्या पिढीत राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करणे, त्यांना तिरंग्याचे महत्त्व समजावे या उद्देशाने हा प्रकल्प उभारला जात आहे, असे लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी सांगितले. संसदेतही तिरंगा बॅच लावून प्रवेश मिळावा, यासाठी आपण गेली १८ वर्षे आग्रह धरला; शेवटी त्यात यश मिळाले. आपण विजय मिळवितो तेव्हा तिरंग्याच्या साक्षीने जल्लोष करतो. हा तिरंगा विजयाचेही प्रतीक ठरेल. येत्या काळात हे एक प्रेक्षणीय स्थळदेखील होईल, असेही दर्डा यांनी सांगितले.२००९ पासून सुरू होता संघर्षलोकमत वृत्तपत्र समूहाला राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यासाठी २००९पासून सतत संघर्ष करावा लागला. या दरम्यान सरकारही बदलले. अधिकारी बदलले. मात्र, लोकमत वृत्तपत्र समूह आपल्या ध्येयावर कायम राहिले. विजय दर्डा यांनी यासाठी सातत्याने संघर्ष केला. खासदार असताना दर्डा यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, विमानतळ प्राधिकरण, महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास व अन्य संबंधित विभागांशी पत्रव्यवहार केला. एवढेच नव्हे तर राष्ट्रीय उत्सवात लोकप्रतिनिधींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यासाठी त्यांनी तत्कालीनकेंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील अन्य मंत्री, विधान परिषदेचे नेते, विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनाही पत्र लिहिले. त्यांनी मुंबईतील चौपाटीवर २०७ फूट उंच तिरंगा झेंडा लावण्याबाबत प्रस्तावित असलेल्या प्रकल्पाबाबत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चाही केली.नागपुरात उंच राष्ट्रध्वज लावण्याकरिता हेरिटेज कमिटीची मंजुरी मिळण्यासाठीही त्यांनी पत्रव्यवहार केला. या सर्व संघर्षानंतर २८ जुलै २०१६ रोजी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत लोकमत वृत्तपत्र समूह व नागपूर महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रध्वजासह २०० फूट उंच ध्वजस्तंभ उभारण्याच्या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली.लोकमतने सामाजिक बांधिलकी जपली - गडकरीलोकमत वृत्तपत्र समूहातर्फे समाज व देशहित डोळ्यासमोर ठेवून विविध उपक्रम राबविले जातात. देशसेवेच्या प्रत्येक उपक्रमात लोकमतचा पुढाकार असतो. मोवाड पूर, लातूर भूकंप, कारगिलचे युद्ध आदी प्रसंगी लोकमतने मदतीसाठी घेतलेला पुढाकार सर्वांनीच अनुभवला आहे.पुन्हा एकदा या राष्ट्रध्वज प्रकल्पाच्या माध्यमातून लोकमतने आपली समाज व देशाप्रति असलेली बांधिलकी स्पष्ट केली आहे, अशी प्रशंसा गडकरी यांनी ‘लोकमत’ची केली.