शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

नागपूर - पोलीस भरतीच्या लेखी परिक्षेत गोंधळ

By admin | Updated: May 17, 2016 17:43 IST

पोलीस भरतीच्या लेखी परिक्षेत प्रश्नपत्रिकेतील घोळ संशयास्पद ठरला, परिणामी परिक्षार्थ्यांनी ‘सेटींग‘चा आरोप करून जोरदार हरकत घेतली

ऑनलाइन लोकमत - 
नागपूर, दि. 17 - पोलीस भरतीच्या लेखी परिक्षेत प्रश्नपत्रिकेतील घोळ संशयास्पद ठरला. परिणामी परिक्षार्थ्यांनी ‘सेटींग‘चा आरोप करून जोरदार हरकत घेतली. त्यामुळे पोलीस मुख्यालयात प्रचंड गोंधळ उडाला. नारेबाजी, रस्तारोकोमुळे प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलीस आयुक्तांनी संतप्त परिक्षार्थ्यांना आपल्या कक्षात बोलवून त्यांची समजूत काढल्यानंतर तब्बल ४ तासांनी तणाव निवळला.
 
पोलीस भरतीच्या मैदानी आणि इतर प्रक्रियेत यश मिळवलेल्या ३ हजार पात्र परिक्षार्थ्यांना आज सकाळी लेखी परिक्षेसाठी पोलीस मुख्यालयात बोलवण्यात आले होते. त्यानुसार, राज्याच्या कानाकोप-यातून पात्र परिक्षार्थी लेखी परिक्षेला हजर झाले. सकाळी ७ नंतर लेखी परिक्षा सुरू झाली. ए, बी. सी, डी अशा चार स्वरूपात प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली होती. उत्तरासाठी चार पर्याय दिले होते. दहा वाजता दरम्यान पेपर संपवून हळूहळू विद्यार्थी मुख्यालयाच्या मैदानात जमू लागले. सकाळी १० च्या सुमारास  एकमेकांशी चर्चा करताना कोणते उत्तर बरोबर आणि कोणते चूक त्याबाबत शहानिशा करू लागले. प्रश्नपत्रिकेच्या बी संचात उत्तराची जी चार पर्याय दिली होती. त्यातील एक पर्याय काहीसा फिक्कट (पुसटसा) असल्याचे परिक्षार्थ्यांच्या लक्षात आले. पुसट असलेले सर्वच पर्याय योग्य उत्तर होते. त्यामुळे पोलीस अधिका-यांनी जाणीवपूर्वकच हा प्रकार केल्याचा विद्यार्थ्यांना संशय आला. यामुळे सेटींगची कुजबूज वाढली अन् गोंधळाला सुरूवात झाली. 
 
हजारेक परिक्षार्थी एकत्र झाले आणि त्यांनी परिक्षा केंद्रावरील पोलीस अधिका-यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून देत परिक्षा रद्द करण्याची मागणी लावून धरली. परिक्षा प्रमूख श्रीकांत तरवडे यांना ही बाब कळताच त्यांनी परिक्षार्थ्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिक्षार्थी ऐकायला तयार नव्हते. त्यांनी नारेबाजी सुरू केली.पोलीस मुख्यालयाजवळच्या रस्त्यावर ठाण मांडून रस्ता रोको केला. यामुळे प्रचंड तणाव वाढला. वातावरण चिघळण्याचे संकेत मिळाल्याने पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी परिक्षार्थ्यांना आपल्या कार्यालयात बोलवून घेतले. 
 
प्रश्नपत्रिकेच्या बी संचाची उत्तरे सोडविणा-या विद्यार्थ्यांपैकी किमान १० ते १५ जणांना ९० टक्के पेक्षा जास्त गूण मिळाल्याचे आढळल्यास ही लेखी परिक्षा रद्द केली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.
 
तिस-यांदा घोळ 
शहर पोलिसांच्या भरती प्रक्रियेतील घोळाची ही तिसरी वेळ आहे. पहिल्यांदा ही परिक्षा २२ एप्रिलला होणार होती. त्यावेळी उपस्थित झालेल्या अडचणीने परिक्षा पुढे ढकलण्यात आली. नंतर १० मे रोजी शासनाने जास्त पदासाठी भरती घेण्याचे आदेश दिल्याने लेखी परिक्षा पुढे ढकलण्यात आली. तर, तिस-यांदा आज प्रश्नपत्रिकेतील उत्तराचा पर्याय पुसट असल्याने संशयकल्लोळ वाढला. दरम्यान, आज रात्रीपर्यंत यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे आयुक्तांनी पत्रकारांना सांगितले.