शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

नऊ तासात पूर्ण होईल नागपूर-सुरतचा प्रवास

By admin | Updated: July 6, 2014 00:44 IST

सर्वसाधारणपणे रेल्वेचा प्रवास रस्ते मार्गापेक्षा लवकर पूर्ण होतो. परंतु राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ ने ही बाब खोटी ठरवून प्रवाशांना अर्ध्या वेळेतच त्यांना जेथे जायचे आहे तेथे पोहोचविण्याचा

राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती : जमीन अधिग्रहणाबाबत लवकरच चर्चावसीम कुरेशी - नागपूरसर्वसाधारणपणे रेल्वेचा प्रवास रस्ते मार्गापेक्षा लवकर पूर्ण होतो. परंतु राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ ने ही बाब खोटी ठरवून प्रवाशांना अर्ध्या वेळेतच त्यांना जेथे जायचे आहे तेथे पोहोचविण्याचा मार्ग खुला केला आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चे १९४९ किलोमीटरचे अंतर फक्त २० तासात पूर्ण होऊ शकणार आहे. रेल्वेगाडीत हेच अंतर कापण्यासाठी ३७ तास लागतात. अशास्थितीत नागपूर-सुरत या मार्गाचे ८७५ किलोमीटरचे अंतर फक्त ९ तासात पूर्ण होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर अमरावती ते जळगाव (२७५ किलोमीटर) आणि जळगाव ते धुळेपासून पुढे महाराष्ट्र, गुजरातच्या सीमेपर्यंत(२०८ किलोमीटर)ची निविदा फेब्रुवारी २०१४ मध्ये झाली आहे. कंत्राट देण्याच्या करारानंतर सहा महिने होऊनही कंत्राटदाराला जमीन मिळू शकली नाही. यावर कंत्राटदाराने आपले कंत्राट सोडण्याची सूचनाही केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित कंत्राट घेणाऱ्या कंपनीने नुकसान भरपाईची मागणी केली आहे. परंतु संबंधित कंत्राटदाराची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ अंतर्गत महाराष्ट्राच्या संबंधित दोन्ही भागात ८० टक्के जमीन अधिग्रहण करण्याचे काम शिल्लक आहे. भूदल मंत्रालयातर्फे या प्रकरणी राज्य शासनाशी लवकरच चर्चा करण्यात येणार आहे. अमरावतीपासून धुळेपर्यंत ४८३ किलोमीटरच्या भागात २ लेनला ४ लेन बनविण्यासाठी डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याची सूचना ठेवण्यात आली आहे. सुरुवातीला येथे डांबरीकरण करून रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव होता. परंतु मंत्रालय कमी देखभाल आणि मजबुतीच्या दृष्टीने येथे सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करण्याच्या बाजूने आहे.तज्ज्ञांच्या मते डांबराच्या रस्त्याची पाच वर्षांनंतर डागडुजी करावी लागते. परंतु सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याला ३० वर्षे देखभालीची गरज नसते.राष्ट्रीय महामार्ग ६ विकसित झाल्यानंतर मुंबई-इंदोर-आगरा (राष्ट्रीय महामार्ग ३) ला गती मिळू शकणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ आणि ३ धुळ्याजवळ ‘क्रॉस’ होतात. विकास कामामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चा वापर करून इंदोर, आगरा अथवा मुंबई जाणाऱ्यांना अधिक सुविधा मिळणार आहे.